शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
4
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
5
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
6
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
7
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
8
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
9
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
10
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
11
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
12
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
13
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
14
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
15
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
16
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
18
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
19
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
20
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू

गुन्हेगार मतदार शोधणार

By admin | Updated: August 11, 2014 01:57 IST

विकास राऊत, औरंगाबाद शहरातील ९९ वॉर्डांत राहणाऱ्या गुन्हेगार मतदारांचा शोध घेण्याची मोहीम पोलीस विभागाने हाती घेतली आहे. शुक्रवारी दोन पोलीस उपनिरीक्षकांनी पालिकेच्या निवडणूक विभागाकडे

विकास राऊत, औरंगाबादशहरातील ९९ वॉर्डांत राहणाऱ्या गुन्हेगार मतदारांचा शोध घेण्याची मोहीम पोलीस विभागाने हाती घेतली आहे. शुक्रवारी दोन पोलीस उपनिरीक्षकांनी पालिकेच्या निवडणूक विभागाकडे संगणकीय मतदार यादीची मागणी केली. एप्रिलमध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत काही तडीपार व पोलीस दप्तरी ‘वाँटेड’ असलेल्या गुन्हेगारांनी मतदान केल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यामुळे त्यांचे वास्तव्य शहरात असल्याचे पोलिसांना वाटत असून, आगामी विधानसभा निवडणूक शांततेने पार पडावी यासाठी पोलिसांनी मतदार यादीसाठी थेट मनपाला साकडे घातले आहे. त्या यादीच्या आधारे पोलीस गुन्हेगार मतदारांचा शोध घेणार आहेत. पोलिसांना वरिष्ठ पातळीवरून तशा सूचना आल्याने झोननिहाय यंत्रणा कामाला लागली आहे. पालिकेकडे २०११ च्या जनगणनेनुसार यादी नाही. २०१० ची यादी मनपाकडे उपलब्ध आहे. ती यादीही एका खाजगी संस्थेकडून पोलिसांना देण्यात येणार आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पोलिसांना जी माहिती हवी आहे, त्यामध्ये सध्या तरी काही अडथळे असल्याचे दिसते. शहराची लोकसंख्या महापालिकेने २०११ च्या जनगणनेनुसार २०१५ च्या महापालिकेच्या निवडणुकीसाठी ११ लाख ७५ हजार ११६ इतकी लोकसंख्या ग्राह्य धरली आहे. त्या धर्तीवरच पालिकेची प्रभाग रचना होणार आहे. शहरातील पूर्व, पश्चिम आणि मध्य मतदारसंघांत सुमारे आठ लाख मतदार असतील. ९०० च्या आसपास मतदान केंदे्र आहेत. या सगळ्या केंद्रांवरील मतदारांची संगणकीय यादी पोलिसांना हवी आहे.पोलीस सूत्रांनी सांगितले की, काही गुन्हेगारांचा शोध घ्यायचा आहे. ते गुन्हेगार सध्या आहेत, त्या ठिकाणी उपलब्ध आहेत की नाही, याची पाहणी करायची आहे. त्यासाठी वरिष्ठ पातळीवरूनही काही आदेश आलेले आहेत. ४संगणकीय यादी मिळाली असती तर पोलिसांकडील गुन्हेगारांची नावे संगणकात टाकून गुन्हेगारांचा शोध घेता आला असता. मनपाने त्या याद्या काही दिवसांत उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले. गुन्हेगार किती आहेत, त्यांचा आकडा पोलीस सूत्रांनी सांगितला नाही. मनपाकडे वॉर्डनिहाय संगणकीय यादी उपलब्ध नाही. एका खाजगी एजन्सीकडून मनपाने २०१० मध्ये मतदार याद्यांचे काम करून घेतले होते. त्या एजन्सीने पालिकेला फक्त मतदार याद्या भागनिहाय मुद्रित करून दिल्या. मात्र, संगणकीय कॉपी पालिकेला दिली नाही. त्यामुळे मनपाने लाखो रुपये देऊन फक्त मुद्रित याद्या घेतल्या.४ संगणकीय डाटा न घेतल्यामुळे यावेळी पुन्हा नव्याने मतदार याद्यांची पुन्हा रचना पालिकेला करावी लागणार आहे. ज्या एजन्सीने याद्यांचे काम केले होते, त्यांनी याद्या सोयीनुसार अनेक इच्छुकांना विकल्याने याद्यांचा बाजार फोफावत गेला. २००५ मध्ये करण्यात आलेल्या वॉर्ड नकाशातील दिशादर्शक खुणा (वॉर्ड हद्दीची खूण) २०१४ मध्ये सापडत नाही. त्यातच नकाशे ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट करण्यात आले आहेत. ४नकाशे रंगीत करावे लागणार असल्यामुळे मनपा निवडणूक विभागाचे काम आणखी वाढले आहे. जुन्या प्रभाग रचनेतील नाले, रस्ते, धार्मिक स्थळे, झाडांच्या खुणा गायब झाल्यामुळे प्रभागांचे नकाशे तयार करण्यात अडचणी येत आहेत. ४१८ ते २२ हजार लोकसंख्या एका प्रभागासाठी निश्चित करण्यात आली आहे. ११४ प्रभाग होण्याचा अंदाज सूत्रांनी वर्तविला.