शहरं
Join us  
Trending Stories
1
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
2
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
3
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
4
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
5
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
6
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
7
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
8
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
9
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
10
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
11
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
12
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
13
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
14
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
15
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
16
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
17
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज
18
Donald Trump Tariffs : 'जर ट्रम्प-पुतिन यांची चर्चा अयशस्वी झाली तर आम्ही भारतावर अधिक शुल्क लादू...', अमेरिकेची नवी धमकी
19
राज कुंद्राने आशीर्वाद घेताच केली किडनी ऑफर, ऐकून काय म्हणाले प्रेमानंद महाराज? जाणून आश्चर्य वाटेल
20
"अजित पवार यांनी लाडकी बहीण योजना आणल्यानेच महायुतीला २३८ जागा मिळाल्या’’, सुनिल तटकरेंचा दावा   

गुन्हेगारीने डोके वर काढले

By admin | Updated: May 29, 2014 00:41 IST

जालना : जिल्ह्यात गेल्या महिनाभरात गुन्हेगारी स्वरूपाच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली.

जालना : जिल्ह्यात गेल्या महिनाभरात गुन्हेगारी स्वरूपाच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून खून, हाणामारी, चोर्‍या, लूटमार, बलात्कार, विनयभंग, जातीय तणाव यासारख्या घटना दररोज होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नानेगाव (ता. बदनापूर) येथील सरपंचाचा खुनाच्या घटनेने राज्यभर खळबळ उडाली. त्यापाठोपाठ वालसावंगीतील अल्पवयीन मुलींची हत्या, परतूर तालुक्यातील बाबूलतारा येथील ग्रामस्थांवरील अन्याय, घनसावंगीतील कंडारी काकडी येथील ध्वजप्रकरण तसेच जाफराबाद तालुक्यातील वरूड येथील जातीय तणाव प्रकरण इत्यादी घटनांमुळे जिल्ह्यात असुरक्षित वातावरण निर्माण झाले आहे. जालना शहरातील साळी गल्लीतील खून प्रकरण, शनिमंदिर चौकात भरदिवसा कोयता हातात घेऊन युवकाने दहशत निर्माण केलेला प्रयत्न, याच परिसरात २७ रोजी रात्री चार जणांनी हातात तलवारी घेऊन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. शहरात सकलेचानगर भागात एका व्यापार्‍याची दीड लाखांची बॅग लंपास, इन्कमटॅक्स कॉलनीत भरदिवसा झालेली सव्वा लाखांची चोरी, जुना जालना आनंदवाडी परिसरातील चोरी तसेच काही व्यापार्‍यांची दुकाने फोडण्याचे प्रकार यासारख्या घटनांमुळे सर्वसामान्य व व्यापार्‍यांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. विशेषत: महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाल्याचे चित्र आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून पोलिस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंग ह्या रजेवर आहेत. पोलिस यंत्रणेचा वचक न राहिल्याने अशा घटना वाढत असल्याची प्रतिक्रिया सर्वसामान्य नागरिकांमधून व्यक्त करण्यात येत आहे. (प्रतिनिधी) काद्राबाद भाजीमंडई भागातील एक महिला किराणा दुकान चालवते. या महिलेला दोन मुली आहेत. एका मुलीवर प्रेम जडल्याची सांगत थेट घरात प्रवेश करणार्‍या आरोपीविरोधात सदर बाजार पोलिस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवर काहीच कारवाई झाली नाही. त्यामुळे या महिलेने महापरिक्षेत्र पोलिस अधिकारी यांच्याकडे तक्रार दिली. त्यामुळे १५ दिवसानंतर पाच आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल झाला. महिलांच्या सुरक्षेसाठी शासनाकडून कडक धोरण अवलंबविण्यात आले. मात्र पोलिस यंत्रणेत त्याची अंमलबजावी होत नाही, हे जालन्यातील उदाहरणारून स्पष्ट होते. वालसावंगी प्रकरणात तपासात गती भोकरदन तालुक्यातील वालसावंगी येथे दोन चिमुकल्या मुलींचे अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली. या प्रकरणात जिल्हा पोलिस यंत्रणेसह औरंगाबाद परिक्षेत्रातील यंत्रणेनेही तपासाची चक्रे फिरवून आरोपींना तात्काळ अटक करण्यात यश मिळविले.सदरील घटनेनंतर पोलिस अधिकारी, कर्मचार्‍यांचा मोठा फौजफाटा दोन दिवस गावातच तळ ठोकून होता.