शहरं
Join us  
Trending Stories
1
‘स्वर्गाचा दरवाजा उघडलाय!, त्यांना मरण येऊ दे’ नाताळादिवशी झेलेन्स्कींनी केली पुतीन यांच्या मृत्यूची कामना  
2
प्रकाश महाजन शिंदेसेनेत प्रवेश करणार, एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश
3
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
4
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू तरुणाची हत्या, भरबाजारात मारहाण करून घेतला जीव
5
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
6
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
7
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
8
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
9
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
10
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
11
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
12
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
13
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
14
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

गुन्हेगारीने डोके वर काढले

By admin | Updated: May 29, 2014 00:41 IST

जालना : जिल्ह्यात गेल्या महिनाभरात गुन्हेगारी स्वरूपाच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली.

जालना : जिल्ह्यात गेल्या महिनाभरात गुन्हेगारी स्वरूपाच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून खून, हाणामारी, चोर्‍या, लूटमार, बलात्कार, विनयभंग, जातीय तणाव यासारख्या घटना दररोज होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नानेगाव (ता. बदनापूर) येथील सरपंचाचा खुनाच्या घटनेने राज्यभर खळबळ उडाली. त्यापाठोपाठ वालसावंगीतील अल्पवयीन मुलींची हत्या, परतूर तालुक्यातील बाबूलतारा येथील ग्रामस्थांवरील अन्याय, घनसावंगीतील कंडारी काकडी येथील ध्वजप्रकरण तसेच जाफराबाद तालुक्यातील वरूड येथील जातीय तणाव प्रकरण इत्यादी घटनांमुळे जिल्ह्यात असुरक्षित वातावरण निर्माण झाले आहे. जालना शहरातील साळी गल्लीतील खून प्रकरण, शनिमंदिर चौकात भरदिवसा कोयता हातात घेऊन युवकाने दहशत निर्माण केलेला प्रयत्न, याच परिसरात २७ रोजी रात्री चार जणांनी हातात तलवारी घेऊन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. शहरात सकलेचानगर भागात एका व्यापार्‍याची दीड लाखांची बॅग लंपास, इन्कमटॅक्स कॉलनीत भरदिवसा झालेली सव्वा लाखांची चोरी, जुना जालना आनंदवाडी परिसरातील चोरी तसेच काही व्यापार्‍यांची दुकाने फोडण्याचे प्रकार यासारख्या घटनांमुळे सर्वसामान्य व व्यापार्‍यांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. विशेषत: महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाल्याचे चित्र आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून पोलिस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंग ह्या रजेवर आहेत. पोलिस यंत्रणेचा वचक न राहिल्याने अशा घटना वाढत असल्याची प्रतिक्रिया सर्वसामान्य नागरिकांमधून व्यक्त करण्यात येत आहे. (प्रतिनिधी) काद्राबाद भाजीमंडई भागातील एक महिला किराणा दुकान चालवते. या महिलेला दोन मुली आहेत. एका मुलीवर प्रेम जडल्याची सांगत थेट घरात प्रवेश करणार्‍या आरोपीविरोधात सदर बाजार पोलिस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवर काहीच कारवाई झाली नाही. त्यामुळे या महिलेने महापरिक्षेत्र पोलिस अधिकारी यांच्याकडे तक्रार दिली. त्यामुळे १५ दिवसानंतर पाच आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल झाला. महिलांच्या सुरक्षेसाठी शासनाकडून कडक धोरण अवलंबविण्यात आले. मात्र पोलिस यंत्रणेत त्याची अंमलबजावी होत नाही, हे जालन्यातील उदाहरणारून स्पष्ट होते. वालसावंगी प्रकरणात तपासात गती भोकरदन तालुक्यातील वालसावंगी येथे दोन चिमुकल्या मुलींचे अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली. या प्रकरणात जिल्हा पोलिस यंत्रणेसह औरंगाबाद परिक्षेत्रातील यंत्रणेनेही तपासाची चक्रे फिरवून आरोपींना तात्काळ अटक करण्यात यश मिळविले.सदरील घटनेनंतर पोलिस अधिकारी, कर्मचार्‍यांचा मोठा फौजफाटा दोन दिवस गावातच तळ ठोकून होता.