शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

अधिकाºयांसह लाभार्थींवर गुन्हे दाखल होणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2017 00:17 IST

तत्कालीन मुख्याधिकारी दीपक पुजारीसह त्या त्या विभागांच्या स्वच्छता निरीक्षकांची चौकशी करुन आठ दिवसांत अधिकाºयांसह लाभार्थ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी विभागीय आयुक्तांना दिले आहेत.

राजेश भिसे ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शहरात स्वच्छतेचा प्रश्न गंभीर असून राज्य सरकारच्या स्वच्छता महाराष्ट्र मोहिमेंतर्गतच्या शौचालय बांधकामाचे उद्दिष्ट जालना पालिका पूर्ण करु शकलेली नाही. त्यातच २२०० बोगस लाभार्थी दाखवून कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार करीत बँक खात्यात निधी वितरित केला. तत्कालीन मुख्याधिकारी दीपक पुजारीसह त्या त्या विभागांच्या स्वच्छता निरीक्षकांची चौकशी करुन आठ दिवसांत अधिकाºयांसह लाभार्थ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी विभागीय आयुक्तांना दिले आहेत.स्वच्छता हा विषय राज्य सरकारने गांभीर्याने घेतलेला आहे. ‘स्वच्छ महाराष्ट्र’अंतर्गत सार्वजनिक आणि वैयक्तिक शौचालय बांधकामाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. जालना शहर सुरुवातीपासून यात पिछाडीवर आहे. आतापर्यंत दोन ते तीन वेळा उच्चपदस्थ अधिकाºयांनी शहराला भेटी देऊन कामांची पाहणी केली. तसेच विविध नगर पालिकांत कार्यरत असलेल्या सीओंच्या पथकानेही पाहणी करुन याबाबतचा अहवाल वरिष्ठांकडे पाठवला आहे. यात पालिकेचे काम समाधानकारक नसल्याचा अहवाल गेल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून सांगण्यात आले. जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्याकडेच हे खाते असल्याने त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.दोन दिवसांपूर्वी त्यांनी जिल्ह्याची आढावा बैठक घेऊन स्वच्छ महाराष्ट्र अभियान आणि शौचालय बांधकामांचा आढावा घेतला. यात वैयक्तिक शौचालयांच्या कामांबाबत पालिकेच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त करीत संबंधित अधिकाºयांना धारेवर धरले. २२०० लाभार्थी दाखवून त्यांच्या नावे अनुदान वितरित करण्यात आले.ही बाब निदर्शनास आल्यानंतर चौकशीचे आदेश देण्यात आले. १९५० लाभार्थी आढळून आल्याचे पालिका अधिकाºयांचे म्हणणे आहे. यात केवळ २५० लाभार्थी बोगस असल्याचे पालिका अधिकाºयांनी म्हटले आहे.विभागीय आयुक्तांनी या प्रकरणाची आठ दिवसांत चौकशी करुन तत्कालिन मुख्याधिकारी दीपक पुजारी, स्वच्छता निरीक्षक आणि लाभार्थी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश स्वच्छता व पाणी पुरवठा मंत्री लोणीकर यांनी दिले आहेत.