शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
2
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
3
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
4
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
5
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
6
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
7
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
8
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
9
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
10
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
11
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
12
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
13
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
14
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
15
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
16
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
17
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
18
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
19
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
20
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !

फरार कार चालकाविरुध्द गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:02 IST

वाळूज महानगर : दुचाकीस्वार सुरक्षारक्षकास पाठीमागून जोराची धडक देऊन जखमी करणाऱ्या फरार कार चालकाविरुध्द एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा ...

वाळूज महानगर : दुचाकीस्वार सुरक्षारक्षकास पाठीमागून जोराची धडक देऊन जखमी करणाऱ्या फरार कार चालकाविरुध्द एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकाश बुद्दू चव्हाण (५१ रा.तीसगाव) हे ३१ मार्चला सांयकाळी दुचाकी (क्रमांक एमएच २०- बीजे. ९८४३) वर स्वार होऊन घरी चालले होते. सिडको उद्यानाजवळ पांढऱ्या कार क्रमांकाचे चालकाने प्रकाश चव्हाण यांना तुम्ही दिशा सिक्युरिटीचा राजीनामा दिला आहे का, असे विचारताच चव्हाण यांनी राजीनामा न दिल्याचे सांगितले. यानंतर चव्हाण हे दुचाकीवरून घराकडे जात असतांना त्या कारचालकाने पाठीमागून दुचाकीला जोराची धडक देऊन फरार झाला. या अपघातात प्रकाश चव्हाण हे जखमी झाले असून अपघातास कारणीभूत कारचालकाविरुध्द त्यांनी तक्रार दिली आहे.

रमजाननिमित्त फळ विक्रीची दुकाने सजली

वाळूज महानगर : वाळूज महानगर परिसरात रमजाननिमित्त ठिकठिकाणी फळ व खजूर विक्रीची दुकाने सजली आहे. पवित्र रमजान महिन्याचा आज बुधवारी पहिला रोजा असल्याने पंढरपूर, वाळूज, कमळापूर, जोगेश्वरी, रांजणगाव आदी ठिकाणी विक्रेत्यांनी फळ व खजूर विक्रीची दुकाने थाटली आहे. सोशल डिस्टन्सिंग व मास्क परिधान करणाऱ्यांनाच विक्रेते इफ्तारचे साहित्य वाटप करीत असल्याचे चित्र या परिसरात पहावयास मिळत आहे.

लॉकडाऊनमुळे हातावर पोट असणाऱ्यात चिंता

वाळूज महानगर : शासनाच्यावतीने बुधवार (दि.१४) रात्री ८ वाजेपासून लॉकडाऊन जाहीर केल्याने वाळूज उद्योगनगरीतील हातावर पोट असणाऱ्यात चिंतेचे वातावरण पसरले आहे. या परिसरात हमाली, बिगारी व मजुरी करणाºयांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. लॉकडाऊनमुळे रोजगार हिरावला जाणार असल्याने कुटुंबाचे पालन-पोषण कसे करावे याची चिंता अनेकांना सतावत आहे.

मास्क वापरणाऱ्यांची उद्योगनगरीत वाढली संख्या

वाळूज महानगर : वाळूज उद्योगनगरीत विनामास्क फिरणाऱ्याविरुध्द पोलीस प्रशासनाच्यावतीने गुन्हे दाखल केले जात आहेत. या परिसरात वाळूज व एमआयडीसी वाळूज पोलिसांच्यावतीने मुख्य बाजारपेठा व सार्वजनिक ठिकाणी विनामास्क फिरणाऱ्यांना पकडून त्यांच्याविरुध्द गुन्हे दाखल करण्यात येत आहे. पोलीस प्रशासनाच्या या कारवाईमुळे वाळूज महानगर परिसरात मास्क वापरणाऱ्यांच्या संख्येत चांगलीच वाढ झाली आहे.

जोगेश्वरीत विजेचा लंपडाव

वाळूज महानगर : जोगेश्वरीत सतत वीजपुरवठा खंडित होत असल्याने वीज ग्राहक त्रस्त झाले आहेत. या वसाहतीत बहुतांश गरीब कामगारवर्ग वास्तव्यास असून वीज सतत गायब राहत असल्याने ग्राहकात असंतोषाचे वातावरण पसरले आहे. महावितरणकडून वीज बिलाची सक्तीने वसुली केली जात असून वीज बिल न भरणाऱ्या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित केला जात आहे. मात्र वीजपुरवठा सुरळीत करण्यास टाळाटाळ केली जात असल्याने नागरिकात नाराजीचा सूर उमटत आहे.