शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
3
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
4
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
5
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
6
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
7
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
8
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
9
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
10
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
11
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
12
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
13
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
14
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
15
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
16
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
17
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
18
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
19
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
20
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय

फरार कार चालकाविरुध्द गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:02 IST

वाळूज महानगर : दुचाकीस्वार सुरक्षारक्षकास पाठीमागून जोराची धडक देऊन जखमी करणाऱ्या फरार कार चालकाविरुध्द एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा ...

वाळूज महानगर : दुचाकीस्वार सुरक्षारक्षकास पाठीमागून जोराची धडक देऊन जखमी करणाऱ्या फरार कार चालकाविरुध्द एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकाश बुद्दू चव्हाण (५१ रा.तीसगाव) हे ३१ मार्चला सांयकाळी दुचाकी (क्रमांक एमएच २०- बीजे. ९८४३) वर स्वार होऊन घरी चालले होते. सिडको उद्यानाजवळ पांढऱ्या कार क्रमांकाचे चालकाने प्रकाश चव्हाण यांना तुम्ही दिशा सिक्युरिटीचा राजीनामा दिला आहे का, असे विचारताच चव्हाण यांनी राजीनामा न दिल्याचे सांगितले. यानंतर चव्हाण हे दुचाकीवरून घराकडे जात असतांना त्या कारचालकाने पाठीमागून दुचाकीला जोराची धडक देऊन फरार झाला. या अपघातात प्रकाश चव्हाण हे जखमी झाले असून अपघातास कारणीभूत कारचालकाविरुध्द त्यांनी तक्रार दिली आहे.

रमजाननिमित्त फळ विक्रीची दुकाने सजली

वाळूज महानगर : वाळूज महानगर परिसरात रमजाननिमित्त ठिकठिकाणी फळ व खजूर विक्रीची दुकाने सजली आहे. पवित्र रमजान महिन्याचा आज बुधवारी पहिला रोजा असल्याने पंढरपूर, वाळूज, कमळापूर, जोगेश्वरी, रांजणगाव आदी ठिकाणी विक्रेत्यांनी फळ व खजूर विक्रीची दुकाने थाटली आहे. सोशल डिस्टन्सिंग व मास्क परिधान करणाऱ्यांनाच विक्रेते इफ्तारचे साहित्य वाटप करीत असल्याचे चित्र या परिसरात पहावयास मिळत आहे.

लॉकडाऊनमुळे हातावर पोट असणाऱ्यात चिंता

वाळूज महानगर : शासनाच्यावतीने बुधवार (दि.१४) रात्री ८ वाजेपासून लॉकडाऊन जाहीर केल्याने वाळूज उद्योगनगरीतील हातावर पोट असणाऱ्यात चिंतेचे वातावरण पसरले आहे. या परिसरात हमाली, बिगारी व मजुरी करणाºयांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. लॉकडाऊनमुळे रोजगार हिरावला जाणार असल्याने कुटुंबाचे पालन-पोषण कसे करावे याची चिंता अनेकांना सतावत आहे.

मास्क वापरणाऱ्यांची उद्योगनगरीत वाढली संख्या

वाळूज महानगर : वाळूज उद्योगनगरीत विनामास्क फिरणाऱ्याविरुध्द पोलीस प्रशासनाच्यावतीने गुन्हे दाखल केले जात आहेत. या परिसरात वाळूज व एमआयडीसी वाळूज पोलिसांच्यावतीने मुख्य बाजारपेठा व सार्वजनिक ठिकाणी विनामास्क फिरणाऱ्यांना पकडून त्यांच्याविरुध्द गुन्हे दाखल करण्यात येत आहे. पोलीस प्रशासनाच्या या कारवाईमुळे वाळूज महानगर परिसरात मास्क वापरणाऱ्यांच्या संख्येत चांगलीच वाढ झाली आहे.

जोगेश्वरीत विजेचा लंपडाव

वाळूज महानगर : जोगेश्वरीत सतत वीजपुरवठा खंडित होत असल्याने वीज ग्राहक त्रस्त झाले आहेत. या वसाहतीत बहुतांश गरीब कामगारवर्ग वास्तव्यास असून वीज सतत गायब राहत असल्याने ग्राहकात असंतोषाचे वातावरण पसरले आहे. महावितरणकडून वीज बिलाची सक्तीने वसुली केली जात असून वीज बिल न भरणाऱ्या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित केला जात आहे. मात्र वीजपुरवठा सुरळीत करण्यास टाळाटाळ केली जात असल्याने नागरिकात नाराजीचा सूर उमटत आहे.