शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
2
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
3
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
4
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
5
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
6
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
7
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
8
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
9
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
10
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
11
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
12
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
13
VIDEO: दोन बैलांमध्ये भांडण, स्कूटीवाल्या मुलीला बसली जोरदार धडक, ती रस्त्यावर पडली अन् मग...
14
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
15
२०,५००% रिटर्न! बिहारच्या या कंपनीनं ५ वर्षांत ₹१ लाखांचे केले ₹२ कोटी, तुमच्याकडे आहे का?
16
Amit Shah: विक्रमी अमित शाह! 'अशी' कामगिरी करणारे पहिलेच गृहमंत्री, अडवाणींनाही टाकले मागे
17
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
18
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
19
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
20
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...

घरकुल लाभार्थ्यांचे धनादेश अडकले

By admin | Updated: September 23, 2014 23:23 IST

हिंगोली: शहरातील जवळपास १३५ घरकुल लाभार्थ्यांची कामे अंतिम झाली असतानाही त्यांना तिसऱ्या हप्त्याचा धनादेश मिळत नसल्याने मागील सहा महिन्यांपासून हे लाभार्थी न.प.चे खेटे घालत आहेत.

हिंगोली: शहरातील जवळपास १३५ घरकुल लाभार्थ्यांची कामे अंतिम झाली असतानाही त्यांना तिसऱ्या हप्त्याचा धनादेश मिळत नसल्याने मागील सहा महिन्यांपासून हे लाभार्थी न.प.चे खेटे घालत आहेत.शहरात नगरपालिकेकडून जवळपास ४00५ घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे. शासन उद्दिष्टाप्रमाणे व निकषात बसणाऱ्या लाभार्थिंची यात निवड करण्यात आली. यापैकी १६00 घरकुलांचे काम चालू आहे. त्यातील काही कामे अंतिम झाली असून काही अंतिम होण्याच्या मार्गावर आहेत. जोपर्यंत काम पूर्ण होत नाही, तोपर्यंत तिसरा हप्ता द्यायचा नाही, असा नियम घालून दिल्याने अनेकांनी उसनवारी करून आपल्या घरकुलाचे काम पूर्ण केले. काहींनी तर ऐनवेळ साहित्याअभावी काम थांबू नये म्हणून व्याजानेही रक्कम काढली. त्यातच शासनाकडून केवळ सव्वा लाखाची रक्कम लाभार्थीस मिळते. त्यामुळे दोन हप्ते प्रत्येकी ४0 हजारांचे तर तिसरा ४५ हजारांचा अशी विभागणी करण्यात आली आहे. अग्रीम म्हणून व काही काम झाल्यानंतर पूर्वीची रक्कम देण्यात आली. त्यामुळे लाभार्थ्यांनी कामेही वेगात केली. आता तिसरा हप्ता काम पूर्ण केल्यावर मिळणार असल्याने त्या आशेने कामही पूर्ण केले. तरीही मागील सात महिन्यांपासून रक्कम मिळत नाही. काही दिवसांपूर्वी शासन या घरकुल योजनेत वाढीव रक्कम मंजूर करणार असल्याचे सांगितले जात होते. मात्र ज्यांचे बांधकाम पूर्ण झाले नाही, अशांनाच याचा लाभ मिळणार होता. त्यामुळेही काहींनी अंतिम झालेली कामेही दाखविली नव्हती. तर नंतर ही आशा मावळू लागल्याचे दिसताच लाभार्थींनी पालिकेकडे रेटा लावण्यास प्रारंभ केला. पालिकाही रक्कम देण्यास तयार आहे. मात्र तंत्रनिकेतन विद्यालयामार्फत तपासणीअंती काम पूर्ण झाल्याचा अहवाल असल्याशिवाय रक्कम देता येत नाही. ही बाब अडचणीची ठरत आहे. तपासणीच नसल्याने धनादेश काढले जात नाहीत. त्यामुळे लाभार्थी खेटे मारून हैराण आहेत.(वार्ताहर)