शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

मध्यमवर्गाची विश्वासार्हता घसरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:05 IST

औरंगाबाद : जगभरातील प्रत्येक क्रांतीचा निर्माता असणाऱ्या मध्यमवर्गाची विश्वासार्हता घसरली आहे. तो सत्याच्या पाठीशी उभा राहत नाही. प्रसारमाध्यमांबरोबरच ...

औरंगाबाद : जगभरातील प्रत्येक क्रांतीचा निर्माता असणाऱ्या मध्यमवर्गाची विश्वासार्हता घसरली आहे. तो सत्याच्या पाठीशी उभा राहत नाही. प्रसारमाध्यमांबरोबरच लोकशाहीत असलेल्या सर्वच महत्त्वाच्या संस्थांचेही अंध:पतन झाले असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार जयदेव डोळे यांनी केले.

४१ व्या मराठवाडा साहित्य संमेलनात संत जनाबाई व्यासपीठावर पहिला परिसंवाद ‘प्रसारमाध्यमांची विश्वासार्हता शून्यावर आली आहे’, या विषयावर घेण्यात आला. अध्यक्षस्थानी जयदेव डोळे होते. परिसंवादात ‘लोकमत’चे संपादक नंदकिशोर पाटील, उस्मानाबाद येथील रवींद्र केसकर आणि नांदेड येथील वैजीनाथ अनमुलवाड हे सहभागी झाले होते. यावेळी डोळे म्हणाले, समाजातील सर्वाधिक महत्त्वाचा घटक हा मध्यमवर्ग असतो. या मध्यमवर्गाला कोणत्याही गोष्टीचे वावडे राहिले नाही. सर्वाधिक भ्रष्टाचारी असलेल्या प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या विरोधात हा मध्यमवर्ग काहीही बोलत नाही. पूर्वी डावे, उजवे आणि तटस्थ असा प्रकार होता. आता असा काही प्रकार राहिला नाही. सत्य आता शोधावे लागत आहे. त्यामुळे प्रसारमाध्यमांची विश्वासार्हता लयाला पोहचली असल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी रवींद्र केसकर यांनी विविध राष्ट्रीय संस्थांचे हवाले देत प्रिंट मिडियाची विश्वासार्हता ६२ टक्के असल्याचे सांगितले. आजही प्रसारमाध्यमांमध्ये अनेक विश्वासार्ह गोष्टी आहेत. त्यासाठी पैसे देऊन माहिती घेण्याची तयारी श्रोते, नागरिकांना ठेवली पाहिजे, अशी अपेक्षाही व्यक्त केली. वैजनाथ अनमुलवाड यांनी प्रसारमाध्यमांची विश्वासार्हता कमी होत आहे. मात्र, त्यात सुधारणा करण्याची गरज असल्याचेही मत व्यक्त केले. सूत्रसंचालन मनोहर शिरसाट यांनी केले. आभार आशा डांगे यांनी मानले.

चौकट,

प्रादेशिक वृत्तपत्रांची विश्वासार्हता टिकून

यावेळी बोलाताना ‘लोकमत’चे संपादक नंदकिशोर पाटील म्हणाले, कोरोनाच्या काळात काही जागितक स्तरावरील नामांकित संस्थांनी प्रसारमाध्यमांच्या विश्वासार्हतेवर सर्वेक्षण केले होते. त्यात वृत्तपत्रांची विश्वासार्हत ६२ टक्के दाखविण्यात आली. त्याचवेळी फ्रीडम ऑफ भारत प्रेसमध्ये १४२व्या आणि पाकिस्तान १४५ व्या स्थानी होता. तेव्हा केंद्र शासनाने एक समिती नेमली. त्या समितीमध्ये असलेले पी. साईनाथ यांनी देशभरात पत्रकारांच्या झालेल्या हत्यांचा मुद्दा मांडला होता. याकडेही जनतेने लक्ष वेधले पाहिजे. सध्या प्रादेशिक स्तरावरील वृत्तपत्रांची विश्वासार्हता कायम आहे. बीड जिल्ह्यात स्त्रीभ्रूणहत्या प्रकरण एका वार्ताहराने बाहेर काढल्यामुळेच डॉक्टर मुंडेला शिक्षा होऊ शकली. त्या वार्ताहाराच्या पाठीमागे ताकद उभा केल्यामुळेच हे घडल्याचेही पाटील यांनी सांगितले.