शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

धर्मांतर समजून घेण्यासाठी नव्याने इतिहास निर्माण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2016 00:40 IST

लातूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९५६ ला धर्मांतर का केले, हे समजून घ्यायचे असेल तर धर्मांतराचा नवा इतिहास विज्ञानवादी दृष्टीने लिहावा लागेल.

लातूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९५६ ला धर्मांतर का केले, हे समजून घ्यायचे असेल तर धर्मांतराचा नवा इतिहास विज्ञानवादी दृष्टीने लिहावा लागेल. इतिहासाच्या प्राध्यापकांनी हे आव्हान स्वीकारावे, असे मत ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांनी येथे सोमवारी व्यक्त केले. श्रीमती सुशिलादेवी देशमुख महाविद्यालयात ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि बुद्ध धम्म चळवळीची वाटचाल’ या विषयावरील राष्ट्रीय चर्चासत्राच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. नागोराव कुंभार, चित्रकार भ.म. परसवाळे, मुख्य संयोजक प्राचार्य डॉ. बाबासाहेब गोरे, डॉ. अनिल कटारे, डॉ. प्रशांत पुराणिक, प्रशासकीय अधिकारी डॉ. संजय देशमुख, प्रा.डॉ. राजकुमार कांबळे, डॉ. लक्ष्मी धोत्रे, भगवंत क्षीरसागर यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. कसबे म्हणाले, सध्याचा इतिहास राजा-राणींचा आहे. त्यांचे सौंदर्य, वर्णन व घटनांची जंत्री असलेला हा इतिहास आहे. हा इतिहास खराखुरा नाही. मानवाच्या सामाजिक व धार्मिक संघर्षाचा खराखुरा इतिहास लिहिला जात नाही. त्यामुळे इतिहास या ज्ञानशाखेचा मानवी जीवनाशी संबंध तुटला आहे. इतिहास म्हणजे भूतकाळात घडलेल्या घटनांचा वर्तमानात चाललेला संवाद असतो. घटनांची समीक्षा म्हणजे इतिहास. इतिहासकार हा प्रश्न विचारतो म्हणूनच तो वैज्ञानिक असतो, असेही डॉ. रावसाहेब कसबे म्हणाले. जेएनयू विद्यापीठ व रोहित वेमुला प्रकरणाबाबत सडेतोड बोलताना डॉ. कसबे म्हणाले, मोघलांची हांजी हांजी करणारे व ब्रिटिशांचे बूट चाटणाऱ्या लोकांनी आम्हाला देशभक्ती शिकवू नये. जवाहरलाल नेहरू विद्यापीठ भारतातील बुद्धीवाद्यांचे विद्यापीठ आहे, त्याला कलंक लावू नका. हा देश आमचा आहे. आमच्या कष्टकरी, श्रमिकांनी हा देश निर्माण केला आहे. प्राचार्य डॉ. बाबासाहेब गोरे यांनी प्रास्ताविक केले. समन्वयक प्रा.डॉ. राजकुमार कांबळे यांनी चर्चासत्राविषयी माहिती दिली. सूत्रसंचालन प्रा.डॉ. पांडुरंग शितोळे यांनी केले. तर आभार प्रा.डॉ. लक्ष्मी धोत्रे यांनी मानले. (प्रतिनिधी)