शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
2
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
3
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
4
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
5
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
6
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
7
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
8
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
9
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
10
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
11
लातूर : पाठीमागून येणाऱ्या दुचाकीची भयंकर धडक; आई, मुलासह जावयाचा मृत्यू
12
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
13
निक्की आधी बॅटिंगला येऊन पंतचा पुन्हा फ्लॉप शो! Sanjiv Goenka यांनी असा काढला राग
14
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
15
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
16
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
17
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
18
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
19
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
20
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...

धर्मांतर समजून घेण्यासाठी नव्याने इतिहास निर्माण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2016 00:40 IST

लातूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९५६ ला धर्मांतर का केले, हे समजून घ्यायचे असेल तर धर्मांतराचा नवा इतिहास विज्ञानवादी दृष्टीने लिहावा लागेल.

लातूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९५६ ला धर्मांतर का केले, हे समजून घ्यायचे असेल तर धर्मांतराचा नवा इतिहास विज्ञानवादी दृष्टीने लिहावा लागेल. इतिहासाच्या प्राध्यापकांनी हे आव्हान स्वीकारावे, असे मत ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांनी येथे सोमवारी व्यक्त केले. श्रीमती सुशिलादेवी देशमुख महाविद्यालयात ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि बुद्ध धम्म चळवळीची वाटचाल’ या विषयावरील राष्ट्रीय चर्चासत्राच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. नागोराव कुंभार, चित्रकार भ.म. परसवाळे, मुख्य संयोजक प्राचार्य डॉ. बाबासाहेब गोरे, डॉ. अनिल कटारे, डॉ. प्रशांत पुराणिक, प्रशासकीय अधिकारी डॉ. संजय देशमुख, प्रा.डॉ. राजकुमार कांबळे, डॉ. लक्ष्मी धोत्रे, भगवंत क्षीरसागर यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. कसबे म्हणाले, सध्याचा इतिहास राजा-राणींचा आहे. त्यांचे सौंदर्य, वर्णन व घटनांची जंत्री असलेला हा इतिहास आहे. हा इतिहास खराखुरा नाही. मानवाच्या सामाजिक व धार्मिक संघर्षाचा खराखुरा इतिहास लिहिला जात नाही. त्यामुळे इतिहास या ज्ञानशाखेचा मानवी जीवनाशी संबंध तुटला आहे. इतिहास म्हणजे भूतकाळात घडलेल्या घटनांचा वर्तमानात चाललेला संवाद असतो. घटनांची समीक्षा म्हणजे इतिहास. इतिहासकार हा प्रश्न विचारतो म्हणूनच तो वैज्ञानिक असतो, असेही डॉ. रावसाहेब कसबे म्हणाले. जेएनयू विद्यापीठ व रोहित वेमुला प्रकरणाबाबत सडेतोड बोलताना डॉ. कसबे म्हणाले, मोघलांची हांजी हांजी करणारे व ब्रिटिशांचे बूट चाटणाऱ्या लोकांनी आम्हाला देशभक्ती शिकवू नये. जवाहरलाल नेहरू विद्यापीठ भारतातील बुद्धीवाद्यांचे विद्यापीठ आहे, त्याला कलंक लावू नका. हा देश आमचा आहे. आमच्या कष्टकरी, श्रमिकांनी हा देश निर्माण केला आहे. प्राचार्य डॉ. बाबासाहेब गोरे यांनी प्रास्ताविक केले. समन्वयक प्रा.डॉ. राजकुमार कांबळे यांनी चर्चासत्राविषयी माहिती दिली. सूत्रसंचालन प्रा.डॉ. पांडुरंग शितोळे यांनी केले. तर आभार प्रा.डॉ. लक्ष्मी धोत्रे यांनी मानले. (प्रतिनिधी)