शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

सृजनात्मक साहित्य निर्मिती व्हावी

By admin | Updated: February 26, 2017 00:47 IST

जालना बदनापूर तालुक्यातील रोषणगाव येथे पाचवे शेष मराठी ग्रामीण साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते.

गंगाराम आढाव जालनामराठी साहित्य क्षेत्रातील नव कवि आणि लेखकांनी सामाजिक विषयांना भिडले पाहिजे. त्यातून अंगारयुक्त पण सृजनशील साहित्य निर्मितीसाठी सिद्ध बनले पाहिजे असे प्रतिपादन शेष मराठी ग्रामीण साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. डॉ. रावसोहब ढवळे यांनी केले.बदनापूर तालुक्यातील रोषणगाव येथे जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषद जालना, भाषा साहित्य,संस्कृती व संशोधन परिषद बदनापूर आणि उत्कर्ष वाङमय मंडळ बदनापूरच्या वतीने पाचवे शेष मराठी ग्रामीण साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते. या संमेलनाचे उद्घाटन नाट्यलेखक व सिने अभिनेते राजकुमार तांगडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संमेलनाध्यक्ष प्रा. ढवळे, आ. नारायण कुचे, माजी संमेलनाध्यक्ष डॉ. प्रभाकर शेळके, शाहीर अण्णा गाडगे, ज्येष्ठ पत्रकार अंकुशराव देशमुख, पांडुरंग जऱ्हाड, जयप्रकाश चव्हाण, संजय जगदाळे उपस्थित होते.प्रा. ढवळे म्हणाले की, आजचे मराठी साहित्य सृजनात्मक कमी आणि बव्हंशी प्रतिक्रियात्मक बनले आहे. त्यामुळे साहित्य साहित्य म्हणून तरत नाही. नव्या पिढीला, वाचकांना साहित्यांचा लळा लागत नाही. साहित्य निर्मिती किंवा लेखन कला म्हणजे एक आत्मशोध असतो. त्यासाठी प्रचंड निरीक्षण आणि वाचन साधनेची गरज असते.जीवनाच्या सर्व क्षेत्रात भ्रष्टाचार आणि दहशतवाद ही आमची जागतिक समस्या बनली आहे. अमेरिकेतल्या विद्यापीठांनी आज अन्य गोष्टींचे महत्व कमी करून साहित्य संस्कृतीच्या अध्ययनाला महत्व देत असल्याचे सांगून आपल्या देशात प्राचीन मध्ययुगीन, आधुनिक युग आणि त्याचे प्रतिनिधी एकाच घरात सुखाने नांदताना आढळतात. मात्र आता घर घर राहिले नाहीत, लॉजिग - बोर्डींग झालेले आहे हे नाकारून कसे चालणार, समाजातील दरी वाढविणारे हे दंद्व आमचे साहित्य कसे हाताळणार, हा खरा प्रश्न आणि आव्हान आहे. त्यामुळे साहित्यिकांनी अंतर्मुख होवून आधुनिक साहित्यांची वैशिष्ट्य मराठी लेखकांना पचवावी लागतील तरच आम्हाला नव्या वाटा चोखळता येतील. दलित, ग्रामीण, आदिवासी, स्त्रीवादी इ. वाङ्मय प्रवाहात शेती, मातीवर अवलंबून असलेला आमचा मोठा समाज आहे. ही मोठ्या प्रमाणात साहित्य परिघाबाहेर आहे. गटशेती, बचतगट चळवळ, अ‍ॅट्रॉसिटी, माहितीचा अधिकार, महिला कायदे, सक्षमीकरण आदी सामाजिक विषय नव कवि आणि लेखकांना भिडले पाहिजे. त्यातून त्यांनी अंगारयुक्तपण सृजनशील लेखनासाठी सिद्ध बनले पाहिजे, असे आवाहन करून नवलेखकांना लिहिते होण्याची गरज प्रा. डॉ. ढवळे यांनी व्यक्त केली. यावेळी प्रख्यात नाट्य लेखक राजकुमार तांगडे यांनी आपल्या जीवनाचा प्रवास विषद करत, नवलेखकांनी कोणत्याही विषयावर लिहते झाले पाहिजे. त्यासाठी वाचन महत्त्वाचे असल्याचे सांगितले.