शहरं
Join us  
Trending Stories
1
...तोपर्यंत उपोषण, शासन निर्णय फाडणे, होळी करणे थांबवा; छगन भुजबळांचं OBC कार्यकर्त्यांना आवाहन
2
येत्या काही महिन्यात देशात राजकीय बदल होणार; ‘हायड्रोजन बॉम्ब’चा अर्थ काय? २ नेत्यांचे मोठे दावे
3
प्रमोशन दिलं नाही, महिला कर्मचारी बॉसवर संतापली! 'असा' बदला घेतला की सगळेच अवाक् झाले
4
उत्तर प्रदेशात एक खाजगी बस पाण्यात उलटली, एका मुलासह दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
5
निर्बंधांचा परिणाम...! सौदी अरेबियाने या भारतीय कंपनीला कच्च्या तेलाचा पुरवठा रोखला
6
जुलैपासून टेस्लाने किती बुकिंग मिळविली? एलन मस्कनाही अपेक्षित नव्हते...
7
ऐकावं ते नवलच! २४ लाख रुपये खर्चून बनवलेला तलाव चोरीला गेला? शोधून काढणाऱ्याला गावकरी देणार बक्षीस
8
इंडोनेशियात गुलाबी कपडे घालून हातात झाडू घेत हजारोंच्या संख्येने महिला रस्त्यावर का उतरल्या?
9
इस्रायलने प्रक्षेपित केला गुप्तचर उपग्रह, २४ तास शत्रूवर लक्ष ठेवणार
10
टाटा स्टीलसह 'हे' शेअर्स तेजीत! अमेरिकेच्या ‘टॅरिफ’ तणावातही बाजाराची झेप! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ
11
आशिया कप स्पर्धेत हार्दिक पांड्याला मोठा डाव साधण्याची संधी; याआधी फक्त तिघांनी गाठलाय हा पल्ला
12
मारुतीनं 'या' SUV ला खालच्या बाजूला दिले CNG सिलिंडर, मिळणार अख्खा बूट स्पेस; 2 सिलिंडर वाल्या कारचं गणित बिघडणार?
13
अदानींच्या कंपनीचा शेअर पुन्हा 'दम' दाखवणार? ब्रोकरेजच्या मते ₹645 वर जाणार! तुमच्याकडे आहे का?
14
डोनाल्ड ट्रम्प यांचे फासे उलटे पडले; पुतिन यांची तगडी ऑफर, भारत रशियाकडून तेल खरेदी वाढवणार?
15
प्रशांत किशोरांचा निर्णय झाला! ब्राह्मणबहुल मतदारसंघातून उतरणार विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात
16
SIP नं बनाल कोट्यधीश की PPF नं; ₹९५,००० वार्षिक गुंतवणूकीवर कोण बनवेल करोडपती, खरा चॅम्पिअन कोण?
17
AI मुळे नोकऱ्या धोक्यात? 'या' टेक कंपनीने एका झटक्यात ४,००० कर्मचाऱ्यांना काढले बाहेर!
18
आयफोन १७ ची किंमत लीक, जरा थांबा...! किडनी विकावी लागणार की नाही, एवढी असेल...
19
शीना बोरा हत्याकांडात १३ वर्षांनी मोठा ट्विस्ट! इंद्राणी मुखर्जीची मुलगी असं काय बोलली की केसची दिशाच बदलली?
20
मारुतीची नवी व्हिक्टोरिस SUV लॉन्च, फुल टँकमध्ये 1200Km पर्यंत धावणार! 5-स्टार सेफ्टी, 10.25-इंचांचे इंफोटेनमेंट अन् बरंच काही...

सृजनात्मक साहित्य निर्मिती व्हावी

By admin | Updated: February 26, 2017 00:47 IST

जालना बदनापूर तालुक्यातील रोषणगाव येथे पाचवे शेष मराठी ग्रामीण साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते.

गंगाराम आढाव जालनामराठी साहित्य क्षेत्रातील नव कवि आणि लेखकांनी सामाजिक विषयांना भिडले पाहिजे. त्यातून अंगारयुक्त पण सृजनशील साहित्य निर्मितीसाठी सिद्ध बनले पाहिजे असे प्रतिपादन शेष मराठी ग्रामीण साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. डॉ. रावसोहब ढवळे यांनी केले.बदनापूर तालुक्यातील रोषणगाव येथे जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषद जालना, भाषा साहित्य,संस्कृती व संशोधन परिषद बदनापूर आणि उत्कर्ष वाङमय मंडळ बदनापूरच्या वतीने पाचवे शेष मराठी ग्रामीण साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते. या संमेलनाचे उद्घाटन नाट्यलेखक व सिने अभिनेते राजकुमार तांगडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संमेलनाध्यक्ष प्रा. ढवळे, आ. नारायण कुचे, माजी संमेलनाध्यक्ष डॉ. प्रभाकर शेळके, शाहीर अण्णा गाडगे, ज्येष्ठ पत्रकार अंकुशराव देशमुख, पांडुरंग जऱ्हाड, जयप्रकाश चव्हाण, संजय जगदाळे उपस्थित होते.प्रा. ढवळे म्हणाले की, आजचे मराठी साहित्य सृजनात्मक कमी आणि बव्हंशी प्रतिक्रियात्मक बनले आहे. त्यामुळे साहित्य साहित्य म्हणून तरत नाही. नव्या पिढीला, वाचकांना साहित्यांचा लळा लागत नाही. साहित्य निर्मिती किंवा लेखन कला म्हणजे एक आत्मशोध असतो. त्यासाठी प्रचंड निरीक्षण आणि वाचन साधनेची गरज असते.जीवनाच्या सर्व क्षेत्रात भ्रष्टाचार आणि दहशतवाद ही आमची जागतिक समस्या बनली आहे. अमेरिकेतल्या विद्यापीठांनी आज अन्य गोष्टींचे महत्व कमी करून साहित्य संस्कृतीच्या अध्ययनाला महत्व देत असल्याचे सांगून आपल्या देशात प्राचीन मध्ययुगीन, आधुनिक युग आणि त्याचे प्रतिनिधी एकाच घरात सुखाने नांदताना आढळतात. मात्र आता घर घर राहिले नाहीत, लॉजिग - बोर्डींग झालेले आहे हे नाकारून कसे चालणार, समाजातील दरी वाढविणारे हे दंद्व आमचे साहित्य कसे हाताळणार, हा खरा प्रश्न आणि आव्हान आहे. त्यामुळे साहित्यिकांनी अंतर्मुख होवून आधुनिक साहित्यांची वैशिष्ट्य मराठी लेखकांना पचवावी लागतील तरच आम्हाला नव्या वाटा चोखळता येतील. दलित, ग्रामीण, आदिवासी, स्त्रीवादी इ. वाङ्मय प्रवाहात शेती, मातीवर अवलंबून असलेला आमचा मोठा समाज आहे. ही मोठ्या प्रमाणात साहित्य परिघाबाहेर आहे. गटशेती, बचतगट चळवळ, अ‍ॅट्रॉसिटी, माहितीचा अधिकार, महिला कायदे, सक्षमीकरण आदी सामाजिक विषय नव कवि आणि लेखकांना भिडले पाहिजे. त्यातून त्यांनी अंगारयुक्तपण सृजनशील लेखनासाठी सिद्ध बनले पाहिजे, असे आवाहन करून नवलेखकांना लिहिते होण्याची गरज प्रा. डॉ. ढवळे यांनी व्यक्त केली. यावेळी प्रख्यात नाट्य लेखक राजकुमार तांगडे यांनी आपल्या जीवनाचा प्रवास विषद करत, नवलेखकांनी कोणत्याही विषयावर लिहते झाले पाहिजे. त्यासाठी वाचन महत्त्वाचे असल्याचे सांगितले.