शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

जळकोटच्या पाणीपुरवठा योजनेत लबाडी

By admin | Updated: February 2, 2016 00:28 IST

चेतन धनुरे , उदगीर गतवर्षी पूर्णत्वास गेलेल्या जळकोट शहराच्या पूरक पाणीपुरवठा योजनेत अधिकाऱ्यांनी शाब्दिक चलाखी करीत लबाडी केल्याचा आरोप माळहिप्परगा साठवण तलावावरील शेतकऱ्यांनी केला आहे़

चेतन धनुरे , उदगीरगतवर्षी पूर्णत्वास गेलेल्या जळकोट शहराच्या पूरक पाणीपुरवठा योजनेत अधिकाऱ्यांनी शाब्दिक चलाखी करीत लबाडी केल्याचा आरोप माळहिप्परगा साठवण तलावावरील शेतकऱ्यांनी केला आहे़ ही योजना रावणकोळा तलावातून मंजूर करुन घेतली असली तरी ती प्रत्यक्ष माळहिप्परगा तलावातून सुरु आहे़ त्यामुळे येथील पाणी वापर संस्थेच्या सभासदांनी त्यांच्या पिकांना पाणी न मिळाल्याने झालेल्या १ कोटी ४० लाख रुपयांची नुकसान भरपाई संस्थेकडे मागितली आहे़ जळकोट शहरातील पाणीटंचाई लक्षात घेता शासनाने येथे पूरक पाणीपुरवठा योजनेस मंजुरी दिली होती़ १ कोटी ४२ लाख ६१ हजार ९०० रुपये किंमतीच्या या योजनेसाठी जि़प़च्या सहाय्यक भूवैज्ञानिकांनी रावणकोळा साठवण तलावाची शिफारस केली होती़ परंतु, प्रत्यक्षात अधिकारी व ठेकेदारांनी मिळून ही योजना त्यापेक्षा जवळच्या माळहिप्परगा तलावातून राबविल्याचा आरोप येथील कालीमाता पाणीवापर सहकारी संस्थेने केला आहे़ या माध्यमातून जलवाहिनीचे अंतर कमी करुन त्यात आर्थिक भ्रष्टाचार करण्यात आल्याचाही आरोप या संस्थेचा आहे़ माळहिप्परगा येथील साठवण तलावात शिवाजीनगर तांड्याच्या पाणीपुरवठा योजनेसाठी घेण्यात आलेली विहीर अस्तित्वात आहे़ त्यावर कालांतराने रावणकोळा व माळहिप्परगा गावासाठी तात्पुरत्या योजना कार्यान्वित करण्यात आल्या़ आता मागच्या वर्षी याच विहिरीतून जळकोट शहरासाठी योजना राबविण्यात आली आहे़ त्यामुळे जळकोटचा पाणीप्रश्न मार्गी लागला असला तरी या तलावावरील शेतकऱ्यांचे मात्र मोठे आर्थिक नुकसान झाल्याचा दावा करण्यात आला आहे़ त्यामुळे ऐन टंचाई काळात नव्याच वादाला तोंड फुटले आहे़ माळहिप्परगा येथील कालीमाता पाणीवापर संस्थेने माहिती अधिकारात मागविलेल्या माहितीत एकाच विभागाने विसंगत दोन उत्तरे दिल्याचे निदर्शनास आले आहे़ जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे व ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांच्या कार्यालयातून देण्यात आलेल्या कागदपत्रामध्ये ही योजना रावणकोळा साठवण तलावातील विहिरीवरुन असल्याचे प्रपत्र ब मध्ये नमूद करण्यात आले आहे़ हेच प्रपत्र ब याच विभागाच्या जळकोट येथील उपविभागीय अभियंता कार्यालयातून घेतले असता त्यावर खाडाखोड करुन माळहिप्परगा साठवण तलाव केल्याचे दिसून येत आहे़ त्यामुळे अधिकाऱ्यांनीच शब्दच्छल करुन योजनेत लबाडी केल्याचा आरोप होत आहे़