शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

पतींना आवर घाला; नाहीतर फौजदारी

By admin | Updated: August 11, 2016 01:27 IST

औरंगाबाद : महापालिकेतील पन्नासपेक्षा अधिक महिला नगरसेविकांच्या पती, भाऊ, दीर आदींनी प्रशासकीय कामात हस्तक्षेप करू नये, असे आदेश मनपा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी दिले

औरंगाबाद : महापालिकेतील पन्नासपेक्षा अधिक महिला नगरसेविकांच्या पती, भाऊ, दीर आदींनी प्रशासकीय कामात हस्तक्षेप करू नये, असे आदेश मनपा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी दिले आहेत. आयुक्तांच्या या निर्णयाच्या विरोधात बुधवारी सर्वसाधारण सभेत सर्वपक्षीय महिला नगरसेवकांनी महापौरांसह आयुक्तांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. आयुक्तांनी पुन्हा एकदा सभेत पतीराज संपले नाही तर फौजदारी आणि अपात्रतेची कारवाई करण्याचा इशारा दिला. त्यामुळे रणरागिणींनी बिनशर्त माघार घेतली.राज्यपाल विद्यासागर राव शहरात आल्यामुळे त्यांच्या स्वागतासाठी मनपा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया विमानतळावर गेले होते. मनपाच्या सर्वसाधारण सभेत त्यांना येण्यास बराच उशीर झाला. आयुक्तांचे आगमन झाल्यावर सर्व पक्षांच्या नगरसेविकांनी विकासकामांसाठी अधिकाऱ्यांना फोन केल्यास ते हसतात. महिलांचे प्रश्न सोडवत नाहीत. नगरसेविका घरची कामे अधिकाऱ्यांना सांगत नाहीत. जाणीवपूर्वक त्यांना टाळण्यात येते. प्रशासनाने आमच्या पतींवर गुन्हे दाखल करण्यापेक्षा अधिकाऱ्यांवर करावेदादागिरी चालणार नाही...शहरातील सुजाण नागरिकांनी आपले लोकप्रतिनिधी निवडून महापालिकेत पाठविले आहेत. ते जनतेचे सेवक आहेत. आपत्कालीन परिस्थितीत नगरसेविकांना काही कामानिमित्त आयुक्तांकडे यायचे असल्यास त्यांनी काय करावे. सोमवार आणि शुक्रवारची वाट पाहत बसावे का? आयुक्तांची ही दादागिरी सहन करणार नाही. होत नसेल तर काम सोडून द्यावे. केंद्रेकर म्हणून पुन्हा आम्हाला आयुक्त द्या, अशी मागणी राजू शिंदे यांनी केली. त्यांच्या या रुद्र अवतारामुळे सर्वसाधारण सभा काही वेळासाठी तहकूब करावी लागली.पतीच बनले होते नगरसेवकमहापालिकेत काही नगरसेविकांचे पती दिवसभर मुक्काम ठोकून असतात. अधिकाऱ्यांच्या कक्षातही ते नगरसेवक म्हणूनच मिरवतात. काहींनी तर स्वत:च्या नावाचे व्हिजिटिंग कार्ड तयार केले आहेत. त्यावर आपणच नगरसेवक असल्याचे लिहिले आहे. मागील आठवड्यात आयुक्तांकडे एका नगरसेविकेचे पती पोहोचले. त्यांनी स्वत:ला नगरसेवक असल्याचे सांगितले. बकोरिया यांनी त्यांना वॉर्ड क्रमांक विचारला. त्यानंतर यादी तपासली तर संबंधित वॉर्डात महिला नगरसेविका असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी ‘पतीराज’पद्धत मोडून काढण्याचा निर्णय घेतला. यापुढे नगरसेविकांचे पती मनपात दिसून आल्यास त्यांच्यावर थेट अपात्रतेची कारवाई करण्यात येईल, अशी घोषणाच आयुक्तांनी केली होती.