शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा तुर्कीला दणका, विमानतळांवर सेवा देणाऱ्या सेलेबी कंपनीची सुरक्षा मंजुरी केली रद्द!
2
ED Raid: 23 कोटींचं सोनं, 8 कोटी रोख; वसई विरार मनपाचे नगररचना उपसंचालक रेड्डीकडे सापडली कोट्यवधींची माया
3
Donald Trump : "मी असं म्हणत नाही की..."; भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठे दावे करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची पलटी
4
सुटी रद्द झाल्याने कामावर परतणाऱ्या मेजरवर काळाचा घाला; डोळ्यादेखत पत्नीचा मृत्यू, लेक गंभीर जखमी
5
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
6
'गदर'मधला दरम्यान सिंग आठवतोय का? एका आजारामुळे झालं होत्याचं नव्हतं, अभिनेत्याचा झाला दुर्देवी शेवट
7
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
8
इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; 'लेडी सेहवाग'ला मिळाली कमबॅकची संधी
9
अटक करण्याची धमकी देत मागितली खंडणी: उल्हासनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस निलंबित
10
Crime: निवृत्त न्यायाधीशाच्या दोन मुले आणि सुनेला जन्मठेपेची शिक्षा; 2007 मधील प्रकरण काय?
11
Motivational Story: वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश
12
आश्चर्यकारक! आरोपीने बलात्कार पिडितेला भरकोर्टात केलं 'प्रपोज'; सर्वोच्च न्यायालयातील प्रसंग
13
"बेटा, सरेंडर कर", दहशतवाद्याने चकमकीआधी आईला केलेला Video कॉल; तिने समजावलं पण...
14
Shahapur: डोंगरावरून उडणारा ड्रोन अचानक कोसळला अन् गावात उडाली खळबळ; तो ड्रोन कोणाचा?
15
Nagpur: संधी मिळताच प्रवाशांना लुटायचे, रेल्वे स्थानकांवर चोऱ्या करणारी टोळी अटकेत
16
Ganeshotsav 2025: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मूर्तिकारांसाठी बीएमसीची महत्त्वाची पोस्ट
17
"बॉलिवूडमध्ये मंदी आली आहे, छोट्या कलाकारांकडे तर...", कल्कि कोचलीनचा खुलासा
18
प्रीतीचा 'मोहरा' विमानातून उतरला जयपूरमध्ये अन् त्याचं लगेज पोहचलं बंगळुरुला; मग भाऊनं असा काढला राग
19
Train Accident: अमळनेरला मालगाडीचे सहा डबे रुळावरून घसरले, सुरत-भुसावळ मार्गावरील वाहतूक ठप्प
20
'लापता लेडीज'च्या 'फूल'ची कान्समध्ये एन्ट्री, नितांशीच्या वेणीमध्ये 'या' ८ अभिनेत्रींचे फोटो

देशातील सर्वात मोठी ‘लँडबँक’ डीएमआयसीमध्ये

By admin | Updated: August 2, 2016 00:26 IST

औरंगाबाद : देशातील सर्वात मोठी इंडस्ट्रीयल ‘लँडबँक’ दिल्ली- मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर (डीएमआयसी) मध्ये असून, आंतरराष्ट्रीय उद्योग या जागेत येणार

औरंगाबाद : देशातील सर्वात मोठी इंडस्ट्रीयल ‘लँडबँक’ दिल्ली- मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर (डीएमआयसी) मध्ये असून, आंतरराष्ट्रीय उद्योग या जागेत येणार असल्याने मराठवाड्याच्या विकासाला मोठी चालना मिळणार असल्याचे मत विभागीय आयुक्त डॉ.उमाकांत दांगट यांनी सोमवारी व्यक्त केले.एमआयडीसी (महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ) च्या ५४ व्या वर्धापन दिनानिमित्त संत एकनाथ रंगमंदिर येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर विशेष पोलीस महानिरीक्षक अजित पाटील, सिनेदिग्दर्शक राजदत्त, मुख्य अभियंता केदार नागपुरे, कार्यकारी अभियंता रवींद्र कुलकर्णी, राहुल तिडके, प्रादेशिक अधिकारी सोहम वायाळ, बाळासाहेब चव्हाण यांची उपस्थिती होती. दांगट म्हणाले, एमआयडीसी शासनाचे भूषण आहे. या महामंडळाची व्याप्ती वाढली आहे. ८५ हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र या महामंडळाकडे आहे. डीएमआयसीसाठी १० हजार एकर जमीन संपादित करून दिली. परदेशी गुंतवणूक होईलच, शिवाय स्थानिक उद्योगांनादेखील मोठ्या प्रमाणात संधी तेथे मिळेल. जमीन, दळणवळण, पाणी, वीज आणि कुशल मनुष्यबळामुळे हा विभाग समृद्धीकडे जाणार आहे. परदेशी गुंतवणूक मोठ्या प्रमाणात होणार आहे. महसूल, पोलीस, महावितरण, जलसंपदा, कृषी आणि एमआयडीसीने एकत्रितपणे काम केल्यास एकात्मिक विकासाचा मार्ग निर्माण होईल. सिनेदिग्दर्शक राजदत्त म्हणाले, व्यक्तीचा आणि समाजाचा विकास व्हायचा असेल तर उद्योग पाहिजेत. उद्योग स्थिरतेतून व्यक्ती विकास होण्यास मदत होते. मुख्य अभियंता नागपुरे म्हणाले, राज्य, जिल्हा, तालुका, ग्रामपातळीवर उद्योग विकासासाठी एमआयडीसीची स्थापना झाली आहे. तालुके आणि गावापर्यंत उद्योगवाढीला चालना मिळाली पाहिजे. तालुक्यांपर्यंत एमआयडीसी जावी, तोपर्यंत हे महामंडळ असण्याची गरज आहे. याप्रसंगी एमआयडीसीतील गुणवतं विद्यार्थ्यांचा, २५ वर्षे महामंडळात ज्यांनी सेवा केली, त्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. मनोगत व्यक्त करताना काही कर्मचाऱ्यांनी पाल्यांसाठी एमआयडीसीने भूखंड आरक्षित ठेवण्याची मागणी केली. अतिक्रमणे हटविणारविशेष पोलीस महानिरीक्षक पाटील म्हणाले, औद्योगिक विकासासाठी स्थैर्य हवे असेल तर कायदा व सुव्यवस्था सुरळीत असणे गरजेचे आहे. उद्योगांना पोलीस संरक्षण त्यासाठी गरजेचे असते. ४उद्योगांना पायाभूत सुविधा देणे गरजेचे आहे. एमआयडीसीला स्वत:च्या उत्पन्नातून निधी उभारावा लागतो. उद्योगांना संरक्षण आणि औद्योगिक आरक्षित जागांवर झालेले अतिक्रमण काढण्यासाठी पोलीस यंत्रणा एमआयडीसीला मदत करील.