शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

देश परदेश/देशव्यापी बंद

By | Updated: November 28, 2020 04:04 IST

नवी दिल्ली : १० केंद्रीय कामगार संघटनांनी पुकारलेल्या ‘भारत बंद’मुळे केरळ, ओडिशा, पुडुचेरी, आसाम आणि तेलंगणा या राज्यांत संपूर्ण ...

नवी दिल्ली : १० केंद्रीय कामगार संघटनांनी पुकारलेल्या ‘भारत बंद’मुळे केरळ, ओडिशा, पुडुचेरी, आसाम आणि तेलंगणा या राज्यांत संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले. या भागांत कडकडीत बंद पाळण्यात आला. २५ कोटी कामगार बंदमध्ये सहभागी झाल्याचा दावा कामगार संघटनांनी केला.

नवीन कृषी कायदे आणि कामगार कायद्यांच्या विरोधात हा बंद पुकारण्यात आला होता. इतरही अनेक मागण्या संघटनांनी केल्या आहेत.

संघटनांच्या वतीने जारी करण्यात आलेल्या संयुक्त निवेदनात म्हटले आहे की, केरळ, पुडुचेरी, ओडिशा, आसाम, तेलंगणा, झारखंड, छत्तीसगड या राज्यांत कडकडीत बंद पाळण्यात आला. तामिळनाडूच्या १३ जिल्ह्यांत बंदचा प्रभाव राहिला. पंजाब आणि हरियाणात बस सेवा बंद राहिली. प. बंगाल आणि त्रिपुरातील जनजीवन विस्कळीत झाले. प. बंगालमध्ये तुरळक स्वरूपात हिंसक घटना घडल्या. अनेक राज्यांत बँकिंग सेवेवर परिणाम झाला.

या आंदोलनाचे नेतृत्व इंटक, आयटक, हिंद मजदूर सभा, सिटू, एआयटक, टीयूसीसी आणि सेवा या संघटनांच्या शिखर संस्थेने केले. इतरही अनेक संघटना बंदमध्ये सहभागी झाल्या. भाजपाशी संलग्न असलेला भारतीय मजदूर संघ मात्र बंदमध्ये सहभागी नव्हता.

हिंद मजदूर सभेचे सरचिटणीस हरभजनसिंग सिद्धू यांनी सांगितले की, २५ कोटींपेक्षा जास्त कामगार आंदोलनात सहभागी झाले. खाण, संरक्षण, रेल्वे आणि इतर सार्वजनिक क्षेत्रातील कामगारही आंदोलनात सहभागी झाले.

सिद्धू यांनी सांगितले की, वीज कामगार, घरगुती कामगार, बांधकाम कामगार, बिडी कामगार, फेरीवाले, शेतमजूर, रिक्षावाले व इतर वाहन चालक तसेच स्वयंरोजगारप्राप्त व्यावसायिक असे सर्व स्तरातील कामगार बंदमध्ये सहभागी झाले.

...........................