शहरं
Join us  
Trending Stories
1
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
2
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
3
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
4
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
5
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
6
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
7
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
8
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
9
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
10
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
11
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
12
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
13
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
14
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
15
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
16
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
17
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
18
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
19
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
20
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी

देश परदेश/देशव्यापी बंद

By | Updated: November 28, 2020 04:04 IST

नवी दिल्ली : १० केंद्रीय कामगार संघटनांनी पुकारलेल्या ‘भारत बंद’मुळे केरळ, ओडिशा, पुडुचेरी, आसाम आणि तेलंगणा या राज्यांत संपूर्ण ...

नवी दिल्ली : १० केंद्रीय कामगार संघटनांनी पुकारलेल्या ‘भारत बंद’मुळे केरळ, ओडिशा, पुडुचेरी, आसाम आणि तेलंगणा या राज्यांत संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले. या भागांत कडकडीत बंद पाळण्यात आला. २५ कोटी कामगार बंदमध्ये सहभागी झाल्याचा दावा कामगार संघटनांनी केला.

नवीन कृषी कायदे आणि कामगार कायद्यांच्या विरोधात हा बंद पुकारण्यात आला होता. इतरही अनेक मागण्या संघटनांनी केल्या आहेत.

संघटनांच्या वतीने जारी करण्यात आलेल्या संयुक्त निवेदनात म्हटले आहे की, केरळ, पुडुचेरी, ओडिशा, आसाम, तेलंगणा, झारखंड, छत्तीसगड या राज्यांत कडकडीत बंद पाळण्यात आला. तामिळनाडूच्या १३ जिल्ह्यांत बंदचा प्रभाव राहिला. पंजाब आणि हरियाणात बस सेवा बंद राहिली. प. बंगाल आणि त्रिपुरातील जनजीवन विस्कळीत झाले. प. बंगालमध्ये तुरळक स्वरूपात हिंसक घटना घडल्या. अनेक राज्यांत बँकिंग सेवेवर परिणाम झाला.

या आंदोलनाचे नेतृत्व इंटक, आयटक, हिंद मजदूर सभा, सिटू, एआयटक, टीयूसीसी आणि सेवा या संघटनांच्या शिखर संस्थेने केले. इतरही अनेक संघटना बंदमध्ये सहभागी झाल्या. भाजपाशी संलग्न असलेला भारतीय मजदूर संघ मात्र बंदमध्ये सहभागी नव्हता.

हिंद मजदूर सभेचे सरचिटणीस हरभजनसिंग सिद्धू यांनी सांगितले की, २५ कोटींपेक्षा जास्त कामगार आंदोलनात सहभागी झाले. खाण, संरक्षण, रेल्वे आणि इतर सार्वजनिक क्षेत्रातील कामगारही आंदोलनात सहभागी झाले.

सिद्धू यांनी सांगितले की, वीज कामगार, घरगुती कामगार, बांधकाम कामगार, बिडी कामगार, फेरीवाले, शेतमजूर, रिक्षावाले व इतर वाहन चालक तसेच स्वयंरोजगारप्राप्त व्यावसायिक असे सर्व स्तरातील कामगार बंदमध्ये सहभागी झाले.

...........................