शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
2
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
3
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
4
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
5
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
6
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
7
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
8
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
9
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
10
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
11
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
12
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
13
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
14
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
15
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
16
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
17
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
18
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
19
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
20
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली

देशाला सावरकरांच्या विचारांची गरज

By admin | Updated: March 14, 2016 00:41 IST

उस्मानाबाद : देश चहुबाजूने शत्रू राष्ट्राच्या कारवायांमुळे अडचणीत असताना व देशात अतिरेकी कारवाया घडत असताना देशातील तरुणांच्या मनात राष्ट्रप्रेम जागृत करण्यासाठी

उस्मानाबाद : देश चहुबाजूने शत्रू राष्ट्राच्या कारवायांमुळे अडचणीत असताना व देशात अतिरेकी कारवाया घडत असताना देशातील तरुणांच्या मनात राष्ट्रप्रेम जागृत करण्यासाठी आज स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांची गरज असल्याचे मत सावरकर यांच्या जीवन चरित्राचे अभ्यासक वा. ना. उत्पात (पंढरपूर) यांनी व्यक्त केले. शनिवारी स्वा. सावरकर मध्यवर्ती जयंती समितीच्या वतीने शहरातील श्रीपतराव भोसले हायस्कूल येथे आयोजित ‘स्वातंत्र्यवीर सावरकर एक धगधगते यज्ञकुंड’ या विषयावरील व्याख्यान कार्यक्रमात बोलत होते. यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुधीर पाटील, सहसंपर्कप्रमुख अनिल खोचरे, समितीचे अध्यक्ष उमाकांत कुलकर्णी, सचिव पांडुरंग पवार, बाबूराव पूजारी आदींची उपस्थिती होती. यावेळी उत्पात यांनी सावरकरांच्या जीवन चरित्रातील अनेक प्रसंग सांगितले. आंदमानमध्ये काळ्यापाण्याची शिक्षा भोगत असताना सावरकरांनी काव्यप्रतिभा जागृत ठेवली व ‘कमला’ हे महाकाव्य निर्माण केले. १४ वर्षाच्या बंदीवासानंतर सावरकरांची राजकारण न करण्याच्या अटीवर ब्रिटीशांनी मुक्तता करून त्यांना रत्नागिरीत स्थानबध्द केले. परंतु, त्यांनी सामाजिक कार्याच्या आधारे येथे देखील आपली चळवळ सुरूच ठेवली होती, असे उत्पात म्हणाले. रत्नागिरीच्या स्थानबध्दतेत त्यांनी अस्पृश्यता निवारणासाठी सहभोजन, अस्पृश्यांसाठी हॉटेल उघडले, मंदिर प्रवेशासाठी पतीत पावन मंदिराची निर्मिती आदी समाजोध्दाराचे कार्य सावरकरांनी केले. अन्य कुठल्याही तत्कालीन काँग्रेस नेत्यांनी सावरकरांइतका ब्रिटीशांचा अन्याय सहन केला नाही. सावरकर हे थोर साहित्यिक, महान कवी, क्रांतीकारक होते. त्यांनी भाषा शुद्धीचे व मराठी साहित्यामध्ये मोलाचे योगदान दिले. आज देखील रायगडावर स्वातंत्र्यवीर सावरकर रचित शिवरायांची आरती म्हटली जाते, असे त्यांनी सांगितले. प्रास्ताविकात जयंती समितीचे अध्यक्ष उमाकांत कुलकर्णी यांनी या कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका विषद केली. यावेळी समितीकडून वर्षभर राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती त्यांनी दिली. सूत्रसंचालन सुवर्णा कांबळे यांनी तर आभार सचिव पांडुरंग पवार यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाची सांगता गीताताई कोंडो यांच्या वंदे मातरम् गीताने झाली. यावेळी नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.