शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
3
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
4
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
5
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
6
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
7
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
8
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
9
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
10
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
11
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
12
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
13
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
14
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
15
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
16
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
17
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
18
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
19
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
20
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप

देशाला सावरकरांच्या विचारांची गरज

By admin | Updated: March 14, 2016 00:41 IST

उस्मानाबाद : देश चहुबाजूने शत्रू राष्ट्राच्या कारवायांमुळे अडचणीत असताना व देशात अतिरेकी कारवाया घडत असताना देशातील तरुणांच्या मनात राष्ट्रप्रेम जागृत करण्यासाठी

उस्मानाबाद : देश चहुबाजूने शत्रू राष्ट्राच्या कारवायांमुळे अडचणीत असताना व देशात अतिरेकी कारवाया घडत असताना देशातील तरुणांच्या मनात राष्ट्रप्रेम जागृत करण्यासाठी आज स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांची गरज असल्याचे मत सावरकर यांच्या जीवन चरित्राचे अभ्यासक वा. ना. उत्पात (पंढरपूर) यांनी व्यक्त केले. शनिवारी स्वा. सावरकर मध्यवर्ती जयंती समितीच्या वतीने शहरातील श्रीपतराव भोसले हायस्कूल येथे आयोजित ‘स्वातंत्र्यवीर सावरकर एक धगधगते यज्ञकुंड’ या विषयावरील व्याख्यान कार्यक्रमात बोलत होते. यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुधीर पाटील, सहसंपर्कप्रमुख अनिल खोचरे, समितीचे अध्यक्ष उमाकांत कुलकर्णी, सचिव पांडुरंग पवार, बाबूराव पूजारी आदींची उपस्थिती होती. यावेळी उत्पात यांनी सावरकरांच्या जीवन चरित्रातील अनेक प्रसंग सांगितले. आंदमानमध्ये काळ्यापाण्याची शिक्षा भोगत असताना सावरकरांनी काव्यप्रतिभा जागृत ठेवली व ‘कमला’ हे महाकाव्य निर्माण केले. १४ वर्षाच्या बंदीवासानंतर सावरकरांची राजकारण न करण्याच्या अटीवर ब्रिटीशांनी मुक्तता करून त्यांना रत्नागिरीत स्थानबध्द केले. परंतु, त्यांनी सामाजिक कार्याच्या आधारे येथे देखील आपली चळवळ सुरूच ठेवली होती, असे उत्पात म्हणाले. रत्नागिरीच्या स्थानबध्दतेत त्यांनी अस्पृश्यता निवारणासाठी सहभोजन, अस्पृश्यांसाठी हॉटेल उघडले, मंदिर प्रवेशासाठी पतीत पावन मंदिराची निर्मिती आदी समाजोध्दाराचे कार्य सावरकरांनी केले. अन्य कुठल्याही तत्कालीन काँग्रेस नेत्यांनी सावरकरांइतका ब्रिटीशांचा अन्याय सहन केला नाही. सावरकर हे थोर साहित्यिक, महान कवी, क्रांतीकारक होते. त्यांनी भाषा शुद्धीचे व मराठी साहित्यामध्ये मोलाचे योगदान दिले. आज देखील रायगडावर स्वातंत्र्यवीर सावरकर रचित शिवरायांची आरती म्हटली जाते, असे त्यांनी सांगितले. प्रास्ताविकात जयंती समितीचे अध्यक्ष उमाकांत कुलकर्णी यांनी या कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका विषद केली. यावेळी समितीकडून वर्षभर राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती त्यांनी दिली. सूत्रसंचालन सुवर्णा कांबळे यांनी तर आभार सचिव पांडुरंग पवार यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाची सांगता गीताताई कोंडो यांच्या वंदे मातरम् गीताने झाली. यावेळी नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.