शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
3
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
4
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
5
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
6
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
7
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
8
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
9
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
10
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
11
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
12
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
13
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
14
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
15
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
16
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
17
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
18
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
19
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
20
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
Daily Top 2Weekly Top 5

देशाला सावरकरांच्या विचारांची गरज

By admin | Updated: March 14, 2016 00:41 IST

उस्मानाबाद : देश चहुबाजूने शत्रू राष्ट्राच्या कारवायांमुळे अडचणीत असताना व देशात अतिरेकी कारवाया घडत असताना देशातील तरुणांच्या मनात राष्ट्रप्रेम जागृत करण्यासाठी

उस्मानाबाद : देश चहुबाजूने शत्रू राष्ट्राच्या कारवायांमुळे अडचणीत असताना व देशात अतिरेकी कारवाया घडत असताना देशातील तरुणांच्या मनात राष्ट्रप्रेम जागृत करण्यासाठी आज स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांची गरज असल्याचे मत सावरकर यांच्या जीवन चरित्राचे अभ्यासक वा. ना. उत्पात (पंढरपूर) यांनी व्यक्त केले. शनिवारी स्वा. सावरकर मध्यवर्ती जयंती समितीच्या वतीने शहरातील श्रीपतराव भोसले हायस्कूल येथे आयोजित ‘स्वातंत्र्यवीर सावरकर एक धगधगते यज्ञकुंड’ या विषयावरील व्याख्यान कार्यक्रमात बोलत होते. यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुधीर पाटील, सहसंपर्कप्रमुख अनिल खोचरे, समितीचे अध्यक्ष उमाकांत कुलकर्णी, सचिव पांडुरंग पवार, बाबूराव पूजारी आदींची उपस्थिती होती. यावेळी उत्पात यांनी सावरकरांच्या जीवन चरित्रातील अनेक प्रसंग सांगितले. आंदमानमध्ये काळ्यापाण्याची शिक्षा भोगत असताना सावरकरांनी काव्यप्रतिभा जागृत ठेवली व ‘कमला’ हे महाकाव्य निर्माण केले. १४ वर्षाच्या बंदीवासानंतर सावरकरांची राजकारण न करण्याच्या अटीवर ब्रिटीशांनी मुक्तता करून त्यांना रत्नागिरीत स्थानबध्द केले. परंतु, त्यांनी सामाजिक कार्याच्या आधारे येथे देखील आपली चळवळ सुरूच ठेवली होती, असे उत्पात म्हणाले. रत्नागिरीच्या स्थानबध्दतेत त्यांनी अस्पृश्यता निवारणासाठी सहभोजन, अस्पृश्यांसाठी हॉटेल उघडले, मंदिर प्रवेशासाठी पतीत पावन मंदिराची निर्मिती आदी समाजोध्दाराचे कार्य सावरकरांनी केले. अन्य कुठल्याही तत्कालीन काँग्रेस नेत्यांनी सावरकरांइतका ब्रिटीशांचा अन्याय सहन केला नाही. सावरकर हे थोर साहित्यिक, महान कवी, क्रांतीकारक होते. त्यांनी भाषा शुद्धीचे व मराठी साहित्यामध्ये मोलाचे योगदान दिले. आज देखील रायगडावर स्वातंत्र्यवीर सावरकर रचित शिवरायांची आरती म्हटली जाते, असे त्यांनी सांगितले. प्रास्ताविकात जयंती समितीचे अध्यक्ष उमाकांत कुलकर्णी यांनी या कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका विषद केली. यावेळी समितीकडून वर्षभर राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती त्यांनी दिली. सूत्रसंचालन सुवर्णा कांबळे यांनी तर आभार सचिव पांडुरंग पवार यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाची सांगता गीताताई कोंडो यांच्या वंदे मातरम् गीताने झाली. यावेळी नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.