शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."
7
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
8
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
9
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
10
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
11
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
12
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
13
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
14
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
15
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
16
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
17
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
18
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
19
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
20
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?

देशाला शांती अन् प्रेमाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2017 00:33 IST

सर्वांना मानवतेचा संदेश देण्यासाठी जमिअत उलमा-ए-हिंदतर्फे रविवारी जालना शहरात काढण्यात आलेल्या मूक अमन मार्चला मोठा प्रतिसाद मिळाला

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : सर्वांना मानवतेचा संदेश देण्यासाठी जमिअत उलमा-ए-हिंदतर्फे रविवारी जालना शहरात काढण्यात आलेल्या मूक अमन मार्चला मोठा प्रतिसाद मिळाला. हजारो मुस्लीम बांधवांनी यात सहभाग घेत सामाजिक सलोखा व राष्ट्रीय एकतेचा संदेश दिला.अमन मार्चमध्ये सहभागी होण्यासाठी ग्रामीण भागातील मुस्लीम बांधव सकाळपासून शहरात दाखल झाले होते. दुपारी बारा वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अमन मार्चला सुरुवात करण्यात आली. मार्चमध्ये सर्वात पुढे लहान मुले चालत होती.रस्त्याच्या दोन्ही बाजूला स्वयंसेवकांनी मानवी साखळी केल्याचे दिसून आले.हातात राष्ट्रीय एकता व सामाजिक एकतेचा संदेश देणारे फलक घेतलेल्या युवकांचा मार्चमध्ये मोठ्या संख्येने सहभाग दिसून आला. ठिकठिकाणी पाणी व अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती. मार्चमध्ये सहभागी प्रत्येक जण शिस्तीचे पालन करताना दिसून आले.कादराबाद, फूल बाजार, मामा चौक, गरीबशहा बाजार, मस्तगड, गांधीचमन मार्गे काढण्यात आलेल्या मार्चचे टॉऊन हॉल परिसरात सभेत रुपांतर झाले. या ठिकाणी राज्यमंत्री अर्जुन खोतकर, माजी नगराध्यक्ष भास्कर अंबेकर, उपनगराध्यक्ष राजेश राऊत, सुधाकर निकाळजे, राजेंद्र राख, अब्दुल रशीद, जमाते इस्लामीचे अब्दूल मुजीब, अण्णा चितेकर यांनी मनोगत व्यक्त केले. राज्यमंत्री खोतकर म्हणाले, की स्वातंत्र्याच्या चळवळीत जमिअत उलमाचे मोठे योगदान राहिले आहे.देशात आज सामाजिक सलोख्याची गरज आहे. जमिअत उलमाचे शहराध्यक्ष मुफ्ती रहेमान यांनी मार्गदर्शन करताना सांगितले, की हा अमन मार्च सर्व जाती धर्मांचा आहे. देशात असहिष्णुता वाढत असून, वातावरण असुरक्षित बनत आहे. अमन मार्चच्या माध्यमातून देशात शांती, राष्ट्रीय एकात्मता व सामाजिक सलोखा निर्माण करण्याचा आमचा उद्देश असल्याचे ते म्हणाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष हसन काशमी, एकबाल पाशा यांनी मार्गदर्शन केले. या वेळी पावसासाठी सामुहिक प्रार्थना करण्यात आली. राष्ट्रगीतानाने अमन मार्चची सांगता झाली. या अमन मार्चसाठी मुफ्ती फहीम, शाहआलम खान, शेख महेमूद, माजेद शेख, अ‍ॅड. सय्यद अमजद, मोहसीन शेख, अख्तर शेख, आमर पाशा आदींनी पुढाकार घेतला.