शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon update: यंदाची दिवाळी पावसातच जाणार का? मान्सून भारतातून कधी परत जाणार?
2
डोनाल्ड ट्रम्प अन् इलॉन मस्कची 'दिलजमाई' झाली? चार्ली किर्कच्या शोकसभेत दिसले एकत्र! ‘तो’ एक फोटो चर्चेत
3
FD-RD विसरुन जाल, LIC ची ही स्कीम आहे जबरदस्त, मुलीच्या लग्नासाठी मिळेल २७ लाखांची रक्कम
4
आम्ही गरिबीत, तुमची मौज का? आणखी एका देशात लोक रस्त्यावर; जनतेच्या पैशाची लूट, पसरला असंतोष
5
बगराम तळावरून सुरु झाला नवा संघर्ष? डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीवर तालिबानचे प्रत्युत्तर
6
शेअर बाजारात मोठी घसरण, Sensex ४७५ अंकानी आपटला; Nifty मध्येही घसरण, IT शेअर्समध्ये जोरदार विक्री
7
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर नवदुर्गा कृपा, पद-पैसा-लाभ; अकल्पनीय यश, अनपेक्षित भरभराट!
8
"आता जे गरजेचं ते करावंच लागेल"; सरसंघचालक भागवत अमेरिकेच्या टॅरिफ आणि 'एच१ बी'बद्दल स्पष्टच बोलले 
9
Mumbai: गावी जाण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्यानं पत्नीची हत्या; कांदिवली येथील घटना!
10
देवोलिना भट्टाचार्जी पुन्हा प्रेग्नंट? फोटोशूटवरुन चर्चांना उधाण; ९ महिन्यांपूर्वीच दिला मुलाला जन्म
11
नौशादनं 'आकाश' बनून फसवलं, एका मुलाच्या आईसोबत लग्न केलं अन् ४ मित्रांसोबत मिळून...; घटना ऐकून येईल चीड!
12
आजपासून 'GST' उत्सव! मध्यम वर्गाला होणार मोठा फायदा; खरेदी वाढणार, अर्थव्यवस्थेला बूस्टर मिळणार
13
पाकिस्तानच्या नाकी नऊ आणणाऱ्या अभिषेक शर्माचा नावावर विश्वविक्रमाची नोंद, युवराजलाही टाकले मागे
14
GST कपातीनंतर आता कोणत्या वस्तूंवर सर्वाधिक टॅक्स?; यादी वाचा, अन्यथा खिशाला बसेल झळ
15
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते 'मिशन शक्ती ५.०'चा शुभारंभ; महिला सुरक्षेवर भर, पोलिसांत महिलांचा सहभाग वाढला!
16
युक्रेनचा रशियावर ड्रोन हल्ला! क्रिमिया रिसॉर्टवरील हल्ल्यात २ जणांचा मृत्यू, १५ जण गंभीर जखमी
17
Eknath Shinde: जीएसटी सुधारणांमुळे उत्पादन आणि रोजगार वाढेल- एकनाथ शिंदे
18
'दशावतार'चे १० दिवस, कमावले 'इतके' कोटी, एकूण कमाईचा आकडा वाचून वाटेल अभिमान
19
H-1B व्हिसाने हैराण झालेल्यांना चीनची ऑफर; भारतीयांसाठीही मोठी संधी! काय आहे नवा ‘के- व्हिसा’?
20
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले; ४० पेक्षा अधिक वेळा ट्रम्प यांचा दावा, आता तरी नोबेल द्या

देश समृध्द करणारा अर्थसंकल्प : खा. गायकवाड

By admin | Updated: March 1, 2016 00:41 IST

दत्ता थोरे , लातूर ग्रामीण, कृषी विकास आणि रोजगार निर्मितीला प्राधान्य देत उद्योगजगतालाही नाराज न करता अर्थसंकल्प सादर झाला असून, वित्तीय तूट मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न अर्थमंत्र्यांनी केला आहे

देश समृध्द करणारा अर्थसंकल्प : खा. गायकवाडदत्ता थोरे , लातूरग्रामीण, कृषी विकास आणि रोजगार निर्मितीला प्राधान्य देत उद्योगजगतालाही नाराज न करता अर्थसंकल्प सादर झाला असून, वित्तीय तूट मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न अर्थमंत्र्यांनी केला आहे. ग्रामीण विकासाला चालना देणारा हा अर्थसंकल्प असला तरी अंमलबजावणीवर याचे यश अवलंबून राहणार आहे, अशा प्रतिक्रिया अर्थसंकल्पावर व्यक्त झाल्या आहेत.देशाची मुख्य नस ओळखून विकासाला गती देणारा हा अर्थसंकल्प आहे. टॅक्स वाढविलेले नाहीत. शेती, सिंचन आणि आरोग्य अशा घटनांवर भरीव तरतूद आहे. २०१८ पर्यंत प्रत्येक गावात वीज, ८७ हजार ७५० कोटी ग्रामीण भागाच्या आरोग्यासाठी, एलपीजी लाईन ग्रामीण भागात नेण्याचा संकल्प, ज्येष्ठ नागरिकाला जास्तीच्या ४० हजारासह कुंटुंबासाठी लाखाचा विमा, तीन हजार जेनेरिक औषधांची दुकाने, नवोदयची आणखी ६२ विद्यालये या साऱ्या योजना गरिबांच्या फायद्यासाठी आहेत. व्यसनांची साधने महाग झालीत. स्किल इंडिया आणि डिजिटल साक्षरता मिशनवर भर देण्यात आला आहे, असे खा. डॉ. सुनील गायकवाड म्हणाले.काँग्रेसची नीती सरकारने राबविली : आ. देशमुख४शेती आणि ग्रामीण भागासाठी मोदी सरकारने अर्थसंकल्पात काँग्रेसचेच धोरण राबविले आहे, याचे मला समाधान आहे. निवडणुकीत नरेंद्र मोदींनी काँग्रेसच्या ज्या योजनांवर सडकून टिका त्यावर या अर्थसंकल्पात भरीव तरतूद केली. हे समाजवादी धोरण भाजपानेही स्विकारल्याचा आनंद आहे. जीएसटीचे काँग्रेसचे धोरण मान्य केलं तर ते सुध्दा राज्यसभेत मंजूर व्हायला हरकत नाही. त्यांचे म्हणून जे काय मुद्दे होते त्या काळ्या पैशाच्या पैशाबद्दल ते काहीच करु शकले नाहीत. लोक आपल्या खात्यात पडणाऱ्या त्या १५ हजार रुपयांची वाट पाहताहेत. या दुष्काळात ती प्रतीक्षा आणखी गडद होत आहे. कृषी, ग्रामीण विकासासाठी अर्थसंकल्पात तरतूद केली असली, तरी हे सर्व युपीए सरकारातीलच योजना असल्याचे आमदार दिलीपराव देशमुख यांनी अर्थसंकल्पावर ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.अर्थमंत्र्यांनी सादर केलेला अर्थसंकल्प उत्तम असून यामुळे जीडीपीत नक्कीच वृध्दी मिळेल. अर्थमंत्र्यांनी सर्वच क्षेत्राचा विचार केलेला दिसतो. मुख्यत: भारतासारख्या देशाचा कणा असलेल्या ग्रामीण भागाचा विकास आणि शेतीचा विकास या दोन्ही गोष्टींवर विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. रेल्वे आणि रस्ते या पायाभूत गोष्टींच्या विकासासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. खरे अर्थकारण हे डिजिटल अर्थकारणाशी जोडून देण्यास देशाला प्रगतीपथावर नेण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पाने केला आहे. अर्थात ‘सच्चे दिन’ आले की ‘अच्छे दिन’ यायला वेळ लागणार नाही, असे शिवप्रसाद मालू म्हणाले.