शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
2
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
3
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
4
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
5
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
6
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
7
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
8
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
9
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
10
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
11
लातूर : पाठीमागून येणाऱ्या दुचाकीची भयंकर धडक; आई, मुलासह जावयाचा मृत्यू
12
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
13
निक्की आधी बॅटिंगला येऊन पंतचा पुन्हा फ्लॉप शो! Sanjiv Goenka यांनी असा काढला राग
14
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
15
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
16
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
17
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
18
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
19
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
20
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...

देश समृध्द करणारा अर्थसंकल्प : खा. गायकवाड

By admin | Updated: March 1, 2016 00:41 IST

दत्ता थोरे , लातूर ग्रामीण, कृषी विकास आणि रोजगार निर्मितीला प्राधान्य देत उद्योगजगतालाही नाराज न करता अर्थसंकल्प सादर झाला असून, वित्तीय तूट मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न अर्थमंत्र्यांनी केला आहे

देश समृध्द करणारा अर्थसंकल्प : खा. गायकवाडदत्ता थोरे , लातूरग्रामीण, कृषी विकास आणि रोजगार निर्मितीला प्राधान्य देत उद्योगजगतालाही नाराज न करता अर्थसंकल्प सादर झाला असून, वित्तीय तूट मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न अर्थमंत्र्यांनी केला आहे. ग्रामीण विकासाला चालना देणारा हा अर्थसंकल्प असला तरी अंमलबजावणीवर याचे यश अवलंबून राहणार आहे, अशा प्रतिक्रिया अर्थसंकल्पावर व्यक्त झाल्या आहेत.देशाची मुख्य नस ओळखून विकासाला गती देणारा हा अर्थसंकल्प आहे. टॅक्स वाढविलेले नाहीत. शेती, सिंचन आणि आरोग्य अशा घटनांवर भरीव तरतूद आहे. २०१८ पर्यंत प्रत्येक गावात वीज, ८७ हजार ७५० कोटी ग्रामीण भागाच्या आरोग्यासाठी, एलपीजी लाईन ग्रामीण भागात नेण्याचा संकल्प, ज्येष्ठ नागरिकाला जास्तीच्या ४० हजारासह कुंटुंबासाठी लाखाचा विमा, तीन हजार जेनेरिक औषधांची दुकाने, नवोदयची आणखी ६२ विद्यालये या साऱ्या योजना गरिबांच्या फायद्यासाठी आहेत. व्यसनांची साधने महाग झालीत. स्किल इंडिया आणि डिजिटल साक्षरता मिशनवर भर देण्यात आला आहे, असे खा. डॉ. सुनील गायकवाड म्हणाले.काँग्रेसची नीती सरकारने राबविली : आ. देशमुख४शेती आणि ग्रामीण भागासाठी मोदी सरकारने अर्थसंकल्पात काँग्रेसचेच धोरण राबविले आहे, याचे मला समाधान आहे. निवडणुकीत नरेंद्र मोदींनी काँग्रेसच्या ज्या योजनांवर सडकून टिका त्यावर या अर्थसंकल्पात भरीव तरतूद केली. हे समाजवादी धोरण भाजपानेही स्विकारल्याचा आनंद आहे. जीएसटीचे काँग्रेसचे धोरण मान्य केलं तर ते सुध्दा राज्यसभेत मंजूर व्हायला हरकत नाही. त्यांचे म्हणून जे काय मुद्दे होते त्या काळ्या पैशाच्या पैशाबद्दल ते काहीच करु शकले नाहीत. लोक आपल्या खात्यात पडणाऱ्या त्या १५ हजार रुपयांची वाट पाहताहेत. या दुष्काळात ती प्रतीक्षा आणखी गडद होत आहे. कृषी, ग्रामीण विकासासाठी अर्थसंकल्पात तरतूद केली असली, तरी हे सर्व युपीए सरकारातीलच योजना असल्याचे आमदार दिलीपराव देशमुख यांनी अर्थसंकल्पावर ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.अर्थमंत्र्यांनी सादर केलेला अर्थसंकल्प उत्तम असून यामुळे जीडीपीत नक्कीच वृध्दी मिळेल. अर्थमंत्र्यांनी सर्वच क्षेत्राचा विचार केलेला दिसतो. मुख्यत: भारतासारख्या देशाचा कणा असलेल्या ग्रामीण भागाचा विकास आणि शेतीचा विकास या दोन्ही गोष्टींवर विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. रेल्वे आणि रस्ते या पायाभूत गोष्टींच्या विकासासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. खरे अर्थकारण हे डिजिटल अर्थकारणाशी जोडून देण्यास देशाला प्रगतीपथावर नेण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पाने केला आहे. अर्थात ‘सच्चे दिन’ आले की ‘अच्छे दिन’ यायला वेळ लागणार नाही, असे शिवप्रसाद मालू म्हणाले.