शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

देश परदेश/काँग्रेस

By | Updated: November 29, 2020 04:08 IST

शीलेश शर्मा नवी दिल्ली : काँग्रेसच्या कार्यपद्धतीवरून आक्रमक झालेले २३ काँग्रेस नेते अहमद पटेल यांच्या मृत्यूनंतर नरमले असल्याचे संकेत ...

शीलेश शर्मा

नवी दिल्ली : काँग्रेसच्या कार्यपद्धतीवरून आक्रमक झालेले २३ काँग्रेस नेते अहमद पटेल यांच्या मृत्यूनंतर नरमले असल्याचे संकेत मिळत आहेत. या नेत्यांना ‘ग्रुप२३’ या नावाने ओळखण्यात येऊ लागले होते.

ग्रुप२३ मधील आक्रमक नेते गुलाम नबी आझाद यांनी काल झालेल्या काँग्रेस कार्य समितीच्या बैठकीत सर्वांनी एकत्र येऊन ऐक्य टिकविणे हीच अहमद पटेल यांना खरी श्रंद्धांजली ठरेल, असे प्रतिपादन केले. पक्ष सध्या गंभीर संकटात आहे. मोदींचा मुकाबला करण्यासाठी आपणास ऐक्य टिकवायला हवे. अन्यथा भाजप लाभ उठवेल, असे आझाद म्हणाल्याचे सूत्रांनी सांगितले.

ग्रुप २३ मधील एका वरिष्ठ नेत्याने लोकमतला सांगितले की, अहमद पटेल हे आजपर्यंत पक्ष नेतृत्व आणि आमच्यातील दुवा म्हणून काम करीत होते. ते आमच्या मताशी सहमत असून पक्ष नेतृत्वास समजावतील, असे आम्हाला वाटत होते. त्यांच्या मृत्यूमुळे मध्यस्थी करणारा कोणी नेताच आता उरलेला नाही.

या नेत्याने सांगितले की, आम्ही केवळ २३ जण नसून आमच्या सोबत नेत्यांची लांबच लांब रांग आहे. आमच्यातील कोणीही पक्ष फोडणार नाही अथवा सोडूनही जाणार नाही. आमचे सारे आयुष्य काँग्रेससोबत गेले आहे. अहमद पटेल यांच्या जाण्याने नेतृत्व आणि आमच्यातील कडी तुटली आहे. अशा वेळी सर्वांनी एकजूट होऊन काँग्रेसला मजबूत करायला हवे.

दरम्यान, सोनिया गांधी यांनी सर्व चर्चित नावांना बाजूला सारून माजी रेल्वेमंत्री पवन बन्सल यांची कार्यकारी कोषाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. त्यांच्याकडे अहमद पटेल यांच्या जबाबदाऱ्या तात्काळ प्रभावाने देण्यात आल्या आहेत.

..........................