शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

सेंद्रिय बोंडअळीमुळे कापूस उतारा घटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2017 00:10 IST

बोंडअळीचा प्रादुर्भाव होवू नये म्हणून बीटी बियाणाची शेतकरी लागवड करतात परंतु या वर्षी जवळपास सर्वच बीटी बियाणाच्या कापसावर सेंद्रीय बोंड आळीचा प्रादूर्भाव झाल्याने शेतक-यांची फसवणूक झाली आहे.

ठळक मुद्देबीटी बियाणातून शेतकºयांची मोठी फसवणूक

धारुर : चालू वर्षीच्या खरीप हंगामात धारुर तालुक्यात कापूस पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात झाली आहे. पेरणीस वेळेवर चांगला पाऊस झाल्याने शेतकºयांनी कापूस पिकास मोठी पसंती दिली होती. परंतु कापसाच्या सेंद्रीय बोंडअळीचा प्रादूर्भाव झाल्याने कापूस बोंडातच किडला आहे.

मागील दोन वर्षांच्या तुलनेत कापूस पिकास उताराही मिळण्याची शेतक-यांना अपेक्षा होती. बोंडअळीमुळे कापसाच्या उताºयात मोठी घट झाली आहे. बोंडअळीचा प्रादुर्भाव होवू नये म्हणून बीटी बियाणाची शेतकरी लागवड करतात परंतु या वर्षी जवळपास सर्वच बीटी बियाणाच्या कापसावर सेंद्रीय बोंड आळीचा प्रादूर्भाव झाल्याने शेतक-यांची फसवणूक झाली आहे.तालुक्यात चालू वर्षीच्या हंगामात सुमारे २३ हजार हेक्टर क्षेत्रावर कापूस पिकाची लाागवड झालेली आहे. वेळेवर पडत गेलेल्या पावसामुळे कापूस उत्पादनात चांगलीच वाढ झाल्याचे दिसत आहे. जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात हंगामी पाऊस झाला होता. त्यामुळे शेतक-यांनी कापूूस लागवडीस जास्त महत्व दिले होते.

मागील काही वर्षात कापूस पिकाला जोपासना करुन पीक चांगले आल्यास बोंडअळीचा प्रादूर्भाव होवून कापूस पिकाचे नुकसान मोठ्या प्रमाणावर होत होते. परंतु मागील सात ते आठ वर्षात कापूस पिकावर बोंडअळीचा प्रादूर्भाव होवू नये म्हणून सर्वच कापूस कंपन्यांनी बोलगार्ड (बिटी-२) बियाणे विकसीत केले होते. या बियाणाच्या कापसात बोंड आळी होवू नये, फवारणीचा खर्च वाचावा हा या मागचा उद्देश होता. सुरुवातीला काही वर्ष बिटी बियाणावर अळीचा प्रादूर्भाव कमी होता. बिटी बियाणाच्या सुरुवातीला किंमतीही अधिक होत्या. परंतु शासनाने मागील दोन वर्षात किंमतीच्या बाबतीत बंधने घालून भाव कमी केले होते.

सर्वच बियाणे कंपन्यांनी बिटी बियाणे विकसित केल्याने शेतकºयांनी वेगवेगळ्या कंपन्यांचा कापसाच्या जातीची लागवड केली होती. परंतू कापूसास पाते व बोंडे लागण्यावेळीच अळीचा प्रादूर्भाव वाढून फकही झाली होती. उर्वरीत कापूस बोंडे परिपक्व होण्याच्या वेळी सेंद्रीय अळी वाढल्याने बोंडातील कापसाला कीड लागली आहे. अळीने प्रत्येक बोंडातील अर्धा भाग खाल्ल्याने कापूस खराब निघत आहे. यामुळे शेतक-यांनी लागवड केलेले सर्वच कंपन्यांचे कापसाचे बिटी बियाणेच फसवे निघाले आहे. बीटी तंत्रज्ञानासाठी शेतक-यांना अधिकचा दर द्यावा लागतो. बोंड अळीमुळे कापूस वेचणी सोपे नसल्याने मजूर जास्तीचा भाव मागत आहे.कापूस वेचणीच्या खर्चात दुपटीने वाढगत वर्षी पहिल्या कापूस वेचणीचा भाव हा ५ रुपये किलो आणि विक्रीचा भाव सहा हजार रुपये होता. या वर्षी पहिल्याच वेचणीस वेचणीचा भाव हा आठ ते दहा रुपयापर्यंत आहे. काही ठिकाणी तर दहा रुपये प्रती किलो प्रमाणे कापूस वेचणी सुरू आहे.किडलेल्या बोंडामुळेच शेतक-यांना वेचणीसाठी दहा रुपये किलोचा मजुराला द्यावा लागत आहे. पहिल्या वेचणीलाच खरा कापूस निघत असल्यामुळे दुस-या व तिस-या वेचणीची तर बिकट अवस्था आहे. या वर्षी फसव्या बिटी बियाणामुळे शेतकरी संकटात सापडला आहे.