शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
6
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
7
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
8
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
9
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
10
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
11
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
12
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
13
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
14
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
15
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
16
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
17
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
18
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
19
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
20
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव

जिल्ह्यात कापूस उत्पादन घटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2017 00:45 IST

यंदा कापूस उत्पादनात ३० टक्क्यांपर्यंत घट होईल, असा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यात खरीप हंगामात झालेल्या कमी पावसाचा सर्वच पिकांना फटका बसला आहे. मूग व उडीद पिकांची काढणी अंतिम टप्प्यात असल्याने सध्या पडत असलेल्या पावसाचा या पिकांना फायदा होणार नाही. दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने कपाशीला जीवदान मिळाले आहे. असे असेल तरी यंदा कापूस उत्पादनात ३० टक्क्यांपर्यंत घट होईल, असा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे.जिल्ह्यात यंदा एकूण सरासरीच्या ९३.६ टक्के क्षेत्रावर कपाशीची लागवड झालेली आहे. कृषी विभागाच्या या आठवड्यातील पीक परिस्थिती अहवालानुसार कपाशीची झाडे बोंडे लागण्याच्या अवस्थेत आहेत.झाडांवर गुलाबी बोंडअळी व रस शोषक किडीसह आकस्मिक मर रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. बागायती क्षेत्रात ठिबकने पाणी दिलेल्या शेतांमधील कपाशीची वाढ चांगली झाली असून, पावसाचा फायदा होत आहे.कपाशीच्या झाडाला आता असलेली पाते, फुले, बोंडे यांची प्रत्यक्ष निरीक्षणे घेऊन कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांच्या मदतीने अंदाज काढला असता, बागायती क्षेत्रात रुई ७३४ किलोग्रॅम प्रति हेक्टर तर कोरडवाहू क्षेत्रातील उत्पादकता ४६१ किलो ग्रॅम येत आहे. ही आकडेवारी गतवर्षीच्या तुलनेत कमी आहे. परिणामी कापूस उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात यंदा ५३ हजार ६८७ हेक्टरवर तुरीची लागवड झाली आहे. तुरीचे पीक सध्या वाढीच्या अवस्थेत आहे. हे दीर्घ मुदतीचे पीक असल्यामुळे उत्पादकतेवर फारसा परिणाम होणार नाही, असे सूत्रांनी सांगितले.मका पीक सध्या दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे. वाढीच्या अवस्थेत अल्प पावसामुळे खोडकिडीचा प्रादुर्भाव आढळून आल्याने मका उत्पादनात घट होणार आहे.