शहरं
Join us  
Trending Stories
1
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
2
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
3
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
4
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर
5
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
6
"मी इनसाइडर असते तर बरं झालं असतं", इंडस्ट्रीतील स्ट्रगलवर लोकप्रिय अभिनेत्रीची क्रिप्टिक पोस्ट
7
"गोयंकाजी पाहताय ना?’’, इंग्लंडमध्ये पंतच्या फटकेबाजीनंतर फॅन्सनी घेतली लखनौच्या मालकांची शाळा  
8
हनीमुनचा प्लॅन, रसगुल्लामध्ये विष भरले अन्...; बेवफा सोनमपेक्षाही खतरनाक आहे खूनी 'मुस्कान'
9
NSE चा IPO कधी येणार? सेबीचे अध्यक्ष म्हणाले, "आयपीओ आणण्यात कोणताही अडथळा..."
10
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."
11
गळफास लावलेल्या स्थितीत सापडला भाजपा नेत्याचा मृतदेह, दोरीने बांधलेले होते दोन्ही हात, संशयास्पद मृत्युमुळे खळबळ
12
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
13
८ वर्षांपूर्वी आई गेली, नुकतेच बाबाही गेले; रीमा लागूंच्या वाढदिवसानिमित्त लेकीची भावुक पोस्ट
14
"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा
15
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
16
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
17
Ashadhi Ekadashi 2025: ईश्वरभेटीची सोपी वाट दाखवणार्‍या गुरुंचे आपल्या आयुष्यातील योगदान जाणून घ्या!
18
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
19
कर्मचाऱ्याला सॅलरीतून मिळाले १४ कोटी तर झाला अवाक्; नंतर जे काही झालं त्याचा विचारही केला नसेल
20
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?

जिल्ह्यात कापूस उत्पादन घटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2017 00:45 IST

यंदा कापूस उत्पादनात ३० टक्क्यांपर्यंत घट होईल, असा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यात खरीप हंगामात झालेल्या कमी पावसाचा सर्वच पिकांना फटका बसला आहे. मूग व उडीद पिकांची काढणी अंतिम टप्प्यात असल्याने सध्या पडत असलेल्या पावसाचा या पिकांना फायदा होणार नाही. दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने कपाशीला जीवदान मिळाले आहे. असे असेल तरी यंदा कापूस उत्पादनात ३० टक्क्यांपर्यंत घट होईल, असा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे.जिल्ह्यात यंदा एकूण सरासरीच्या ९३.६ टक्के क्षेत्रावर कपाशीची लागवड झालेली आहे. कृषी विभागाच्या या आठवड्यातील पीक परिस्थिती अहवालानुसार कपाशीची झाडे बोंडे लागण्याच्या अवस्थेत आहेत.झाडांवर गुलाबी बोंडअळी व रस शोषक किडीसह आकस्मिक मर रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. बागायती क्षेत्रात ठिबकने पाणी दिलेल्या शेतांमधील कपाशीची वाढ चांगली झाली असून, पावसाचा फायदा होत आहे.कपाशीच्या झाडाला आता असलेली पाते, फुले, बोंडे यांची प्रत्यक्ष निरीक्षणे घेऊन कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांच्या मदतीने अंदाज काढला असता, बागायती क्षेत्रात रुई ७३४ किलोग्रॅम प्रति हेक्टर तर कोरडवाहू क्षेत्रातील उत्पादकता ४६१ किलो ग्रॅम येत आहे. ही आकडेवारी गतवर्षीच्या तुलनेत कमी आहे. परिणामी कापूस उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात यंदा ५३ हजार ६८७ हेक्टरवर तुरीची लागवड झाली आहे. तुरीचे पीक सध्या वाढीच्या अवस्थेत आहे. हे दीर्घ मुदतीचे पीक असल्यामुळे उत्पादकतेवर फारसा परिणाम होणार नाही, असे सूत्रांनी सांगितले.मका पीक सध्या दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे. वाढीच्या अवस्थेत अल्प पावसामुळे खोडकिडीचा प्रादुर्भाव आढळून आल्याने मका उत्पादनात घट होणार आहे.