शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

मनपाच्या पाण्यावर ‘कुटीर’ उद्योग

By admin | Updated: May 5, 2016 01:30 IST

औरंगाबाद : जायकवाडीहून औरंगाबादेत पाणी आणण्यासाठी महानगरपालिकेला दरवर्षी सुमारे ४० कोटी रुपये खर्च करावे लागतात.

औरंगाबाद : जायकवाडीहून औरंगाबादेत पाणी आणण्यासाठी महानगरपालिकेला दरवर्षी सुमारे ४० कोटी रुपये खर्च करावे लागतात. पाणीपट्टीच्या माध्यमातून मनपाला अर्धीही रक्कम मिळत नाही. कोट्यवधी रुपयांचे नुकसान सहन करून मनपा प्रशासन मागील अनेक वर्षांपासून औरंगाबादकरांची तहान भागवित आहे. मनपाच्या शुद्ध पाण्यावर काही नागरिकांनी कुटीर उद्योग सुरू केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. स्वत: मनपा आयुक्तांनी या खळबळजनक घटनेवर प्रकाश टाकला, हे विशेष.बुधवारी सकाळी मनपा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया मनपा अधिकाऱ्यांसह पैठणगेट भागातील औषधी भवनची इमारत पाहण्यासाठी गेले. इमारतीच्या खालून पाण्याचा प्रवाह मागील काही वर्षांपासून बंद झाला आहे. पावसाळ्यापूर्वी पाण्याला नैसर्गिक प्रवाह कसा मिळवून देता येईल, यासाठी आयुक्तांनी पाहणी केली. पाहणी करीत असताना दलालवाडी रोडवर एक अर्धे शटर लावलेल्या दुकानात पाण्याचे जार भरण्यात येत होते. एवढ्या गजबजलेल्या भागात पाण्याचे जार कशा पद्धतीने भरले जात असतील असा प्रश्न आयुक्तांना पडला. त्यांनी लगेचच दुकानात धाव घेतली. दुकानातील दृश्य पाहून आयुक्तांसह मनपा अधिकारीही क्षणभर अवाक् झाले. महापालिकेच्या पाण्यावर हा जार विक्रीचा व्यवसाय सुरू असल्याचे निदर्शनास आले. महापालिकेच्या लाईनमधून मोठा नळ घेण्यात आला आहे. नळाद्वारे पाणी एका हौदात पडत होते. हौदातील पाणी थेट जारमध्ये भरून विक्री करण्यात येत होते. सुनील देवडा हे व्यावसायिक पाण्याची विक्री करीत होते.एवढ्या राजरोसपणे पाण्याची विक्री सुरू असतानाही मनपा अधिकारी व कर्मचाऱ्यांना ही बाब कशी कळाली नाही, असाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. शहरातील अनेक हॉटेलला महापालिकेकडून पाणीपुरवठा करण्यात येतो. अनेक हॉटेल व्यावसायिकांनी अवैधरीत्या नळ कनेक्शन घेतले आहेत. महापालिकेने या गंभीर प्रकाराकडे कधीच गांभीर्याने लक्ष दिले नाही. त्याचप्रमाणे शहरात वॉशिंग सेंटरची संख्याही जवळपासन शंभरच्या वर गेली आहे. मनपा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी मनपाचे पाणी विकणाऱ्यांवर त्वरित फौजदारी कारवाई करावी, असे आदेश दिले. यावेळी शहर अभियंता सखाराम पानझडे, कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे उपस्थित होते.