शहरं
Join us  
Trending Stories
1
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
2
रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! वेटिंग-RAC तिकिटाची स्थिती आता १० तास आधी कळणार
3
कर्जदारांना 'अच्छे दिन'! भारतीय अर्थव्यवस्था 'गोल्डीलॉक्स' स्थितीत; गव्हर्नर मल्होत्रा म्हणाले...
4
काँग्रेसची कार्यकर्ती, वरपर्यंत ओळख असल्याचं सांगून आणायची प्रेमासाठी दबाव, त्रस्त पोलीस इन्स्पेक्टरची महिलेविरोधात तक्रार
5
मुंबई इंडियन्सची 'ती गोष्ट 'जितेंद्र भाटवडेकर'च्या मनाला लागली? रोहितसोबतचा फोटो शेअर करत म्हणाला...
6
‘टॅरिफला आता हत्यार बनवले जातेय’, निर्मला सीतारमण यांनी सांगितला 'ट्रम्प टॅरिफ'मागील खेळ...
7
वंदे भारत की राजधानी, कोणत्या ट्रेनच्या लोको पायलटला सर्वाधिक पगार मिळतो? आकडा पाहून व्हाल थक्क
8
ICICI Prudential AMC IPO Allotment: कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस? जीएमपीमध्येही जोरदार तेजी
9
गणवेशावरून चिडवलं, घरी येताच चौथीत शिकणाऱ्या प्रशांतने...; आईवडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली
10
“काँग्रेसचे पाक प्रेम उतू चाललेय, ऑपरेशन सिंदूरचा हिशोब विचारणारे देशद्रोही”: एकनाथ शिंदे
11
Meesho च्या शेअरला अपर सर्किट; इश्यू प्राईजच्या दुप्पट झाली किंमत, सह-संस्थापक बनले अब्जाधीश
12
ढाका येथील भारतीय उच्चायुक्तालयाला धमकी, सरकारने बांगलादेशी अधिकाऱ्याला समन्स बजावले
13
विराट-अनुष्काने घेतली प्रेमानंद महाराजांकडून दीक्षा, गळ्यात तुळशी माळ; जाणून घ्या त्याचे महत्व
14
Payal Gaming: कोण आहे पायल गेमिंग? १.२० मिनटांचा MMS लीक झाल्यानंतर आली चर्चेत!
15
Video: BJP आमदाराच्या मुलाचा शाही विवाह सोहळा; तब्बल ७० लाखांच्या फटाक्यांची केली आतषबाजी
16
ओला-उबरला टक्कर! १ जानेवारीपासून 'भारत टॅक्सी' ॲप होणार लाँच; प्रवाशांना स्वस्त प्रवास आणि ड्रायव्हर्सची होणार जास्त कमाई
17
लग्नानंतर एका वर्षात शोभिता धुलिपाला देणार गुडन्यूज? सासरे नागार्जुन म्हणाले, "योग्य वेळ..."
18
भारतीय बाजारात उद्याच स्वस्तातली सात सीटर कार लाँच होणार; अर्टिगा, ट्रायबरला मिळणार टक्कर...
19
स्वस्त 'पर्सनल लोन'च्या शोधात आहात? 'या' ५ बँकांमध्ये मिळतोय सर्वात कमी व्याजदर; १२ लाखांचा EMI किती?
20
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट, कोणत्याही क्षणी अटक होणार, आमदारकीही जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

मनपाच्या पाण्यावर ‘कुटीर’ उद्योग

By admin | Updated: May 5, 2016 01:30 IST

औरंगाबाद : जायकवाडीहून औरंगाबादेत पाणी आणण्यासाठी महानगरपालिकेला दरवर्षी सुमारे ४० कोटी रुपये खर्च करावे लागतात.

औरंगाबाद : जायकवाडीहून औरंगाबादेत पाणी आणण्यासाठी महानगरपालिकेला दरवर्षी सुमारे ४० कोटी रुपये खर्च करावे लागतात. पाणीपट्टीच्या माध्यमातून मनपाला अर्धीही रक्कम मिळत नाही. कोट्यवधी रुपयांचे नुकसान सहन करून मनपा प्रशासन मागील अनेक वर्षांपासून औरंगाबादकरांची तहान भागवित आहे. मनपाच्या शुद्ध पाण्यावर काही नागरिकांनी कुटीर उद्योग सुरू केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. स्वत: मनपा आयुक्तांनी या खळबळजनक घटनेवर प्रकाश टाकला, हे विशेष.बुधवारी सकाळी मनपा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया मनपा अधिकाऱ्यांसह पैठणगेट भागातील औषधी भवनची इमारत पाहण्यासाठी गेले. इमारतीच्या खालून पाण्याचा प्रवाह मागील काही वर्षांपासून बंद झाला आहे. पावसाळ्यापूर्वी पाण्याला नैसर्गिक प्रवाह कसा मिळवून देता येईल, यासाठी आयुक्तांनी पाहणी केली. पाहणी करीत असताना दलालवाडी रोडवर एक अर्धे शटर लावलेल्या दुकानात पाण्याचे जार भरण्यात येत होते. एवढ्या गजबजलेल्या भागात पाण्याचे जार कशा पद्धतीने भरले जात असतील असा प्रश्न आयुक्तांना पडला. त्यांनी लगेचच दुकानात धाव घेतली. दुकानातील दृश्य पाहून आयुक्तांसह मनपा अधिकारीही क्षणभर अवाक् झाले. महापालिकेच्या पाण्यावर हा जार विक्रीचा व्यवसाय सुरू असल्याचे निदर्शनास आले. महापालिकेच्या लाईनमधून मोठा नळ घेण्यात आला आहे. नळाद्वारे पाणी एका हौदात पडत होते. हौदातील पाणी थेट जारमध्ये भरून विक्री करण्यात येत होते. सुनील देवडा हे व्यावसायिक पाण्याची विक्री करीत होते.एवढ्या राजरोसपणे पाण्याची विक्री सुरू असतानाही मनपा अधिकारी व कर्मचाऱ्यांना ही बाब कशी कळाली नाही, असाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. शहरातील अनेक हॉटेलला महापालिकेकडून पाणीपुरवठा करण्यात येतो. अनेक हॉटेल व्यावसायिकांनी अवैधरीत्या नळ कनेक्शन घेतले आहेत. महापालिकेने या गंभीर प्रकाराकडे कधीच गांभीर्याने लक्ष दिले नाही. त्याचप्रमाणे शहरात वॉशिंग सेंटरची संख्याही जवळपासन शंभरच्या वर गेली आहे. मनपा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी मनपाचे पाणी विकणाऱ्यांवर त्वरित फौजदारी कारवाई करावी, असे आदेश दिले. यावेळी शहर अभियंता सखाराम पानझडे, कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे उपस्थित होते.