शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
2
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
3
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
4
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
5
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
6
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
7
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
8
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
9
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
10
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
11
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
12
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
13
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
14
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
15
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
16
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
17
WTC Final : मिचेल स्टार्कनं अर्धशतकासह रचला इतिहास; हेजलवूडच्या साथीनं ५० वर्षांचा विक्रमही मोडला
18
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
19
जन्मदाताच बनला हैवान! पत्नीशी झालेल्या भांडणाच्या रागात लेकरांवर केला वार, मुलीचा जागीच मृत्यू 
20
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर

नगरसेवक तनवाणी, आहुजा ‘अंडरग्राऊंड’

By admin | Updated: September 8, 2015 00:40 IST

औरंगाबाद : पहाडसिंगपुरा येथे अनधिकृत रेखांकनामधील भूखंड विक्री करून शेकडो गोरगरीब नागरिकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेले नगरसेवक

औरंगाबाद : पहाडसिंगपुरा येथे अनधिकृत रेखांकनामधील भूखंड विक्री करून शेकडो गोरगरीब नागरिकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेले नगरसेवक राजू तनवाणी आणि राज आहुजा हे दोन्ही आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागले नाहीत. तुमच्याविरुद्ध गुन्हा दाखल होत असल्याची या दोघांना पोलीस दलातील त्यांच्या ‘खबऱ्या’कडून आधीच खबर पोहोचविण्यात आली. त्याचा फायदा घेत हे दोन्ही आरोपी अटक टाळण्यासाठी पसार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मकबरा परिसरातील पहाडसिंगपुरा येथील सर्व्हे नंबर ९९/२ मधील ग्रीन झोन जमिनीवर रेणुकानगर नावाने अवैध रेखांकन तयार करून तेथे २० बाय ३० आकाराचे २१० भूखंड पाडले. पहाडसिंगपुरा येथील सर्व्हे नंबर ९९/१ आणि ९९/२ मधील १८ एकर २९ गुंठे जमिनीच्या मालकीहक्काबाबत मूळ मालक माधवराव सोनवणे विरुद्ध हिंमतराव कोरडे यांच्यात न्यायालयात वाद सुरू होता. वाद सुरू असताना कोरडे यांचे वारस संतराम कोरडे यांनी ५ एकर ३९ गुंठे जमीन राजू तनवाणी यांना आम मुख्यत्यारपत्र (जीपीए) करून दिले. जीपीएच्या आधारे तनवाणी आणि राज आहुजा यांनी तत्कालीन तलाठ्याच्या मदतीने रेणुकानगर नावाने अनधिकृत ले-आऊट करून २१० प्लॉट पाडले. तनवाणीकडून जीपीए करून घेत आहुजाने गोरगरीब आणि अल्पशिक्षित लोकांना लाखो रुपयांत भूखंड विक्री केले. याप्रकरणी विशेष म्हणजे या जमिनीबाबत कोर्टात वाद सुरू असल्याचे त्यांनी त्यांच्यापासून लपवून ठेवले. दरम्यान ही जमीन सोनवणे यांच्या वारसांच्या ताब्यात देण्याचे आदेश न्यायालयाने दिले. या आदेशानुसार ३१ आॅगस्ट रोजी जिल्हा प्रशासनाने धडक कारवाई करून तेथील रहिवाशांकडून घरे खाली करून घेतली. बेघर झालेल्या शंभरहून अधिक रहिवाशांनी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन आमची फसवणूक केली असून, भूखंड माफियावर कारवाई करण्याची विनंती केली. रामदास ढोले यांच्या तक्रारीवरून रविवारी रात्री आरोपींविरोधात बेगमपुरा ठाण्यात गुन्हा दाखल केला.अटकपूर्व जामिनासाठी... आरोपी राजू तनवाणी हे गुलमंडी वॉर्डाचे नगरसेवक आणि माजी आमदार किशनचंद तनवाणी यांचे बंधू आहेत. तर राज आहुजा हे त्यांचे निकटवर्तीय आहेत. अटक टाळण्यासाठीच त्यांना न्यायालयात धाव घेण्याची संधी देण्यासाठीच त्यांच्यापर्यंत गुन्हा दाखल झाल्याची वार्ता आधीच पोहोचविण्यात आली असावी, अशी चर्चा आज सुरू आहे.गुन्हा दाखल झाल्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आरोपींचा शोध सुरू केला असल्याचे पोलीस निरीक्षक मधुकर सावंत यांनी सांगितले. ते म्हणाले की, आरोपी पळून कोठे जातील? त्यांना न्यायालयासमोर यावेच लागणार आहे. दरम्यानच्या काळात आम्ही त्यांच्याविरोधात जास्तीत जास्त पुरावे गोळा क रीत आहोत. आरोपींना जामीन मिळू नये, इतके पुरावे न्यायालयासमोर सादर करणार असल्याचे सावंत यांनी सांगितले.