शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

नगरसेवक तनवाणी, आहुजा ‘अंडरग्राऊंड’

By admin | Updated: September 8, 2015 00:40 IST

औरंगाबाद : पहाडसिंगपुरा येथे अनधिकृत रेखांकनामधील भूखंड विक्री करून शेकडो गोरगरीब नागरिकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेले नगरसेवक

औरंगाबाद : पहाडसिंगपुरा येथे अनधिकृत रेखांकनामधील भूखंड विक्री करून शेकडो गोरगरीब नागरिकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेले नगरसेवक राजू तनवाणी आणि राज आहुजा हे दोन्ही आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागले नाहीत. तुमच्याविरुद्ध गुन्हा दाखल होत असल्याची या दोघांना पोलीस दलातील त्यांच्या ‘खबऱ्या’कडून आधीच खबर पोहोचविण्यात आली. त्याचा फायदा घेत हे दोन्ही आरोपी अटक टाळण्यासाठी पसार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मकबरा परिसरातील पहाडसिंगपुरा येथील सर्व्हे नंबर ९९/२ मधील ग्रीन झोन जमिनीवर रेणुकानगर नावाने अवैध रेखांकन तयार करून तेथे २० बाय ३० आकाराचे २१० भूखंड पाडले. पहाडसिंगपुरा येथील सर्व्हे नंबर ९९/१ आणि ९९/२ मधील १८ एकर २९ गुंठे जमिनीच्या मालकीहक्काबाबत मूळ मालक माधवराव सोनवणे विरुद्ध हिंमतराव कोरडे यांच्यात न्यायालयात वाद सुरू होता. वाद सुरू असताना कोरडे यांचे वारस संतराम कोरडे यांनी ५ एकर ३९ गुंठे जमीन राजू तनवाणी यांना आम मुख्यत्यारपत्र (जीपीए) करून दिले. जीपीएच्या आधारे तनवाणी आणि राज आहुजा यांनी तत्कालीन तलाठ्याच्या मदतीने रेणुकानगर नावाने अनधिकृत ले-आऊट करून २१० प्लॉट पाडले. तनवाणीकडून जीपीए करून घेत आहुजाने गोरगरीब आणि अल्पशिक्षित लोकांना लाखो रुपयांत भूखंड विक्री केले. याप्रकरणी विशेष म्हणजे या जमिनीबाबत कोर्टात वाद सुरू असल्याचे त्यांनी त्यांच्यापासून लपवून ठेवले. दरम्यान ही जमीन सोनवणे यांच्या वारसांच्या ताब्यात देण्याचे आदेश न्यायालयाने दिले. या आदेशानुसार ३१ आॅगस्ट रोजी जिल्हा प्रशासनाने धडक कारवाई करून तेथील रहिवाशांकडून घरे खाली करून घेतली. बेघर झालेल्या शंभरहून अधिक रहिवाशांनी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन आमची फसवणूक केली असून, भूखंड माफियावर कारवाई करण्याची विनंती केली. रामदास ढोले यांच्या तक्रारीवरून रविवारी रात्री आरोपींविरोधात बेगमपुरा ठाण्यात गुन्हा दाखल केला.अटकपूर्व जामिनासाठी... आरोपी राजू तनवाणी हे गुलमंडी वॉर्डाचे नगरसेवक आणि माजी आमदार किशनचंद तनवाणी यांचे बंधू आहेत. तर राज आहुजा हे त्यांचे निकटवर्तीय आहेत. अटक टाळण्यासाठीच त्यांना न्यायालयात धाव घेण्याची संधी देण्यासाठीच त्यांच्यापर्यंत गुन्हा दाखल झाल्याची वार्ता आधीच पोहोचविण्यात आली असावी, अशी चर्चा आज सुरू आहे.गुन्हा दाखल झाल्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आरोपींचा शोध सुरू केला असल्याचे पोलीस निरीक्षक मधुकर सावंत यांनी सांगितले. ते म्हणाले की, आरोपी पळून कोठे जातील? त्यांना न्यायालयासमोर यावेच लागणार आहे. दरम्यानच्या काळात आम्ही त्यांच्याविरोधात जास्तीत जास्त पुरावे गोळा क रीत आहोत. आरोपींना जामीन मिळू नये, इतके पुरावे न्यायालयासमोर सादर करणार असल्याचे सावंत यांनी सांगितले.