शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : शेतकऱ्यांचे 'रेशमी'स्वप्न भंगले; लॉकडाऊनमुळे हजारो क्विंटल तयार कोष पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2020 15:50 IST

योग्य वेळी कोष विक्री झाली नाही तर कोषातून फुलपाखरू बाहेर पडून किंमत  होते नगण्य 

ठळक मुद्देबाजारपेठ नसल्याने विक्रीसाठीचे तयार कोष पडून रेशीम उत्पादक शेतकरी अडचणीत घरातील छतावर कोष वाळविण्याचा प्रयत्न 

पाथरी : कोरोनाच्या विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्याने सर्वच बाजारपेठ बंद पडल्या आहेत ,याचा फटका सर्वसामान्य सोबतच शेतकऱ्यांना ही मोठ्या प्रमाणावर बसू लागला आहे , तालुक्यातील कासापुरी येथील शेतकऱ्यांने तयार केलेला रेशीम कोष बाजारपेठे अभावी पडून आहे , सहा दिवसात कोष विक्री न झाल्यास त्यातून फुलपाखरू बाहेर पडून कोशाची किंमत नगण्य होत असल्याने त्याचा मोठा फटका बसला आहे  शेतकऱ्यांनी तयार झालेला कोष आता नाईलाजाने घराच्या छतावर कोरडा करण्यासाठी वाळू घातला आहे.

महाराष्ट्र राज्याच्या तुलनेत मराठवाडा भागात  एकूण रेशीम शेतीच्या 70 टक्के  रेशीम शेती व्यवसाय आहे , रेशीम शेतीत चांगले उत्पादन मिळत असल्याने मागील चार पाच वर्षात परभणी जिल्ह्यात रेशीम शेती व्यवसाय वाढला गेला आहे , या वर्षात रेशीम कोषाला कर्नाटक राज्यातील बाजारपेठ मध्ये 50 हजार रुपये क्विंटल पेक्षा अधिक दर मिळत होता.

रेशीम शेती पीक शेतात लागवड केलेल्या तुती च्या पाल्यावर येते , हे पीक खूप अल्पावधीचे असल्याने आणि त्या साठी वेळेनुसार पीक काढणी ते कोष विक्री करावे लागते  , मात्र संचारबंदी सुरू असल्याने   रेल्वे बंद असल्याने कर्नाटकातील बाजार पेठ बंद झाल्या आहेत तर जालना येथील कोष खरेदी बाजारपेठ बंद आहे , त्या मुळे शेतकऱ्यांनी तयार केलेला कोष विक्री साठी बाजारपेठ नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.

छतावर वाळू घालण्याची आली वेळकासापुरी येथील शेतकरी गणेश वशिष्ठराव कोल्हे यांनी 200 अंडीजपू घेऊन रेशीमचा क्रॉप घेतला. त्यात 1 क्विंटल 75 किलो कोष निघाला साधारणपणे त्याची बाजार किंमत 80 हजार रुपये ऐवढी आहे. त्यानी  तयार केलेला कोष  विक्री साठी बाजारपेठ बंद आहे , कोष तयार झाल्यानंतर सहा ते आठ दिवसात कोषातून फुलपाखरू बाहेर पडून  कोष खराब होऊन त्याची किंमत नगण्य होत असल्याने बाजारपेठ बंद असल्याने आता तयार कोष घराच्या छतावर वाळू घातला आहे , वाळलेल्या कोषाचे वजन 3 पट कमी होत असल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे  तसेच याच गावातील नारायण वैजनाथ बादाडे यांनी ही  150 अंडीजपूचा रेशीम  कोष तयार केला आहे त्याचा या शेतकऱ्याला ही फटका बसला गेला आहे , 

कोष विक्रीसाठी वाहतूक पास मिळेना बीड आणि जालना जिल्ह्यात काही व्यापारी कोष खरेदी करून त्यांच्या स्वतःच्या मालकीच्या रिलिंग युनिट मध्ये धागा तयार करतात.सध्या च्या अडचणीच्या काळात हे व्यापारी पड्या भावाने कोष खरेदी करत आहेत , तिकडे कोष विक्री साठी न्यायचा म्हटलं तरी वाहनासाठी पासेस मिळत नाहीत असा शेतकऱ्यांचा अनुभव आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसparabhaniपरभणी