शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
5
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
6
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
7
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
8
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
9
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
10
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
11
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
12
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
13
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
14
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
15
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
16
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
17
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
18
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
19
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
20
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी

CoronaVirus : शेतकऱ्यांचे 'रेशमी'स्वप्न भंगले; लॉकडाऊनमुळे हजारो क्विंटल तयार कोष पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2020 15:50 IST

योग्य वेळी कोष विक्री झाली नाही तर कोषातून फुलपाखरू बाहेर पडून किंमत  होते नगण्य 

ठळक मुद्देबाजारपेठ नसल्याने विक्रीसाठीचे तयार कोष पडून रेशीम उत्पादक शेतकरी अडचणीत घरातील छतावर कोष वाळविण्याचा प्रयत्न 

पाथरी : कोरोनाच्या विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्याने सर्वच बाजारपेठ बंद पडल्या आहेत ,याचा फटका सर्वसामान्य सोबतच शेतकऱ्यांना ही मोठ्या प्रमाणावर बसू लागला आहे , तालुक्यातील कासापुरी येथील शेतकऱ्यांने तयार केलेला रेशीम कोष बाजारपेठे अभावी पडून आहे , सहा दिवसात कोष विक्री न झाल्यास त्यातून फुलपाखरू बाहेर पडून कोशाची किंमत नगण्य होत असल्याने त्याचा मोठा फटका बसला आहे  शेतकऱ्यांनी तयार झालेला कोष आता नाईलाजाने घराच्या छतावर कोरडा करण्यासाठी वाळू घातला आहे.

महाराष्ट्र राज्याच्या तुलनेत मराठवाडा भागात  एकूण रेशीम शेतीच्या 70 टक्के  रेशीम शेती व्यवसाय आहे , रेशीम शेतीत चांगले उत्पादन मिळत असल्याने मागील चार पाच वर्षात परभणी जिल्ह्यात रेशीम शेती व्यवसाय वाढला गेला आहे , या वर्षात रेशीम कोषाला कर्नाटक राज्यातील बाजारपेठ मध्ये 50 हजार रुपये क्विंटल पेक्षा अधिक दर मिळत होता.

रेशीम शेती पीक शेतात लागवड केलेल्या तुती च्या पाल्यावर येते , हे पीक खूप अल्पावधीचे असल्याने आणि त्या साठी वेळेनुसार पीक काढणी ते कोष विक्री करावे लागते  , मात्र संचारबंदी सुरू असल्याने   रेल्वे बंद असल्याने कर्नाटकातील बाजार पेठ बंद झाल्या आहेत तर जालना येथील कोष खरेदी बाजारपेठ बंद आहे , त्या मुळे शेतकऱ्यांनी तयार केलेला कोष विक्री साठी बाजारपेठ नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.

छतावर वाळू घालण्याची आली वेळकासापुरी येथील शेतकरी गणेश वशिष्ठराव कोल्हे यांनी 200 अंडीजपू घेऊन रेशीमचा क्रॉप घेतला. त्यात 1 क्विंटल 75 किलो कोष निघाला साधारणपणे त्याची बाजार किंमत 80 हजार रुपये ऐवढी आहे. त्यानी  तयार केलेला कोष  विक्री साठी बाजारपेठ बंद आहे , कोष तयार झाल्यानंतर सहा ते आठ दिवसात कोषातून फुलपाखरू बाहेर पडून  कोष खराब होऊन त्याची किंमत नगण्य होत असल्याने बाजारपेठ बंद असल्याने आता तयार कोष घराच्या छतावर वाळू घातला आहे , वाळलेल्या कोषाचे वजन 3 पट कमी होत असल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे  तसेच याच गावातील नारायण वैजनाथ बादाडे यांनी ही  150 अंडीजपूचा रेशीम  कोष तयार केला आहे त्याचा या शेतकऱ्याला ही फटका बसला गेला आहे , 

कोष विक्रीसाठी वाहतूक पास मिळेना बीड आणि जालना जिल्ह्यात काही व्यापारी कोष खरेदी करून त्यांच्या स्वतःच्या मालकीच्या रिलिंग युनिट मध्ये धागा तयार करतात.सध्या च्या अडचणीच्या काळात हे व्यापारी पड्या भावाने कोष खरेदी करत आहेत , तिकडे कोष विक्री साठी न्यायचा म्हटलं तरी वाहनासाठी पासेस मिळत नाहीत असा शेतकऱ्यांचा अनुभव आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसparabhaniपरभणी