शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : टीम इंडियाच्या ५ शतकांवर फेरलं पाणी! हेडिंग्लेचं मैदान मारत इंग्लंडची मालिकेत आघाडी
2
अमेरिका-कतार भूमिकेचे स्वागत, संवादास पर्याय नाही; इराण-इस्रायल युद्धविरामावर भारताचे भाष्य
3
ENG vs IND : टीम इंडिया कुठं कमी पडली? जाणून घ्या हेडिंग्लेच्या मैदानातील पराभवामागची पाच कारणं
4
“शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, शक्तिपीठ महामार्ग आम्ही कदापि होऊ देणार नाही”; राजू शेट्टी ठाम
5
अहमदाबाद विमान अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला? सरकारने जाहीर केली अधिकृत आकडेवारी
6
“मला शक्य तितक्या लवकर सर्वकाही शांत झालेले पाहायचे आहे”; ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
8
ENG vs IND : अंपायरसमोर जड्डूचं तेवर! विकेटमागून पंतनही घेतली फिरकी! मैदानात नेमकं काय घडलं?
9
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
10
ENG vs IND : शार्दुल ठाकूरची कमाल! २ चेंडूत २ विकेट्स घेत टेस्ट मॅचमध्ये आणलं ट्विस्ट
11
Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल
12
ENG vs IND : प्रसिद्ध कृष्णानं बॅक टू बॅक ओव्हरमध्ये २ विकेट्स मिळवत टीम इंडियाला दिला मोठा दिलासा
13
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
14
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
15
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
16
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
17
यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
18
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
20
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक

Coronavirus: निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय मुख्यमंत्रीच घेतील, राजेश टोपे यांनी दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2021 11:05 IST

Coronavirus: आरोग्य विभाग, मदत व पुनर्वसन विभाग आणि टास्क फोर्स या तिघांनी राज्यातील २५ जिल्ह्यांत निर्बंध शिथिल केले पाहिजे, तर ११ जिल्हे लेव्हल -३ च्या पातळीत ठेवले पाहिजे, असा अहवाल दिला आहे.

औरंगाबाद : आरोग्य विभाग, मदत व पुनर्वसन विभाग आणि टास्क फोर्स या तिघांनी राज्यातील २५ जिल्ह्यांत निर्बंध शिथिल केले पाहिजे, तर ११ जिल्हे लेव्हल -३ च्या पातळीत ठेवले पाहिजे, असा अहवाल दिला आहे. निर्बंध शिथिल करण्यासंबंधी मुख्यमंत्रीच निर्णय घेतील. त्याबाबत सोमवारी निर्णय जाहीर होऊ शकतो, असे सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी रविवारी सांगितले.ते म्हणाले, निर्बंध शिथिल करण्याबाबतची फाइल आमच्याकडून पाठविण्यात आलेली आहे. आरोग्य विभागातील ‘क’ आणि ‘ड’ या गटाच्या १२ हजार जागा भरण्यात येणार आहेत. त्यासाठी अर्ज मागविण्याची जाहिरात ९ ऑगस्टपर्यंत येईल. त्याबरोबर गट-अ म्हणजे स्पेशालिस्ट डाॅक्टर, एमबीबीएस डाॅक्टरांची एक हजार पदे भरण्यास पुढील ४ दिवसांत कार्यवाही केली जाणार आहे. अडचण आली नाही, तर दोन महिन्यांत १०० टक्के जागा भरल्या जातील, असे ते म्हणाले.राज्यातील १०० खाटांच्या रुग्णालयांत सीटीस्कॅन, एमआरआय, डायलिसिस, सोनोग्राफी मशीन दिल्या जाणार आहेत. आऊटसोर्सिंगच्या माध्यमातून ही सेवा दिली जाणार असून, त्यासंदर्भातील निविदा निघाली आहे. ही सेवा गोरगरिबांना मोफत दिली जाईल, असे टोपे यांनी सांगितले. 

अवयवदानासाठी आता नियमांचा विचारअवयवदानासंदर्भात गुरुवारी बैठक होणार आहे. अवयवदानात तामिळनाडू पहिल्या क्रमाकांवर आहे. त्यामुळे आपल्याला नियम बदलावे लागतील का, याचा विचार केला जाईल. जिल्हा रुग्णालयातही अवयदानाची कामे केले जातील. टर्शरी केअरच्या ठिकाणी अवयवदान झाले पाहिजे; पण तेथे काम होत नाही, त्याकडे लक्ष दिले जाईल, असे राजेश टोपे म्हणाले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसRajesh Topeराजेश टोपे