शहरं
Join us  
Trending Stories
1
UNSC बैठकीत अमेरिका, फ्रान्सनं पाकिस्तानला फटकारलं; चीननेही दिला गुलीगत धोका
2
ना ठराव, ना निर्णय! भारताच्या गैरहजेरीतही UNSC बैठकीत पाकिस्तानची 'अशी' झाली फजिती
3
रशियाकडून भारताकडे युद्धनौका निघणार, याच महिन्यात पोहोचणार; रडारही पकडू शकणार नाही, ब्राम्होस क्षेपणास्त्र डागणार...
4
Crime: 24 वर्षाचा शिक्षक, 14 वर्षाची विद्यार्थीनी; OYO हॉटेलमध्ये रूम बूक केली अन् घडलं भयंकर
5
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? भारताच्या धाकाने मोठमोठ्या विमान कंपन्यांनी मार्ग बदलले
6
बलात्काराचा गुन्हा दाखल होताच एजाज खान फरार! पोलिसांकडून अभिनेत्याचा शोध सुरू
7
इलेक्ट्रिक गाड्या वापरणाऱ्यांसाठी मोठा झटका! सरकारने चार्जिंगचे नियम बदलले
8
बेस्ट बसची दुप्पट दरवाढ 'या' तारखेपासून लागू; आता प्रवाशांना मोजावे लागणार इतके पैसे
9
भारत- पाकिस्तान युद्धाबाबत बाबा वेंगांची भाकीत काय सांगतात? वाचा सविस्तर
10
Video: पाक समर्थकांना एकटाच भिडला परदेशी नागरिक; हाती तिरंगा घेत 'जय महाराष्ट्र'ची घोषणा
11
हसतं घर उद्ध्वस्त! हळदीच्या दिवशी नाचताना नवरी बेशुद्ध अन्...; वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा
12
दिलजीत दोसांझने 'पॉप क्वीन' शकिरालाही हसवलं, Met Gala साठी दोघं एकाच व्हॅनिटीतून पोहोचले
13
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
14
पीएम किसान सन्मान निधीच्या २०व्या हप्त्यापूर्वी मोठा बदल; 'या' शेतकऱ्यांना होणार फायदा
15
मिठी स्वच्छताप्रकरणी मुंबई पोलिसांची छापेमारी; गाळ काढल्याची खोटी माहिती देऊन लाटले ५५ कोटी
16
LIC नं मार्च तिमाहीत खरेदी केले ₹४७,००० कोटी रुपयांचे शेअर्स; 'या' स्टॉक्समध्ये मोठी गुंतवणूक, तुमच्याकडे आहे का?
17
VIDEO: ३ इन १ माईनमधून वाचणे पाकिस्तानसाठी कठीण; DRDO च्या क्षेपणास्त्रामुळे एक चूक ठरणार शेवटची
18
युद्ध झालं तर पाकिस्तानच्या हाती येईल 'भीक मागण्याच्या कटोरा', Moody's च्या रिपोर्टमधून झाले अनेक खुलासे
19
"विराटचे चाहते त्याच्यापेक्षा मोठे जोकर", राहुल वैद्यने कोहलीला मारला टोमणा; नक्की झालं काय?
20
Met Gala 2025: हातात हात घालून आले सिड-कियारा, प्रेग्नंट बायकोची काळजी घेताना दिसला सिद्धार्थ मल्होत्रा

तरुण पिढी ठरतेय कोरोनाचे टार्गेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:05 IST

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात दीड महिन्यापासून कोरोनाने पुन्हा डोके वर काढले असून, दररोज एक हजारांवर नव्या कोरोना रुग्णांची भर ...

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात दीड महिन्यापासून कोरोनाने पुन्हा डोके वर काढले असून, दररोज एक हजारांवर नव्या कोरोना रुग्णांची भर पडत आहे. या नव्या रुग्णांत १८ ते ५० वयोगटातील रुग्णांचीच संख्या अधिक आहे. एकप्रकारे तरुणांनाच कोरोना टार्गेट करत आहे. पण यात बहुतांश जणांना लक्षणेच नाहीत अथवा सौम्य लक्षणे असतात. मात्र, मधुमेह, हृदयरोग, उच्च रक्तदाब यासारख्या गंभीर आजारांसह कोरोनाची लागण झाल्याने ज्येष्ठांचे मृत्यूचे प्रमाण चिंताजनक असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले.

औरंगाबादेत १ ते ५० वर्षे वयोगटात कोरोनाबाधित रुग्णांची सर्वाधिक संख्या आहे. एकूण रुग्णांपैकी ५८ टक्के रुग्ण या वयोगटातील आहेत. मात्र, सर्वाधिक रुग्ण असूनही या वयोगटात मृत्यूचे प्रमाण सर्वात कमी आहे. ज्येष्ठांनाच धोका का, कमी वयात मृत्यूचे प्रमाण कमी का, असा प्रश्न सर्वसामान्यांकडून उपस्थित केला जात आहे. बहुतांश मृत रुग्णांना कोरोनासह अन्य आजारही असल्याचे समोर आलेले आहे. यात मधुमेह, हृदयरोग, उच्च रक्तदाब या आजारांचे प्रमाण अधिक आहे. एकाचवेळी अनेक आजारांमुळे उपचारास प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे मृत्यूचा धोका वाढत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मृत्यू पावलेल्या रुग्णांत ४० वर्षांखालील रुग्णांचे प्रमाण सर्वात कमी आहे, तर ५१ वर्षांवरील रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना मृत्यूचा सर्वाधिक धोका असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ज्येष्ठांची काळजी घेण्याचे आवाहन डॉक्टरांकडून होत आहे.

घाटीतील शरीर विकृतीशास्त्र विभागप्रमुख डाॅ. अनिल जोशी म्हणाले, ५० वर्षांवरील व्यक्तींचे मृत्यूचे प्रमाण ७० टक्क्यांवर आहे. उपचारासाठी लवकर आल्यास रुग्णांना फायदा होतो. काहीही त्रास असेल तर तो अंगावर काढता कामा नये. लसीकरणाचाही फायदा होत आहे. त्यामुळे लस घेतली पाहिजे.

-------

दुसऱ्या लाटेत कोरोनाचे एकूण रुग्ण (१ मार्च ते २२ मार्च २०२१)

२१, ७६२

-----

शहरातील वर्षभरातील कोरोना रुग्ण

वयोगट रुग्णसंख्या

शून्य ते ५ वर्षे - ८४१

५ ते १८ वर्षे - ४,९८१

१८ ते ५० वर्षे - २८,४१५

५० वर्षांवरील - १४,०५६

---

मास्क, लस महत्त्वपूर्ण

सध्याची परिस्थिती पाहता, कोरोना रुग्णांमध्ये तरुणांचे प्रमाण अधिक आहे, तर ज्येष्ठांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. मास्कचा वापर महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे नागरिकांनी मास्कचा वापर प्राधान्याने केला पाहिजे. लसीकरणासाठी जे पात्र आहेत, त्यांनी लस घेतली पाहिजे.

- डाॅ. कमलाकर मुदखेडकर,

अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक