शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
3
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
4
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
5
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
6
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
7
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
8
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
9
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
10
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
11
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
12
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
13
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
14
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
15
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
16
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
17
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
18
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
19
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
20
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."

साहित्य संमेलनावर कोरोनाचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:05 IST

औरंगाबाद : एकीकडे नाशिकमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची लगीनघाई सुरू झाली आहे, तर दुसरीकडे अवघ्या महाराष्ट्रावरच कोरोनाचे आक्रमण ...

औरंगाबाद : एकीकडे नाशिकमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची लगीनघाई सुरू झाली आहे, तर दुसरीकडे अवघ्या महाराष्ट्रावरच कोरोनाचे आक्रमण वाढत चालले आहे. त्यामुळे तयारी दणक्यात आणि काटेकोर नियोजनात सुरू असली तरी साहित्य संमेलनावर आता मात्र कोरोनाचे सावट घोंगावू पाहत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नुकताच मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राला सतर्कतेचा इशारा दिला आहे. अशी सर्व परिस्थिती असताना साहित्य संमेलनाचे काय, असा प्रश्न साहित्यप्रेमींकडून विचारला जात आहे.

लग्नसमारंभ आणि इतर कार्यक्रमांना जशी ५० लोकांची मर्यादा ठेवण्यात आली आहे, तशी मर्यादा आता साहित्य संमेलनावरही येणार का, जर मर्यादा आलीच तर साहित्य संमेलनांच्या केवळ व्यासपीठावरील व्यक्तींचीच गर्दी पाहता ५० लोकांत साहित्य संमेलन होणे शक्य आहे का, अशा अनेक चर्चांना सध्या साहित्य वर्तुळात ऊत आला आहे. नियोजनानुसार मार्चच्या अखेरीस साहित्य संमेलन होणार आहे. त्यामुळे तोपर्यंत परिस्थिती आटोक्यातही येऊ शकते, असेही काहींचे म्हणणे आहे. त्यामुळे सध्यातरी साहित्य संमेलनाच्या बाबतीत सगळेच अनिश्चिततेचे वातावरण झाले आहे.

चौकट :

शासनाच्या आदेशानुसार निर्णय घेऊ

साहित्य संमेलन घ्यायचे की नाही, साहित्य संमेलन झाले तर किती लोकांची उपस्थिती असेल, हा सगळा निर्णय आता शासन आदेशावर अवलंबून आहे. मार्च महिन्यातील कोरोनाची परिस्थिती पाहून शासनाकडून साहित्य संमेलनाच्या आयोजनाबाबत जो आदेश येईल, त्यानुसार आम्ही निर्णय घेऊ.

- दादा गोरे

कार्यवाह, अ. भा. साहित्य महामंडळ

चौकट :

मराठवाडा साहित्य परिषदेचे कार्यक्रम रद्द

दि. २४ फेब्रुवारी रोजी होणारा डॉ. सुधीर रसाळ यांचा सत्कार, दि. २७ फेब्रुवारी रोजी कविता दिनानिमित्त होणारा काव्य पुरस्कार समारंभ, दि. ३ मार्च रोजी डॉ. प्राचार्य प्रतापराव बोराडे यांना दिला जाणारा जीवनगौरव पुरस्कार प्रदान सोहळा हे सर्व मराठवाडा साहित्य परिषदेतर्फे होणारे कार्यक्रम कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे रद्द करण्यात आले आहेत.