शहरं
Join us  
Trending Stories
1
ना ठराव, ना निर्णय! भारताच्या गैरहजेरीतही UNSC बैठकीत पाकिस्तानची 'अशी' झाली फजिती
2
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
3
मिठी स्वच्छताप्रकरणी मुंबई पोलिसांची छापेमारी; गाळ काढल्याची खोटी माहिती देऊन लाटले ५५ कोटी
4
युद्ध झालं तर पाकिस्तानच्या हाती येईल 'भीक मागण्याच्या कटोरा', Moody's च्या रिपोर्टमधून झाले अनेक खुलासे
5
VIDEO: ३ इन १ माईनमधून वाचणे पाकिस्तानसाठी कठीण; DRDO च्या क्षेपणास्त्रामुळे एक चूक ठरणार शेवटची
6
"विराटचे चाहते त्याच्यापेक्षा मोठे जोकर", राहुल वैद्यने कोहलीला मारला टोमणा; नक्की झालं काय?
7
Met Gala 2025: हातात हात घालून आले सिड-कियारा, प्रेग्नंट बायकोची काळजी घेताना दिसला सिद्धार्थ मल्होत्रा
8
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
9
PNB मध्ये १ लाख रुपये जमा करा, मिळेल ₹१६,२५० चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीम डिटेल्स
10
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
11
भाजपच्या माजी खासदारावर प्राणघातक हल्ला, कार्यकर्त्यांनी घरात लपवल्यामुळे वाचला जीव
12
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
13
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
14
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
15
Crime News : धक्कादायक! पत्नीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन फिरत होता, पतीला पोलिसांनी अटक केली
16
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार
17
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
18
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
19
India Pakistan: पाकिस्तानच्या सीमेवर कुरापती सुरूच; सलग १२व्या दिवशी गोळीबार
20
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 

साहित्य संमेलनावर कोरोनाचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:05 IST

औरंगाबाद : एकीकडे नाशिकमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची लगीनघाई सुरू झाली आहे, तर दुसरीकडे अवघ्या महाराष्ट्रावरच कोरोनाचे आक्रमण ...

औरंगाबाद : एकीकडे नाशिकमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची लगीनघाई सुरू झाली आहे, तर दुसरीकडे अवघ्या महाराष्ट्रावरच कोरोनाचे आक्रमण वाढत चालले आहे. त्यामुळे तयारी दणक्यात आणि काटेकोर नियोजनात सुरू असली तरी साहित्य संमेलनावर आता मात्र कोरोनाचे सावट घोंगावू पाहत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नुकताच मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राला सतर्कतेचा इशारा दिला आहे. अशी सर्व परिस्थिती असताना साहित्य संमेलनाचे काय, असा प्रश्न साहित्यप्रेमींकडून विचारला जात आहे.

लग्नसमारंभ आणि इतर कार्यक्रमांना जशी ५० लोकांची मर्यादा ठेवण्यात आली आहे, तशी मर्यादा आता साहित्य संमेलनावरही येणार का, जर मर्यादा आलीच तर साहित्य संमेलनांच्या केवळ व्यासपीठावरील व्यक्तींचीच गर्दी पाहता ५० लोकांत साहित्य संमेलन होणे शक्य आहे का, अशा अनेक चर्चांना सध्या साहित्य वर्तुळात ऊत आला आहे. नियोजनानुसार मार्चच्या अखेरीस साहित्य संमेलन होणार आहे. त्यामुळे तोपर्यंत परिस्थिती आटोक्यातही येऊ शकते, असेही काहींचे म्हणणे आहे. त्यामुळे सध्यातरी साहित्य संमेलनाच्या बाबतीत सगळेच अनिश्चिततेचे वातावरण झाले आहे.

चौकट :

शासनाच्या आदेशानुसार निर्णय घेऊ

साहित्य संमेलन घ्यायचे की नाही, साहित्य संमेलन झाले तर किती लोकांची उपस्थिती असेल, हा सगळा निर्णय आता शासन आदेशावर अवलंबून आहे. मार्च महिन्यातील कोरोनाची परिस्थिती पाहून शासनाकडून साहित्य संमेलनाच्या आयोजनाबाबत जो आदेश येईल, त्यानुसार आम्ही निर्णय घेऊ.

- दादा गोरे

कार्यवाह, अ. भा. साहित्य महामंडळ

चौकट :

मराठवाडा साहित्य परिषदेचे कार्यक्रम रद्द

दि. २४ फेब्रुवारी रोजी होणारा डॉ. सुधीर रसाळ यांचा सत्कार, दि. २७ फेब्रुवारी रोजी कविता दिनानिमित्त होणारा काव्य पुरस्कार समारंभ, दि. ३ मार्च रोजी डॉ. प्राचार्य प्रतापराव बोराडे यांना दिला जाणारा जीवनगौरव पुरस्कार प्रदान सोहळा हे सर्व मराठवाडा साहित्य परिषदेतर्फे होणारे कार्यक्रम कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे रद्द करण्यात आले आहेत.