शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
2
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
3
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
4
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
5
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
6
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
7
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
8
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
9
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
10
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
11
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
12
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
13
"गणित जुळलं की...", अभिनेत्री ऋतुजा बागवे लग्नाबद्दल स्पष्टच बोलली
14
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
15
भारत, पाकिस्तान, अमेरिका अन् जपानमध्ये आपत्ती येणार; बाबा वेंगाची 'ती' भविष्यवाणी खरी होणार?
16
“...तोपर्यंत मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळणार नाही”: बाळासाहेब थोरात
17
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!
18
मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ‘हिट’, शेतकरी, धारावी पुनर्वसन आंदोलन याच मार्गाने जाणार?
19
“आज BJP आहे, उद्या बाजी पलटेल, काँग्रेस सत्तेत येईल”; कोणत्या नेत्यांनी व्यक्त केला विश्वास?
20
VIRAL : खोदकाम करताना सापडलं १९९७चं जलजीऱ्याचं पाकिट; पण सोशल मीडियावर का होतंय व्हायरल?

कोरोना कहर : एक होत नाही, तोच दुसऱ्या अंत्यविधीसाठी फोन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 12:48 IST

corona virus deaths increased in Aurangabad जिल्ह्यात कोरोनामुळे बुधवारी १८ जणांचा मृत्यू झाला तर गुरुवारी सायंकाळपर्यंत १६ जणांचे मृत्यू झाल्याचे समोर आले.

ठळक मुद्देमृत कोरोना रुग्णांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या संस्थांच्या सदस्यांची धावपळ

औरंगाबाद : कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या एकाचा अंत्यसंस्कार करत नाही, तोच दुसऱ्या अंत्यविधीसाठी फोन येतो, त्यानंतर तिसरा, चौथा....दिवसभर फोन वाजतच आहेत. मृतदेहावर अंत्यविधी करण्याचे पुण्य मिळत आहे, पण हे मृत्यूचे विदारक चित्र पाहावले जात नाही. आताही एका अंत्यविधीसाठी निघालो आहोत, या भावना आहेत, कोरोनाग्रस्ताच्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणाऱ्यांच्या.

जिल्ह्यात कोरोनामुळे बुधवारी १८ जणांचा मृत्यू झाला तर गुरुवारी सायंकाळपर्यंत १६ जणांचे मृत्यू झाल्याचे समोर आले. कोरोनामुळे मृत रुग्णांवर पंचशील महिला बचतगट व मोईन मस्तान ग्रुपच्या माध्यमातून सर्वधर्मिय अंत्यसंस्कार केले जातात. जिल्ह्यात गतवर्षी ऑगस्टमध्ये एका दिवसांत १४ रुग्णांचा मृत्यू झाला; परंतु गेल्या दोन दिवसांपासून मृत्यूच्या संख्येने उच्चांक गाठला आहे. या सगळ्यात अंत्यविधीसाठी या दोन सामाजिक संस्थांचे सदस्य धावपळ करत आहे. सध्या ऊन तापू लागले आहे. अशा तापलेल्या वातावरणात पीपीई कीट घालून अंत्यविधी केले जात आहे. पूर्वी नातेवाईक येण्याचे धाडस करत नसत, पण सध्या स्मशानभूमीत नातेवाईक येत असल्याचे या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

दोन दिवसांपासून धावपळगेल्या दोन दिवसांपासून एक अंत्यविधी करत नाही, तोच इतर रुग्णालयांतून फोन येत आहे. अंत्यविधीसाठी आवश्यक परवानगीची प्रक्रिया नातेवाईकांना करावी लागते. ही परवानगी मिळताच अर्धा ते एक तासात अंत्यविधी होतो. काल १२ आणि आज ९ अंत्यविधी केले.- मोईन मस्तान,मस्तान ग्रुप

रात्रीच घरी जातोकोरोनाने मृत रुग्णांच्या अंत्यविधीसाठी २४ तास सेवा दिली जात आहे. मागच्या वर्षी एका दिवशी जेवढे अंत्यविधी होत, त्या तुलनेत गेल्या दोन दिवसांत अधिक अंत्यविधी केले. रात्रीच घरी जात आहे.-मिलिंद म्हस्के, पंचशील महिला बचतगट

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद