शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

Corona Virus In Aurangabad : पैठणची शालिवाहन शक शुभारंभाची ऐतिहासिक शोभायात्रा रद्द; केवळ तीर्थखांबावर गुढी उभारून पाडवा साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2020 17:05 IST

पैठण शहरात असलेल्या शालीवाहनाच्या राजवाड्याच्या बाजूला भव्य अशी दगडी शिल्पाची गुढी उभारली, आज यास तीर्थखांब म्हणून ओलखले जाते.

पैठण : शक कर्ता शालिवाहन राजाच्या दैदिप्यमान कारकिर्दिचे स्मरण करण्यासाठी दरवर्षी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर  पैठण येथे मराठी नववर्षाचा जनक  व पैठण भूमिपुत्र असलेल्या शालिवाहन राजाच्या प्रतिमेसह शालिवाहन शक शुभारंभ शोभायात्रेचे आयोजन करण्यात येते. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा शोभायात्रा रद्द करून ऐतिहासिक तीर्थखांबावर गुढी उभारून परंपरा जोपासण्यात आली. 

 पैठणच्या सातवाहन घराण्याने देशावर ई स पूर्व २३० ते  २३० असे ४५० वर्षाहून अधिक काळ राज्य केले, त्यांच्या साम्राज्याची राजधानी पैठण नगरी होती. सातवाहन सम्राट पुलुमावी याने उज्जैनच्या विक्रमादित्याच्या प्रचंड सैन्याचा पराभव करून विजयाचे स्मरण रहावे म्हणून मराठी कालगनणेस चैत्र शुध्द प्रतिपदेस प्रारंभ केला. पैठण शहरात असलेल्या शालीवाहनाच्या राजवाड्याच्या बाजूला भव्य अशी दगडी शिल्पाची गुढी उभारली, आज यास तीर्थखांब म्हणून ओलखले जाते. मराठी नववर्षाच्या या दिनाशी शालिवाहनांचा वैभवशाली ईतिहास जोडलेला असल्याने पैठण नगरीस आजच्या दिनाचे महत्व काही औरच असते. मात्र, कोरोनाचे संकट समोर असल्याने आजचा उत्सव रद्द करून पैठण करांनी परंपरा खंडीत होऊ नये म्हणून तीर्थखांबावर एका नागरिकाने जाऊन गुढी उभारली.

पैठण येथे ८ एप्रिल १९७८च्या वर्षप्रतिपदेला शालिवाहन समारोह साजरा करण्यास प्रारंभ करण्यात आला होता. या पहिल्याच कार्यक्रमाला विद्यापीठाचे कुलगुरू बी आर भोसले आणि ईतिहास विभागाचे प्रमुख डॉ पंढरीनाथ राणडे यांनी आवर्जून हजेरी लावली होती.  ईतिहास संशोधक व संग्राहक कै बाळासाहेब पाटिल यांनी शालिवाहन शक वर्षारंभ दिनी समारोह साजरा करण्याची परंपरा चालू ठेवली. त्यांच्या नंतर  ईतिहास प्रेमी नागरिकांनी शालिवाहन काळाचे स्मरण व चिंतन व्हावे या हेतूने ही परंपरा जोपासली.

शालिवाहन ( सातवाहन ) कालीन ईतिहासाचे नवीन दृष्टिकोणातून आकलन करणे गरजेचेसातवाहन साम्राज्या खाली संपूर्ण दक्षिण भारतीय द्विपकल्प येत असे, सातवाहनाची वाहने हत्ती घोडे त्रिसमुद्राचे पाणी पीत असत असे म्हटल्या जात होते या वरून                  ' त्रिसमुद्रतोय पितवावन ' अशी उपाधी शालिवाहन राजास दिली गेली होती सातवाहनाच्या साम्राज्याचा पाऊल खुणा आजही त्याची राजधानी असलेल्या पैठण नगरीत अस्तित्वात आहे या वैभवशाली ईतिहासाचे नव्या दृष्टीकोणातून आकलन करण्याची आता गरज असल्याचे जाणवत आहे यात सातवाहन कालीन लोकसाहित्य आज मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असून या साहित्याचे ऐतिहासिक आकलन करणे गरजेचे आहे तसेच सातवाहन कालीन शिलालेखांचे संकलन करून तत्कालीन समाज व संस्कृति वर प्रकाश टाकावा लागणार आहे सातवाहनकालिन बौध्द लेणी महाराष्ट्र भर असून या लेणीसमूहातून प्रकट होणाऱ्या कला, साहित्य व संस्कृतिचे अध्यपन अद्याप झालेले नाही, यातून सातवाहन कालीन लोकसंस्कृतीसह सामाजिक आर्थिक पैलूचे नव्याने आकलन होऊ शकते. असे, ईतिहासकारांचे मत आहे. शालीवाहन राजाने आपल्या नावाने शक सुरू केला; त्यामुळे शककर्ता शालिवाहन अशी उपाधी दिली जाते शालिवाहनाच्या काळात भूगोल खगोल ज्योतिष पंचांग गणित ई. विषय प्रगतीपथावर होते. त्याच प्रमाणे शिक्के, मणी, आभुषणे, भांडी, पैठणी वस्त्र, नाणी, व स्थापत्यकला साहित्य  आदिची भरभराट झाली होती. शिवाय, वैदिक धर्म, बौध्दधर्म व जैनधर्म आदी गुण्या गोविंदाने नांदत असत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद