शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मध्य रेल्वेची ठाणे ते सीएसएमटी दरम्यानची वाहतूक पूर्णपणे बंद
2
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
3
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
4
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
5
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
6
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?
7
ट्रम्प यांना भेटायला गेलेल्या झेलेन्स्कींनी मेलानियांसाठी पाठवले खास पत्र; काय आहे या पत्रात?
8
आज उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराची घोषणा करणार 'I.N.D.I.A.'? ही 3 नावं शर्यतीत!
9
'हिंदुस्तान झिदाबाद...' तिरंग्यासाठी लंडनमध्ये पाकिस्तानींशी भिडल्या भारतीय तरुणी, पाहा VIDEO
10
पैसे दुप्पट करते ही सरकारी योजना; ५ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळेल १० लाखांचा गॅरंटीड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
पतीच्या निधनामुळे खचलेल्या तिच्या आयुष्यात 'तो' आला अन् मोठा झटका देऊन गेला! तरुणीसोबत घडलं असं काही की...
12
LIC ची मोठी घोषणा! बंद पडलेल्या पॉलिसी पुन्हा सुरू करण्याची सुवर्णसंधी; विलंब शुल्कातही मोठी सूट
13
मुंबईतील सर्व सरकारी कार्यालयांना सुट्टी; खासगी कंपन्यांना वर्क फ्रॉम देण्याच्या सूचना, शाळा, कॉलेज बंद
14
रोनाल्डोचा साखरपुडा आणि सौदीचे ‘रहस्य’! स्थानिकांना वेगळा नियम आणि स्टारला वेगळा न्याय, का?
15
ठाकरे बंधू किंवा महायुती कुणीही निवडणूक जिंकली तरी बेस्ट कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल का?
16
चिपळुणात वाशिष्ठी नदीने ओलांडली इशारा पातळी; पूरसदृश स्थितीमुळे कामाशिवाय घराबाहेर न पडण्याची सूचना
17
"२६ जुलैचा जलप्रलय, तुम्ही मला...", वीणा जामकरने सांगितली ज्योती चांदेकरांची भावुक आठवण
18
ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीनंतर पुतिन यांना आली भारताची आठवण, डायल केला पंतप्रधान मोदींचा नंबर; सगळंच सांगितलं!
19
Pune Traffic: पुण्यात सकाळपासून मुसळधार! शहरात प्रचंड वाहतूककोंडी, प्रमुख मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा
20
"झोया अख्तर बड्या बापाची मुलगी...", 'गलीबॉय'साठी ऑडिशन द्यायला सांगितल्याने भडकल्या उषा नाडकर्णी

कोरोनाने घेतला ग्रामीण भागातील पाचशे नागरिकांचा जीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:05 IST

ज्ञानेश्वर भाले औरंगाबाद : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव शहरापेक्षा ग्रामीण भागात अधिक तीव्र आहे. दिवसागणित रुग्णांची संख्या वाढत असून, ...

ज्ञानेश्वर भाले

औरंगाबाद : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव शहरापेक्षा ग्रामीण भागात अधिक तीव्र आहे. दिवसागणित रुग्णांची संख्या वाढत असून, बाधितांचा आकडा १९ हजार ६३९ पर्यंत पोहोचला आहे. यात जवळपास पाचशे नागरिकांचे जीव कोरोनारूपी राक्षसाने घेतल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे.

जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोनासंबंधी नियमांचे पालन होत नसल्याने बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यात गंगापूर तालुक्यातील सर्वाधिक चार हजार ३९५ रुग्ण असून, ८८ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यापाठोपाठ कन्नडमध्ये तीन हजार ३०८ रुग्ण, ११० मृत्यू, पैठणमध्ये तीन हजार २२१ रुग्ण, ५३ मृत्यू तर औरंगाबाद तालुक्यात तीन हजार १४५ रुग्ण असून, २९ जणांचा जीव कोरोनाने घेतला आहे. प्रशासकीय स्तरावर जनजागृती करूनसुद्धा बहुतांश नागरिक नियमांकडे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे. परिणामी बाधितांचा आकडा औरंगाबाद शहरापेक्षा ग्रामीण भागात अधिक वाढत असल्याचे पुढे येत आहे. जिल्ह्यातील तब्बल ९३४ गावांत कोरोनाचा शिरकाव झाला असून, सातत्याने संबंधित गावात रुग्ण आढळून येत आहे. यासह आतापर्यंत जिल्ह्यातील ३१५ गावांनी कोरोनाला आपल्या गावात प्रवेश करू दिला नाही.

----- कोट ----

ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने ग्रामपंचायत स्तरावर जनजागृती व उपाययोजना केल्या जात आहे. आमच्या गावात सध्या कोरोनाचा एकच रुग्ण आहे. मात्र इतर गावात रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे प्रशासनाने व्यापक स्वरूपात जनजागृती करत तातडीने उपाययोजना कराव्यात.

- सरला तांदळे, गणोरी, सरपंच