शहरं
Join us  
Trending Stories
1
गुरुवारी सायंकाळी तुर्की तर पहाटे हादरला चीन; पाकिस्ताननंतर त्याला साथ देणाऱ्या देशांना भूकंपाचे धक्के
2
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
3
भारतात तुर्की अन् अझरबैजानवरील बहिष्काराला वेग; ३० टक्के भारतीय पर्यटकांनी बुकिंग रद्द केले
4
आजचे राशीभविष्य १६ मे २०२५ : नोकरी - व्यवसायात लाभ प्राप्ती, कोणाच्या राशीत काय...
5
Sankashti Chaturthi 2025: 'घालीन लोटांगण' हा आरतीचा एक भाग नसून ते आहे स्वतंत्र कवन, पण कोणाचे? वाचा!
6
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
7
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
8
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
9
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
10
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
11
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
12
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
13
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
14
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
15
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
16
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
17
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
18
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
19
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
20
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही

ग्रामीण भागांनी रोखला कोरोना, ९२ टक्के नवे रुग्ण शहरातील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:02 IST

औरंगाबाद : जिल्ह्यात कोरोनाचा पुन्हा एकदा झपाट्याने प्रसार होत आहे; परंतु हा प्रसार औरंगाबाद शहरातच सर्वाधिक आहे. नव्याने आढळलेले ...

औरंगाबाद : जिल्ह्यात कोरोनाचा पुन्हा एकदा झपाट्याने प्रसार होत आहे; परंतु हा प्रसार औरंगाबाद शहरातच सर्वाधिक आहे. नव्याने आढळलेले ९२ टक्के रुग्ण शहरातीलच आहेत. ग्रामीण भागाने आतापर्यंत कोरोनाला बऱ्यापैकी रोखले आहे. मात्र, ग्रामीण भागातून शहरात ये-जा करण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे यापुढे ग्रामीण भागात कोरोनाचा प्रसार होण्यापासून रोखण्याचे आव्हान आरोग्य यंत्रणेपुढे राहिले आहे.

एकीकडे ग्रामीण भागातील विरळ लोकवस्तीमुळे कोरोचा प्रसार होत नाही, तर दुसरीकडे दाट लोकवस्तीचा शहराला फटका बसत आहे. शहरातील सार्वजनिक ठिकाणी होणारी गर्दी, मास्क, सोशल डिस्टन्सच्या पालनाकडे दुर्लक्षाने काेरोना वाढीला हातभार लागत असल्याचे आरोग्य यंत्रणेचे म्हणणे आहे. जिल्ह्यात बुधवारपर्यंत सक्रिय म्हणजे रुग्णालयात उपचार घेणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या एक हजार ३१२ होती. यात ग्रामीण भागांतील रुग्णांची संख्या केवळ ११२ आहे. त्याउलट शहरातील रुग्णांची संख्या १२०० आहे. जिल्ह्यातील एकूण नव्या रुग्णांपैकी ग्रामीण भागातील रुग्णांची संख्या केवळ ८ टक्के आहे. ही परिस्थिती कायम राहण्यासाठी आरोग्य यंत्रणेकडून प्रयत्न सुरू आहेत.

विरळ लोकसंख्येचा फायदा

जिथे लोकांचा समूह अधिक, तिथे संसर्गाची अधिक भीती असते. ग्रामीण भागात लोकसंख्या ही विरळ असते. त्यामुळे तेथे संसर्ग होण्याचे प्रमाण हे कमी दिसते; परंतु ग्रामीण भागातून शहरात ये - जा होत असते. त्यामुळे संसर्ग वाढण्याचा धोका हा तिथेही असतो. नागरिकांनी मास्क, सोशल डिस्टन्सचे पालन करावे, गर्दीत जाण्याचे टाळले पाहिजे.

-डॉ. स्वप्नील लाळे, आरोग्य उपसंचालक

शहरातील पॉझिटिव्हिटी रेट १५ टक्क्यांवर

शहरातील पॉझिटिव्हिटी रेट बुधवारी १५.४२ टक्के झाला. ६ फेब्रुवारी रोजी पॉझिटिव्हिटी रेट केवळ ४.५० टक्के होता.

शहर व ग्रामीण भागातील स्थिती (२४ फेब्रुवारीपर्यंत)

जिल्ह्यातील एकूण रुग्ण-४९,२९१

शहरातील एकूण रुग्ण- ३३ ,०३७

ग्रामीण भागातील एकूण रुग्ण-१६,२५४

शहरात सक्रिय रुग्ण-१२००

ग्रामीण भागात सक्रिय रुग्ण-११२