शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
2
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
3
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
4
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
5
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
6
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
7
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
8
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
9
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
10
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
11
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
12
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
13
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानकडून काही तासांतच युद्धविरामाचं उल्लंघन, जम्मू, श्रीनगरमध्ये ड्रोनहल्ले
14
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
15
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
16
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
17
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
18
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
19
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
20
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला

कोरोना रुग्णाचा स्वच्छतागृहात मृ्त्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:02 IST

औरंगाबाद : ऑक्सिजनवर असलेला कोरोना रुग्ण स्वच्छतागृहात गेला. मात्र, अचानक स्वच्छतागृहातच रुग्णाची प्रकृती खालावली. बराच वेळ झाल्यानंतरही रुग्ण बाहेर ...

औरंगाबाद : ऑक्सिजनवर असलेला कोरोना रुग्ण स्वच्छतागृहात गेला. मात्र, अचानक स्वच्छतागृहातच रुग्णाची प्रकृती खालावली. बराच वेळ झाल्यानंतरही रुग्ण बाहेर आला नसल्याचे लक्षात येताच दरवाजा तोडून रुग्णाला बाहेर काढून आयसीयूत हलविण्यात आले. मात्र, दुर्दैवाने रुग्णाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी पहाटे जिल्हा सामान्य रुग्णालयात घडली. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाइकांनी केला.

गुलाबराव ढवळे (६५, रा. जयभवानीनगर) असे मत रुग्णाचे नाव आहे. कोरोनाच्या उपचारासाठी त्यांना २७ मार्च रोजी जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. रुग्णालयात दाखल होतानाच ऑक्सिजनची पातळी कमी होती. त्यामुळे ते ऑक्सिजनवर होते. सोमवारी पहाटे ते स्वच्छतागृहात गेले. त्यांना स्वच्छतागृहात जाऊन खूप वेळ झाला, तरीही ते बाहेर आले नसल्याची बाब अन्य रुग्ण, कर्मचाऱ्यांच्या लक्षात आली. त्यांनी स्वच्छतागृहाचा दरवाजा वाजविला. परंतु आतून काहीही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे दरवाजा तोडून त्यांना आयसीयूत दाखल करण्यात आले. परंतु सकाळी ७.४० वाजता त्यांचा मृत्यू झाला.

नातेवाइकांचा आरोप, पहाटे २ ते ६ वाजेपर्यंत स्वच्छतागृहातच पडून...

स्वच्छतागृहात वडील पहाटे २ वाजता गेले, पण सकाळचे ६ वाजूनही ते बाहेर आले नसल्याचे अन्य रुग्णांनी फोनवर सांगितले. त्यामुळे सकाळी मी रुग्णालयात गेलो. तेव्हा दरवाजा तोडून वडिलांना बाहेर काढले. आयसीयूत दाखल केले, पण त्यांचा मृत्यू झाला. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी लक्ष दिले नाही. कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळेच ही दुर्दैवी घटना घडली आणि वडिलांचा मृत्यू झाला. याप्रकरणी दोषी असलेल्या कर्मचाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, त्यांना निलंबित करावे, अशी मागणी रुग्णाचा मुलगा नीलेश ढवळे यांनी केली आहे.

उपचारादम्यान मृत्यू

सदर रुग्ण पहाटे ५.३० वाजता स्वच्छतागृहात गेला होता. सकाळी ६ वाजेपर्यंतही ते बाहेर आले नाही. ही बाब लक्षात येताच दार तोडून त्यांना बाहेर काढले. तेव्हा आधारासह खाटेपर्यंत ते चालत आले. त्यांच्यावर आयसीयूत तत्काळ उपचार करण्यात आले. प्रकृतीत सुधारणा होत नव्हती. त्यांना व्हेंटिलेटरही लावण्यात आले. पण त्यांचा मृत्यू झाला.

- डाॅ. सुंदर कुलकर्णी, जिल्हा शल्यचिकित्सक