शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
2
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
3
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
4
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान
5
१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला
6
विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर
7
‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
8
‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत
9
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
10
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
11
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
12
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
13
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
14
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
15
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
16
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
17
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
18
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
19
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
20
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात

कोरोनाच्या उद्रेकाचा लघु-मध्यम उद्योगांना मोठा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:06 IST

विजय सरवदे औरंगाबाद : कोरोना महामारीच्या उद्रेकामुळे औरंगाबादेतील सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. एप्रिलमध्ये ...

विजय सरवदे

औरंगाबाद : कोरोना महामारीच्या उद्रेकामुळे औरंगाबादेतील सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. एप्रिलमध्ये महाराष्ट्र तसेच आजूबाजूच्या राज्यांत लॉकडाऊन लागल्यामुळे ऑर्डरचे प्रमाण व पुरवठा साखळी विस्कळीत झाली. स्थानिक तसेच परप्रांतीय कामगार कमी झाल्यामुळे औरंगाबादेतील २० ते ३० टक्के उद्योगांवर उत्पादन प्रक्रिया थांबविण्याची वेळ आली.

औरंगाबादेत वाळूज, रेल्वेस्टेशन, चिकलठाणा, शेंद्रा आणि चितेगाव या प्रमुख पाच औद्योगिक वसाहतींमध्ये ५ हजार सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग, तर जवळपास ५०० मोठे उद्योग आहेत. यामध्ये अडीच ते पावणे तीन लाख कामगार काम करतात. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत शासनाने लागू केलेल्या कडक निर्बंधाचा (लॉकडाऊन) सर्वाधिक फटका सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना बसला आहे. दिल्ली, मुंबई तसेच आजूबाजूच्या राज्यांतील मोठ्या शहरांमध्ये बाजारपेठा बंद आहेत. त्यामुळे पुरवठा साखळी खंडित झाली आहे. ऑर्डरचे प्रमाणही कमी झाले आहे.

दुसरीकडे अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कंपन्या, निर्यात करणाऱ्या कंपन्या आणि कामगारांची निवास, भोजन व आरोग्याची सुविधा कंपन्यांमध्येच करणाऱ्या आस्थापनांना उत्पादन सुरू ठेवण्याची मुभा आहे. त्यामुळे अन्य अवलंबित सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांपैकी जवळपास २० ते ३० टक्के उद्योग बंद पडले असून उर्वरित उद्योगांची ३० टक्के उत्पादन क्षमता घटली आहे. त्यामुळे औरंगाबादेतील उद्योजक चिंतेत असून जीव आणि जीवनमान सुरक्षित असले तरच उद्योग टिकतील. त्यामुळे सुरू असलेल्या उद्योगांमध्ये कोरोना उपाययोजनांसंबंधीच्या सर्व नियमांचे कटाक्षाने पालन केले जात आहे.

चौकट.........

स्थानिक मनुष्यबळाचाही तुटवडा

यासंदर्भात ‘मासिआ’चे अध्यक्ष अभय हंचनाळ यांनी सांगितले की, कोरोनाच्या वाढत्या संसर्गाचा मोठा परिणाम सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योगांवर झाला आहे. ३० टक्के उत्पादन क्षमता घटली असून तेवढ्याच प्रमाणात उद्योग बंद पडले आहेत. कोरोनाच्या भीतीपोटी केवळ परप्रांतीय कामगारच गावी निघून गेले असे नाहीत, तर स्थानिक कामगारही भीतीपोटी गावी परतले आहेत. काहीजण लॉकडाऊन लागण्यापूर्वी निघून गेले ते अद्याप परतलेले नाहीत.