शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
4
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
5
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
6
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
7
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
8
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
9
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
10
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
11
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
12
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
13
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
14
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
15
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
16
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
17
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
18
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
19
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
20
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं

शीतपेय व्यावसायिकांना कोरोनाने केले थंडगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:04 IST

गल्ले बोरगावसह ग्रामीण भागातील बाजारपेठ, बसस्थानक परिसरात ज्यूस, शीतपेय व्यवसाय, रसवंतीची दुकाने थाटू लागतात. मात्र, यंदाही कोरोनाचे संकट असल्याने ...

गल्ले बोरगावसह ग्रामीण भागातील बाजारपेठ, बसस्थानक परिसरात ज्यूस, शीतपेय व्यवसाय, रसवंतीची दुकाने थाटू लागतात. मात्र, यंदाही कोरोनाचे संकट असल्याने व्यवसायाचे बारा वाजले.

उन्हाळ्याच्या चार महिन्यांत वर्षभराचे उत्पन्नाचे नियोजन शीतपेय व्यावसायिक दरवर्षी करून ठेवतात. यावर्षी फेब्रुवारी महिन्यात बसस्थानक, आठवडी बाजार परिसर, नवीन बायपास परिसरासह आदी भागात शीतपेयांची दुकाने सुरू झाली.

स्थानिक व्यावसायिकांनी आइस्क्रीम, लस्सी विक्रेत्यांनीही आपली दुकाने थाटली. मात्र, गेल्या १५ दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे शीतपेयाच्या विक्रीत कमालीची घट झाली आहे. मार्च, एप्रिल व मे या तीन महिन्यांत नागरिक थंडपेय दुकानांमध्ये गर्दी करतात. मात्र, गल्ले बोरगाव परिसरासह इतर ठिकाणी सध्या या दुकानांकडे कोरोनाच्या भीतीने ग्राहकांनी पाठ फिरविली आहे.

---- प्रतिक्रिया ---

उन्हाळ्याचे हे दिवस आमच्या कमाईचे असतात. मात्र, पुन्हा एकदा अंशतः लॉकडाऊनमुळे आइस्क्रीम, ज्यूसची मागणी घटली आहे. यासह वाहतुकीच्या समस्येमुळे मालाची आयात करणेही अवघड होऊन बसले आहे.

- अमोल भोजने, शीतपेय विक्रेता, गल्ले बोरगाव