शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

औरंगाबादेत २९ दिवसांच्या मुलाचा, ६ महिन्यांच्या मुलीचा आणि १४ वर्षांच्या मुलाचा कोरोनाने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:02 IST

औरंगाबाद : जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढत असून, घाटी रुग्णालयात उपचार सुरू असताना अवघ्या २९ दिवसांच्या कोरोनाग्रस्त मुलाचा ...

औरंगाबाद : जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढत असून, घाटी रुग्णालयात उपचार सुरू असताना अवघ्या २९ दिवसांच्या कोरोनाग्रस्त मुलाचा आणि ६ महिन्यांच्या मुलीचा २९ मार्च रोजी मृत्यू झाला. हे दोन्ही शिशू कन्नड येथील रहिवासी आहेत. यासह एका १४ वर्षीय मुलाचाही कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती घाटी प्रशासनाने दिली. आतापर्यंत केवळ ज्येष्ठांना धोका असल्याचे सांगितले जात होते. परंतु या तिघांच्या मृत्यूने आरोग्य यंत्रणेसमोर नवे आव्हान उभे राहिले आहे.

२९ दिवसांचा मुलगा २८ मार्च रोजी अतिगंभीर अवस्थेत दाखल झाला होता आणि त्याची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली होती. रुग्णाच्या पालकांची कोरोनाची चाचणी करण्यात आली असून, त्याचे वडील कोविड पॉझिटिव्ह आहेत. त्यांच्यावरही उपचार सुरू आहेत. या शिशूला हार्ट डिसिस होता. मृत्यूचे कारण कॉम्प्लेक्स कंजेनायटल हार्ट डिसिस, कार्डिओजेनिक शॉक, डिस्सेमिनेटेड इन्ट्राव्हॅस्क्युलर कोअ‍ॅग्युलेशन, पल्मनरी हिमरेज, कोविड-१९ असे आहे.

त्याबरोबरच ६ महिने वयाच्या कोरोनाग्रस्त मुलीला २७ मार्च रोजी गंभीर अवस्थेत दाखल करण्यात आले होते. मृत्यूचे कारण सिव्हिअर ब्रॉन्कोन्यूमोनिया विथ ॲक्युट रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम, सेप्टीक शाॅक, डिस्सेमिनेटेड इन्ट्राव्हॅस्क्युलर कोअ‍ॅग्युलेशन, कोविड-१९ असे आहे.

तसेच औरंगाबादेतील ज्युबिली पार्क येथील १४ वर्षांच्या मुलाला २३ मार्च रोजी भरती करण्यात आले होते. उपचार सुरू असताना त्यानेही सोमवारी अखेरचा श्वास घेतला.

चौकट...

यापूर्वी १० दिवसांच्या शिशूचा मृत्यू

घाटीत गतवर्षी ७ सप्टेंबर २०२० रोजी नांदेडवरून रेफर झालेल्या १० दिवसांच्या शिशूचा मृत्यू झाला नव्हता. त्यानंतर बालकांच्या मृत्यूचे प्रमाण नव्हते. हे शिशू नांदेड जिल्ह्यातील होते. कन्नड येथील २९ दिवसांचा मुलगा हा औरंगाबाद जिल्ह्यात सर्वांत कमी वयाचा कोरोना मृत्यू ठरला आहे.

कोट...

गंभीर अवस्थेत दाखल

लहान मुलांत सौम्य स्वरूपाची लक्षणे दिसून येत होती. पण, गेल्या काही दिवसांत ३ ते ४ बालके गंभीर अवस्थेत दाखल झाली. २९ दिवसांचे आणि ६ महिन्यांचे शिशू दाखल होतानाच त्यांची प्रकृती गंभीर होती. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. त्यांना आई-वडिलांकडून संसर्ग झाल्याची शक्यता असू शकते.

-डाॅ. प्रभा खैरे, बालरोग विभागप्रमुख, घाटी