शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

मका उत्पादक पुन्हा अडचणीत

By admin | Updated: November 19, 2014 01:00 IST

सुनील कच्छवे , औरंगाबाद खरीप हंगामात पुरेसा पाऊस न झाल्यामुळे यंदा जिल्ह्यातील मका पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. पावसाअभावी मक्याचे पीक करपून गेले.

सुनील कच्छवे , औरंगाबादखरीप हंगामात पुरेसा पाऊस न झाल्यामुळे यंदा जिल्ह्यातील मका पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. पावसाअभावी मक्याचे पीक करपून गेले. त्यामुळे शेतकऱ्यांचे एकरी उत्पन्न १६ क्विंटलवरून ३ ते ४ क्विंटलवर आले आहे. अनेक शेतकऱ्यांचा पेरणीचा खर्चही निघालेला नाही.अत्यल्प पावसामुळे यंदा औरंगाबाद जिल्हा दुष्काळी परिस्थितीचा सामना करीत आहे. आॅगस्टनंतर जिल्ह्यात पाऊसच झाला नाही. त्यामुळे खरिपाच्या पिकांचे खूप मोठे नुकसान झाले. जिल्ह्यात कापूस आणि मका ही खरिपाची प्रमुख पिके आहेत. यापैकी ४ लाख ३३ हजार हेक्टर क्षेत्रावर कपाशी, तर १ लाख ५५ हजार हेक्टर क्षेत्रावर मका पिकाची लागवड झाली होती. जून महिना कोरडा गेल्यामुळे दोन्ही पिकांची पेरणी महिनाभर उशिराने झाली होती. शिवाय आॅगस्टनंतर पुन्हा पावसाने पाठ फिरविली. मक्याची वाढ होण्याच्या काळात पाऊस नसल्याने या पिकाला जबरदस्त फटका बसला. हजारो हेक्टरवरील मक्याचे पीक पाण्याअभावी करपून गेले. जेथे थोडीफार वाढ झाली तेथेही मक्याची कणसे पुरेशी भरली नाहीत. त्यामुळे मका उत्पन्न ६० ते ७० टक्क्यांनी घटले आहे. जिल्ह्यातील मका उत्पादनाची सरासरी एकरी १६ क्विंटल आहे. मात्र, यंदा हे उत्पन्न ३ ते ४ क्विंटलवर आले आहे. परिणामी, जिल्ह्यातील मका उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. खर्च सहा हजार, उत्पन्न २,६०० रुपयेऔरंगाबाद तालुक्यातील फेरण जळगाव येथील शेतकरी अशोक हिवराळे यांनी दीड एकरात मका पिकाची लागवड केली होती. त्यासाठी बियाणासह खत, खुरपणी आदींसाठी एकूण सहा हजार रुपये खर्च केला होता. त्यांना या दीड एकरात अवघे तीन क्विंटल एवढेच उत्पन्न निघाले. त्यातून त्यांना केवळ २,६६५ रुपये मिळाले. झालेला खर्चही निघालेला नाही. फेबु्रवारीनंतर चाऱ्याचा प्रश्न भेडसावणारमका पिकाला फटका बसल्यामुळे केवळ शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसानच झालेले नाही, तर जिल्ह्यात चाऱ्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे. औरंगाबाद जिल्ह्यात मका पिकाचे क्षेत्र मोठे आहे. त्यामुळे जिल्ह्यात चारा म्हणून मका पिकाकडे बघितले जाते; परंतु यंदा हजारो हेक्टरवरील मका पीक पाण्याअभावी करपून गेले आहे. त्यामुळे जिल्ह्यात फेबु्रवारीनंतर चाराटंचाई भासेल असा प्रशासनाचा अंदाज आहे.१मका उत्पादनासाठी औरंगाबाद जिल्हा आघाडीवर आहे. सिल्लोड, सोयगाव, खुलताबाद, औरंगाबादसह जिल्ह्यातील सर्व नऊही तालुक्यांत मक्याचे उत्पन्न घेतले जाते. २दरवर्षी जिल्ह्यात सरासरी ६० लाख क्विंटल मका उत्पादित केला जातो. यंदा उत्पन्न जवळपास ७० टक्क्यांनी घटले आहे. त्यामुळे मका उत्पादक शेतकऱ्यांना सुमारे चारशे कोटी रुपयांचा फटका बसल्याचा जाणकारांचा अंदाज आहे.