शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
3
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
4
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
5
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
6
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
7
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
8
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
9
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
10
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
11
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
12
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
13
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
14
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
15
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
16
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
17
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
18
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
19
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
20
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले

उकिरड्याचे नंदनवनमध्ये रूपांतर

By admin | Updated: November 6, 2016 01:03 IST

औरंगाबाद : महापालिकेच्या मालकीच्या अनेक खुल्या जागांचा वापर कचराकुंडीसाठी करण्यात येत आहे. या जागांचा अत्यंत कल्पकतेने वापर केल्यास

औरंगाबाद : महापालिकेच्या मालकीच्या अनेक खुल्या जागांचा वापर कचराकुंडीसाठी करण्यात येत आहे. या जागांचा अत्यंत कल्पकतेने वापर केल्यास ठिकठिकाणी नंदनवन तयार होऊ शकते हे जवाहरलाल नेहरू अभियांत्रिकी महाविद्यालयातील आर्किटेक्ट विभागाच्या विद्यार्थ्यांनी दाखवून दिले. पैठणगेट येथील पार्किंगच्या जागेचा वापर मागील ३० वर्षांपासून नागरिक कचराकुंडीसारखा करीत होते. विद्यार्थ्यांनी या परिसराला सुशोभित केले.महापालिकेच्या मालकीच्या खुल्या जागा असंख्य आहेत. या जागांची देखभाल, दुरुस्ती मनपाकडून होत नाही. कोट्यवधी रुपयांच्या या जागांचा वापर मागील काही वर्षांपासून कचराकुंडीसाठी करण्यात येत आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात म्हणजेच पैठणगेट येथेही पार्किंगसाठी खुली जागा सोडण्यात आली आहे. या जागेवर अनेक नागरिक, व्यापारी कचरा आणून टाकत असत. क्रेडाई या बांधकाम व्यावसायिक संघटनेने मनपाच्या खुल्या जागा विकसित करून देण्याचे आश्वासन मनपाला दिले. या कामात जेएनईसी अभियांत्रिकी महाविद्यालयातील आर्किटेक्ट विभागाच्या विद्यार्थ्यांनीही योगदान देण्याचे नमूद केले. विद्यार्थ्यांनी पायलट प्रोजेक्ट म्हणून पैठणगेट येथील जागा विकसित करण्याचा निर्णय घेतला. या उपक्रमाला ‘अभ्यंग’ असे नाव देण्यात आले. अवघ्या काही दिवसांमध्ये विद्यार्थ्यांनी जागेचा कायापालट करून टाकला.शनिवारी सकाळी १० वाजता महापौर त्र्यंबक तुपे, आयुक्त ओम प्रकाश बकोरिया, उपायुक्त अय्युब खान, आर्किटेक्ट विभागाच्या विभागप्रमुख जयश्री गोगटे, प्रा. अमित देशपांडे आदींची उपस्थिती होती.