शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

रासायनिक खतांची दरवाढ नियंत्रित करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:02 IST

औरंगाबाद : दुष्काळ, गारपीट, अवकाळी पाऊस आणि कोरोनाचा प्रादुर्भाव अशा विविध संकटांचा सामना करत असलेल्या शेतकऱ्यांसमोर आता रासायनिक खताचे ...

औरंगाबाद : दुष्काळ, गारपीट, अवकाळी पाऊस आणि कोरोनाचा प्रादुर्भाव अशा विविध संकटांचा सामना करत असलेल्या शेतकऱ्यांसमोर आता रासायनिक खताचे भाव वाढल्याने आर्थिक संकट निर्माण झाले आहे. कृषिसेवा केंद्र व काही व्यापारी संगनमताने जुन्या खतांचा साठा करून वाढीव दराने विकून शेतकऱ्यांची आर्थिक लूट करत आहे. प्रशासनाने रासायनिक खताच्या भाववाढीवर नियंत्रण ठेवावे, तसेच कृत्रिम भाववाढ करणाऱ्यावर कार्यवाही करण्याची मागणी खा.इम्तियाज जलील यांनी पालकमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे केली आहे.

जिल्हास्तरीय हंगामपूर्व आढावा बैठकीत खा.इम्तियाज जलील यांनी शेतकऱ्यांना वीज कनेक्शन कोटेशन भरूनही मिळत नाही. महावितरणकडून ७० टक्के शेतकऱ्यांची होणारी अडवणूक थांबविण्याची, तसेच सीएसआर निधीतून बियाणे व खते मोफत द्यावे, कृषी उत्पन्न बाजार समित्या उघडणे, मालाला हमीभाव द्यावा, नगर नाशिक जिल्ह्यातील कारखान्यात अडकलेले देयके तत्काळ मिळावे, पीक विम्याची रक्कम, रोहित्र दुरुस्ती, विहीर व शेततळ्यांची रखडलेली मान्यता, नवीन कांदा मार्केट आणि शैक्षणिक शुल्क माफ करण्यासाठी त्वरित कार्यवाही करण्याची मागणी केली. पालकमंत्री देसाई यांच्यासह विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, जिल्हा कृषी अधिकारी तुकाराम मोटे यांचेही कृषिविषयक अडचणींकडे त्यांनी लक्ष वेधून कारवाईची करण्याची मागणी केली. कंपनीच्या अधिकाऱ्यांना खताच्या दरवाढीचा जाब विचारला असता, कच्च्या मालाचे भाव वाढल्याने ही दरवाढ झाल्याचे त्यांनी सांगितले. यावर केंद्राने लक्ष देण्याची मागणी केली. त्यावेळी आ.हरिभाऊ बागडे यांनी राज्य सरकारनेही भार उचलायला हवा अशी, भूमिका मांडल्याचे खा.इम्तियाज जलील यांनी सांगितले.