शहरं
Join us  
Trending Stories
1
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
2
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
3
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
4
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
5
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
6
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
7
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
8
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
9
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
10
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
11
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
12
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."
13
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
14
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
15
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
16
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
17
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
18
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
19
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
20
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?

रासायनिक खतांची दरवाढ नियंत्रित करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:02 IST

औरंगाबाद : दुष्काळ, गारपीट, अवकाळी पाऊस आणि कोरोनाचा प्रादुर्भाव अशा विविध संकटांचा सामना करत असलेल्या शेतकऱ्यांसमोर आता रासायनिक खताचे ...

औरंगाबाद : दुष्काळ, गारपीट, अवकाळी पाऊस आणि कोरोनाचा प्रादुर्भाव अशा विविध संकटांचा सामना करत असलेल्या शेतकऱ्यांसमोर आता रासायनिक खताचे भाव वाढल्याने आर्थिक संकट निर्माण झाले आहे. कृषिसेवा केंद्र व काही व्यापारी संगनमताने जुन्या खतांचा साठा करून वाढीव दराने विकून शेतकऱ्यांची आर्थिक लूट करत आहे. प्रशासनाने रासायनिक खताच्या भाववाढीवर नियंत्रण ठेवावे, तसेच कृत्रिम भाववाढ करणाऱ्यावर कार्यवाही करण्याची मागणी खा.इम्तियाज जलील यांनी पालकमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे केली आहे.

जिल्हास्तरीय हंगामपूर्व आढावा बैठकीत खा.इम्तियाज जलील यांनी शेतकऱ्यांना वीज कनेक्शन कोटेशन भरूनही मिळत नाही. महावितरणकडून ७० टक्के शेतकऱ्यांची होणारी अडवणूक थांबविण्याची, तसेच सीएसआर निधीतून बियाणे व खते मोफत द्यावे, कृषी उत्पन्न बाजार समित्या उघडणे, मालाला हमीभाव द्यावा, नगर नाशिक जिल्ह्यातील कारखान्यात अडकलेले देयके तत्काळ मिळावे, पीक विम्याची रक्कम, रोहित्र दुरुस्ती, विहीर व शेततळ्यांची रखडलेली मान्यता, नवीन कांदा मार्केट आणि शैक्षणिक शुल्क माफ करण्यासाठी त्वरित कार्यवाही करण्याची मागणी केली. पालकमंत्री देसाई यांच्यासह विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, जिल्हा कृषी अधिकारी तुकाराम मोटे यांचेही कृषिविषयक अडचणींकडे त्यांनी लक्ष वेधून कारवाईची करण्याची मागणी केली. कंपनीच्या अधिकाऱ्यांना खताच्या दरवाढीचा जाब विचारला असता, कच्च्या मालाचे भाव वाढल्याने ही दरवाढ झाल्याचे त्यांनी सांगितले. यावर केंद्राने लक्ष देण्याची मागणी केली. त्यावेळी आ.हरिभाऊ बागडे यांनी राज्य सरकारनेही भार उचलायला हवा अशी, भूमिका मांडल्याचे खा.इम्तियाज जलील यांनी सांगितले.