शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
3
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
4
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
5
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
8
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
9
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
10
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
11
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
12
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
13
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
14
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
15
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
16
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
17
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
18
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
19
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
20
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
Daily Top 2Weekly Top 5

अंशदान निवृत्तीवेतन योजना बंद होणार

By admin | Updated: August 30, 2014 00:03 IST

हिंगोली : नवीन परिभाषिक अंशदायी निवृत्तीवेतन योजना केंद्र शासनाच्या राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेत समाविष्ट होणार आहे.

हिंगोली : नवीन परिभाषिक अंशदायी निवृत्तीवेतन योजना केंद्र शासनाच्या राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेत समाविष्ट होणार आहे. यामुळे १ नोव्हेंबर २००५ पासून सेवेत लागलेल्या राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांना याचा लाभ होणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आरोग्य कर्मचारी संघटनेचे सचिव हरिचंद्र गोलाईतकर यांनी दिली आहे. राज्य शासनाच्या सेवेत १ नोव्हेंबर २००५ पासून किंवा त्यानंतर नियुक्त होणाऱ्या सर्व शासकीय कर्मचाऱ्यांसाठी राज्यात पुर्वीची १९८२ ची पेन्शन योजना रद्द करून केंद्र शासनाच्या धर्तीवर नवीन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना सुरू करण्यात आली. परंतु सदर योजनेचा लाभ कर्मचाऱ्यांना होत नसल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला होता. हा निर्णय सरकारने ताबडतोब रद्द करावा किंवा तो बदलावा, यासाठी राज्यातील सर्व अधिकारी-कर्मचारी संघटनांनी शासनाकडे मागणी केली होती. त्यासाठी काही संघटनांनी न्यायालयात याचिकासुद्धा दाखल केली होती. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानेदेखील यावर स्थगिती दिली होती. त्यामुळे राज्य शासनाच्या वित्त विभागाने २१ आॅगस्ट रोजी एक शासन निर्णय काढून नवीन परिभाषित अंशदायी निवृत्तीवेतन योजना केंद्राच्या राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेत समाविष्ट होणार आहे. १ नोव्हेंबर २००५ पासून राज्य शासनाने लागू केलेल्या परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेमध्ये शासकीय कर्मचाऱ्यांच्या दरमहा वेतनातून १० टक्के रक्कम कपात करून तेवढीच रक्कम राज्य शासन टाकणार होते. तो कर्मचारी निवृत्त झाल्यानंतर ही सर्व रक्कम एका विमा पॉलिसीमध्ये गुंतवायची असे आदेश आहेत. परंतु सेवाकाळात या रकमेचा लाभ कर्मचाऱ्यांना मिळत नव्हता व सदर रक्कम अत्यावश्यक कामासाठी काढता येत नव्हती. तसेच निवृत्तीनंतर विमा पॉलिसी काढल्याशिवाय कर्मचाऱ्यांना सदर रक्कमेचा लाभ मिळणार नाही, अशी अट असल्यामुळे केंद्रातील व राज्यातील सर्व कर्मचारी नाराज होते. सर्व संघटनांनी निवेदन देवून, संप करून राज्य शासनाकडे पाठपुरावा करत न्यायालयात दाद मागितल्याने ही योजना रद्द झाली आहे. सदर योजनेच्या अंमलबजावणीसाठी केंद्रीय अभिलेख देखभाल अभिकरण, निधी व्यवस्थापक इत्यादींच्या नियुक्तीबाबत अद्याप निर्णय झाला नसल्याने ही कार्यवाही होईपर्यंत सध्या सुरू असलेली अंशदायी पेन्शन योजनाच सुरू राहणार आहे. राज्य अभिलेख देखभाल अभिकरणाची स्थापना करून त्यांच्यामार्फत सदर योजना राज्यात कार्यान्वित होणार असल्याचे गोलाईतकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)