शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
2
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
3
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
4
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
5
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
6
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
7
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
8
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण
9
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
10
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
11
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
12
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
13
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
14
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
15
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
16
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
17
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
18
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
19
'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
20
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?

अंशदान निवृत्तीवेतन योजना बंद होणार

By admin | Updated: August 30, 2014 00:03 IST

हिंगोली : नवीन परिभाषिक अंशदायी निवृत्तीवेतन योजना केंद्र शासनाच्या राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेत समाविष्ट होणार आहे.

हिंगोली : नवीन परिभाषिक अंशदायी निवृत्तीवेतन योजना केंद्र शासनाच्या राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेत समाविष्ट होणार आहे. यामुळे १ नोव्हेंबर २००५ पासून सेवेत लागलेल्या राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांना याचा लाभ होणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आरोग्य कर्मचारी संघटनेचे सचिव हरिचंद्र गोलाईतकर यांनी दिली आहे. राज्य शासनाच्या सेवेत १ नोव्हेंबर २००५ पासून किंवा त्यानंतर नियुक्त होणाऱ्या सर्व शासकीय कर्मचाऱ्यांसाठी राज्यात पुर्वीची १९८२ ची पेन्शन योजना रद्द करून केंद्र शासनाच्या धर्तीवर नवीन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना सुरू करण्यात आली. परंतु सदर योजनेचा लाभ कर्मचाऱ्यांना होत नसल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला होता. हा निर्णय सरकारने ताबडतोब रद्द करावा किंवा तो बदलावा, यासाठी राज्यातील सर्व अधिकारी-कर्मचारी संघटनांनी शासनाकडे मागणी केली होती. त्यासाठी काही संघटनांनी न्यायालयात याचिकासुद्धा दाखल केली होती. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानेदेखील यावर स्थगिती दिली होती. त्यामुळे राज्य शासनाच्या वित्त विभागाने २१ आॅगस्ट रोजी एक शासन निर्णय काढून नवीन परिभाषित अंशदायी निवृत्तीवेतन योजना केंद्राच्या राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेत समाविष्ट होणार आहे. १ नोव्हेंबर २००५ पासून राज्य शासनाने लागू केलेल्या परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेमध्ये शासकीय कर्मचाऱ्यांच्या दरमहा वेतनातून १० टक्के रक्कम कपात करून तेवढीच रक्कम राज्य शासन टाकणार होते. तो कर्मचारी निवृत्त झाल्यानंतर ही सर्व रक्कम एका विमा पॉलिसीमध्ये गुंतवायची असे आदेश आहेत. परंतु सेवाकाळात या रकमेचा लाभ कर्मचाऱ्यांना मिळत नव्हता व सदर रक्कम अत्यावश्यक कामासाठी काढता येत नव्हती. तसेच निवृत्तीनंतर विमा पॉलिसी काढल्याशिवाय कर्मचाऱ्यांना सदर रक्कमेचा लाभ मिळणार नाही, अशी अट असल्यामुळे केंद्रातील व राज्यातील सर्व कर्मचारी नाराज होते. सर्व संघटनांनी निवेदन देवून, संप करून राज्य शासनाकडे पाठपुरावा करत न्यायालयात दाद मागितल्याने ही योजना रद्द झाली आहे. सदर योजनेच्या अंमलबजावणीसाठी केंद्रीय अभिलेख देखभाल अभिकरण, निधी व्यवस्थापक इत्यादींच्या नियुक्तीबाबत अद्याप निर्णय झाला नसल्याने ही कार्यवाही होईपर्यंत सध्या सुरू असलेली अंशदायी पेन्शन योजनाच सुरू राहणार आहे. राज्य अभिलेख देखभाल अभिकरणाची स्थापना करून त्यांच्यामार्फत सदर योजना राज्यात कार्यान्वित होणार असल्याचे गोलाईतकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)