शहरं
Join us  
Trending Stories
1
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
2
Spying for Pakistan: ज्योती मल्होत्रानंतर यु ट्यूबर प्रियांका सेनापती रडारवर! केंद्रीय गुप्तचर ब्युरोने केली चौकशी
3
Viral Video : कांदा कापताना डोळ्यांतून येणार नाही पाणी! सोशल मीडियावरचा व्हायरल देसी जुगाड बघाच
4
इंडोनेशिया, थायलंड, दुबई... पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांसोबत कोणकोणते देश फिरली Youtuber ज्योती?
5
रशियाचा युक्रेनवर सर्वात मोठा ड्रोन हल्ला! एकाच वेळी २७३ ड्रोन्स सोडले अन्...
6
RR vs PBKS : शशांक सिंहचा परफेक्ट फिनिशिंग टच! पंजाब किंग्जनं उभारली विक्रमी धावसंख्या
7
सोलापूर आग दुर्घटना; मृतांचा आकडा पोहचला आठवर; बेडरूममध्ये सापडले पाच जणांचे मृतदेह 
8
Nehal Wadhera नं फिफ्टीसह सावरला डाव; मग प्रीती झिंटानं संघाच्या हिरोला अशी दिली दाद
9
'हा' मराठमोळा स्टार टीव्ही इंडस्ट्रीत सर्वांत महागडा! दिलीप जोशी, रुपाली गांगुलीही मागे पडले!
10
जगात 'मेड इन इंडिया'चा बोलबाला; स्मार्टफोन निर्यातीत भारताची मोठी झेप, 24 अब्ज डॉलर्स...
11
"चिंदबरम यांनी जो कायदा आणला, त्याला मी विरोध केला, मात्र..."; शरद पवारांनी सांगितली आठवण
12
व्हाईट हाऊसचे सल्लागार बनले २ जिहादी; एक लश्कर ए तोयबा तर दुसरा अल कायदाशी लिंक
13
“ज्योतीला फसवले जातेय, सामान्य व्यक्तीप्रमाणे महिन्याला १५-२०-२५ हजार कमावते”; वडिलांचा दावा
14
ही गुंडगिरी संपुष्टात आणण्यासाठी मीच पुढाकार घेणार; मनोज जरांगेंनी घेतली शिवराज दिवटेची भेट
15
मुकेश अंबानींचा नवा डाव! आता ऑनलाइन मार्केटमध्ये घालणार धुमाकूळ, झेप्टो-ब्लिंकिटला थेट टक्कर
16
धक्कादायक खुलासा! ISI अधिकाऱ्यांच्या संपर्कात होती ज्योती, गुप्तचर नेटवर्क चालवतोय पाकिस्तान
17
पाकिस्तानच्या अडचणी वाढणार! कर्ज दिल्यानंतर IMFने दिला इशारा; ११ अटींचे पालनही बंधनकारक
18
भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी आता केवळ या दोन नावांची चर्चा, तर्कवितर्कांना उधाण, कधी होणार घोषणा  
19
केवळ ठाकरे गटाला नाही, मनसेलाही धक्का; दादरा नगर हवेलीसह ७ ठिकाणचे पदाधिकारी शिंदेसेनेत
20
“‘नरकातला स्वर्ग’चे श्रेय स्वप्ना पाटकरांना, संजय राऊत देशसेवेसाठी तुरुंगात गेले नव्हते”

कंत्राटदारांना दंड माफी नाही

By admin | Updated: May 18, 2015 00:19 IST

तुळजापूर : तुळजापूर विकास प्राधिकरणांतर्गत ज्या कंत्राटदारांनी कामे वेळेवर पूर्ण केली नाहीत, त्यांना दंड करण्यात आला आहे. हा दंड कसल्याही परिस्थितीत माफ केला जाणार नाही,

तुळजापूर : तुळजापूर विकास प्राधिकरणांतर्गत ज्या कंत्राटदारांनी कामे वेळेवर पूर्ण केली नाहीत, त्यांना दंड करण्यात आला आहे. हा दंड कसल्याही परिस्थितीत माफ केला जाणार नाही, अशी भूमिका जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानचे अध्यक्ष डॉ. प्रशांत नारनवरे यांनी घेतली आहे.तुळजापूर विकास प्राधिकरणाची बैठक १७ मे रोजी सर्किट हाऊस येथे पार पडली. यावेळी आ. मधुकरराव चव्हाण, नगराध्यक्ष जयश्री कंदले, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब पाटील, नरेंद्र बोरगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती. प्राधिकरणाच्या माध्यमातून २००८ मध्ये कामांना मान्यता मिळाली. ती कामे २०१० मध्ये सुरु करण्यात आली. ती आजही सुरुच आहेत. या कामांना गती देण्याची गरज यावेळी व्यक्त करण्यात आली. प्राधिकरणाच्या माध्यमातून शहरातील ४२ रस्त्यावर ड्रेनेज, भुयारी गटारी तयार करण्यात आलेल्या आहेत. त्या पावसाळ्यापूर्वी चेकअप करुन घ्याव्यात. तसेच घरातील सांडपाणी, बाथरुमची कनेक्शन चेंबर्सना जोडून घ्यावे, अशी सूचनाही डॉ. नारनवरे यांनी केली. या कनेक्शनसाठी येणारा खर्च त्या-त्या ग्राहकांकडून घेतला जाणार आहे. अंडरग्राऊंड ड्रेनेजचे चेंबर उंचीवर असल्याने पावसाळ्यामध्ये हे पाणी रस्त्यावर येवू नये, यासाठी उपाययोजना करण्याबाबतही त्यांनी सूचना केली. ड्रेनेज चोकअप झाल्यास ते दुरुस्त करण्यासाठी १० लाखाची अद्ययावत यंत्रणा उपलब्ध केली जाणार असल्याचेही त्यांनी या बैठकीत सांगितले.शहरामध्ये ३२ लाख रुपये खर्च करुन सिग्नल बसविण्यात आले आहेत. त्याची चाचणी घेवून ही सुविधा कार्यान्वित करावी, अशी सूचना उपस्थित अधिकाऱ्यांना करण्यात आली. पथदिवे बसविणारडॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते कमानवेस मारुती मंदिर रस्ता, एस.टी. स्टँड ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक आदी ठिकाणच्या रस्त्यावर पथदिवे बसविण्याबाबतही सदरील बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली. (वार्ताहर)तुळजापूर शहरासाठी पाचुुंदा तलावातून पाईपलाईन करण्यात आली आहे. यावर साडेपाच कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. मात्र वीज कनेक्शन अभावी ही योजना सध्या बंद आहे. पालिका प्रशासनाने शहराची गरज लक्षात घेवून वीज कनेक्शन घेवून पाणीपुरवठा चालू करावा, अशी सूचना आ. मधुकरराव चव्हाण यांनी केली. बोरी धरणावरुन तुळजापूर शहरासाठी राबविण्यात आलेल्या योजनेचे पाईप खराब झाले आहेत. त्यामुळे जवळपास ३० टक्के पाणी वाया जात आहे. त्याची दुरुस्तीही तातडीने करण्यात यावी, असे सांगण्यात आले.पश्चिमेला बसविणार गेट४साडेपंधरा कोटी रुपये खर्च करुन पापनास तलावाचे सुशोभिकरण करण्यात आले. परंतु तात्काळ सेवेसाठी अ‍ॅम्ब्युलन्स अथवा अन्य वाहनांना आत जाण्यासाठी रस्ता नाही. त्यामुळे पश्चिम दिशेला एक गेट बसविण्यात येणार असल्याचे यावेळी सांगितले.