शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

कंत्राटदारांना दंड माफी नाही

By admin | Updated: May 18, 2015 00:19 IST

तुळजापूर : तुळजापूर विकास प्राधिकरणांतर्गत ज्या कंत्राटदारांनी कामे वेळेवर पूर्ण केली नाहीत, त्यांना दंड करण्यात आला आहे. हा दंड कसल्याही परिस्थितीत माफ केला जाणार नाही,

तुळजापूर : तुळजापूर विकास प्राधिकरणांतर्गत ज्या कंत्राटदारांनी कामे वेळेवर पूर्ण केली नाहीत, त्यांना दंड करण्यात आला आहे. हा दंड कसल्याही परिस्थितीत माफ केला जाणार नाही, अशी भूमिका जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानचे अध्यक्ष डॉ. प्रशांत नारनवरे यांनी घेतली आहे.तुळजापूर विकास प्राधिकरणाची बैठक १७ मे रोजी सर्किट हाऊस येथे पार पडली. यावेळी आ. मधुकरराव चव्हाण, नगराध्यक्ष जयश्री कंदले, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब पाटील, नरेंद्र बोरगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती. प्राधिकरणाच्या माध्यमातून २००८ मध्ये कामांना मान्यता मिळाली. ती कामे २०१० मध्ये सुरु करण्यात आली. ती आजही सुरुच आहेत. या कामांना गती देण्याची गरज यावेळी व्यक्त करण्यात आली. प्राधिकरणाच्या माध्यमातून शहरातील ४२ रस्त्यावर ड्रेनेज, भुयारी गटारी तयार करण्यात आलेल्या आहेत. त्या पावसाळ्यापूर्वी चेकअप करुन घ्याव्यात. तसेच घरातील सांडपाणी, बाथरुमची कनेक्शन चेंबर्सना जोडून घ्यावे, अशी सूचनाही डॉ. नारनवरे यांनी केली. या कनेक्शनसाठी येणारा खर्च त्या-त्या ग्राहकांकडून घेतला जाणार आहे. अंडरग्राऊंड ड्रेनेजचे चेंबर उंचीवर असल्याने पावसाळ्यामध्ये हे पाणी रस्त्यावर येवू नये, यासाठी उपाययोजना करण्याबाबतही त्यांनी सूचना केली. ड्रेनेज चोकअप झाल्यास ते दुरुस्त करण्यासाठी १० लाखाची अद्ययावत यंत्रणा उपलब्ध केली जाणार असल्याचेही त्यांनी या बैठकीत सांगितले.शहरामध्ये ३२ लाख रुपये खर्च करुन सिग्नल बसविण्यात आले आहेत. त्याची चाचणी घेवून ही सुविधा कार्यान्वित करावी, अशी सूचना उपस्थित अधिकाऱ्यांना करण्यात आली. पथदिवे बसविणारडॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते कमानवेस मारुती मंदिर रस्ता, एस.टी. स्टँड ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक आदी ठिकाणच्या रस्त्यावर पथदिवे बसविण्याबाबतही सदरील बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली. (वार्ताहर)तुळजापूर शहरासाठी पाचुुंदा तलावातून पाईपलाईन करण्यात आली आहे. यावर साडेपाच कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. मात्र वीज कनेक्शन अभावी ही योजना सध्या बंद आहे. पालिका प्रशासनाने शहराची गरज लक्षात घेवून वीज कनेक्शन घेवून पाणीपुरवठा चालू करावा, अशी सूचना आ. मधुकरराव चव्हाण यांनी केली. बोरी धरणावरुन तुळजापूर शहरासाठी राबविण्यात आलेल्या योजनेचे पाईप खराब झाले आहेत. त्यामुळे जवळपास ३० टक्के पाणी वाया जात आहे. त्याची दुरुस्तीही तातडीने करण्यात यावी, असे सांगण्यात आले.पश्चिमेला बसविणार गेट४साडेपंधरा कोटी रुपये खर्च करुन पापनास तलावाचे सुशोभिकरण करण्यात आले. परंतु तात्काळ सेवेसाठी अ‍ॅम्ब्युलन्स अथवा अन्य वाहनांना आत जाण्यासाठी रस्ता नाही. त्यामुळे पश्चिम दिशेला एक गेट बसविण्यात येणार असल्याचे यावेळी सांगितले.