शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

काम न मिळाल्यामुळे कंत्राटदारांचा तीळपापड

By admin | Updated: October 3, 2016 00:43 IST

औरंगाबाद : सार्वजनिक बांधकाम विभागाने सुभेदारी विश्रामगृहाच्या दुरुस्तीचे काम लेबर रेटवर करून घेण्यास सुरुवात केल्यामुळे अनेक सुशिक्षित बेरोजगार अभियंते आणि कंत्राटदार संघटनांच्या तोंडचे पाणी पळाले

औरंगाबाद : मंत्रिमंडळ बैठकीनिमित्त सार्वजनिक बांधकाम विभागाने सुभेदारी विश्रामगृहाच्या दुरुस्तीचे काम लेबर रेटवर करून घेण्यास सुरुवात केल्यामुळे अनेक सुशिक्षित बेरोजगार अभियंते आणि कंत्राटदार संघटनांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. कंत्राटदार हे स्थानिक राजकीय नेत्यांकडे आपले गाऱ्हाणे मांडत असून, याप्रकरणी कंत्राटदार बांधकाममंत्र्यांना भेटणार आहेत. शुक्रवारी खा.चंद्रकांत खैरे यांच्याकडे कंत्राटदार संघटनेने याप्रकरणी तक्रार केली. कामे देताना मनमानी होत असल्याची भावना कंत्राटदार संघटनेने व्यक्त केली असून, मंत्रिमंडळ बैठकीदरम्यान बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे या विभागात सुरू असलेल्या अनागोंदीची तक्रार कंत्राटदार संघटना करणार आहे. दरम्यान, खा.खैरे यांनी शुक्रवारी मुख्य अभियंत्यांना बोलावून त्यांची कानउघाडणी केली. या बैठकीत काही अभियंत्यांच्या बदल्यांची मागणी करण्यात येणार आहे. विभागातील कर्मचाऱ्यांबाबतदेखील दुजाभाव केला जात असल्याचा आरोप कंत्राटदार करीत आहेत. याप्रकरणी संघटनेची बैठक झाली आहे. विभागाने कंत्राट न काढता सुभेदारीच्या रंगरंगोटीचे काम २६ सप्टेंबरपासून युद्धपातळीवर सुरू केले आहे. बांधकाम विभागाची नियमावली बाजूला ठेवून हे काम करण्यात येत आहे. यामध्ये एकाही स्थानिक कंत्राटदाराला काम मिळाले नाही. शिवाय इमारत व उद्यान विभागाच्या अभियंत्यांनादेखील यापासून दूर ठेवण्यात आले. ऐन दिवाळीच्या तोंडावर कामे मिळाली नाहीत. त्यामुळे अनेकांच्या ‘टक्केवारी’चे नुकसान झाले आहे. तर दुसरीकडे आजवर बांधकाम विभागाकडे कोट्यवधींची बिले थकीत असताना जे काम रोख होणार होते. तेच काम विभागाने न दिल्यामुळे कंत्राटदारांचा तीळपापड झाला आहे. बांधकाम विभागाची कामे घेण्यात ज्यांची मक्तेदारी आहे, अशा कंत्राटदारांना याचा सर्वाधिक फटका बसला आहे.