शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
2
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
3
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
4
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
5
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
6
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
7
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
8
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
9
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
10
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
11
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
12
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
13
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
14
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
15
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
16
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
17
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
18
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
19
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
20
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही

जयभवानीनगरात दीडशे घरांचा संपर्क तुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 01:09 IST

जयभवानीनगर येथील तब्बल १५० घरांचा शनिवारी रात्रीपासून संपर्क तुटला आहे. घरात असलेल्या व्यक्तींना बाहेर पडणे कठीण झाले, तर बाहेरील व्यक्ती घरात जाऊ शकत नाही, अशी भयानक अवस्था निर्माण झाली आहे. महापालिकेने खोदून ठेवलेल्या नाल्यांमुळे हा पेचप्रसंग निर्माण झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : जयभवानीनगर येथील तब्बल १५० घरांचा शनिवारी रात्रीपासून संपर्क तुटला आहे. घरात असलेल्या व्यक्तींना बाहेर पडणे कठीण झाले, तर बाहेरील व्यक्ती घरात जाऊ शकत नाही, अशी भयानक अवस्था निर्माण झाली आहे. महापालिकेने खोदून ठेवलेल्या नाल्यांमुळे हा पेचप्रसंग निर्माण झाला आहे. नागरिकांना अक्षरश: मरणयातना सहन कराव्या लागत आहेत. एवढे होऊनही शनिवारी फक्त सहा कर्मचारी नाल्यात काम करताना दिसून आले.११ एप्रिल २०१७ रोजी झालेल्या अतिवृष्टीनंतर जयभवानीनगर परिसर पाण्यात बुडाला होता. या घटनेनंतर वसाहतीमधील नाल्यात असलेले अतिक्रमण काढण्याचा निर्णय घेतला. महापालिकेने चिरीमिरी न देणाऱ्यांच्या इमारतींवर हतोडा चालविला. अतिक्रमणे पाडल्यानंतर काही महिने मलबा तसाच पडून होता. दीड महिन्यापूर्वी महापालिकेने नाला १५ फूट रुंद आणि आठ ते दहा फूट खोल केला. या नाल्यात भूमिगत गटार योजनेचे पाईप, मेनहोल तयार करण्यात आले आहेत.पहिलाच पाऊसशनिवारी सायंकाळी झालेला वादळी वारा आणि त्यानंतर झालेल्या मुसळधार पावसानंतर जयभवानीनगर पुन्हा एकदा मागील वर्षीप्रमाणेच जलमय झाला. अनेक नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरले. घरगुती सामानासह धान्यही खराब झाले. ठिकठिकाणी असलेले ड्रेनेजचे चेम्बर ओव्हरफ्लो होऊन वाहू लागले. प्रत्येक रस्त्यावर किमान गुडघ्यापर्यंत येईल एवढे पाणी साचले. महापालिकेने ज्या दीडशे घरांसमोर नाला रुंद आणि खोल करून ठेवला त्या नागरिकांचे सर्वात जास्त हाल सुरू झाले. त्यांना घरातून बाहेर येता येईना.त्रस्त नागरिकांचा जनआक्रोशजयभवानीनगर येथे नाल्याच्या दोन्ही बाजूला राहणा-या १५० पेक्षा अधिक घरांमधील एक हजारांपेक्षा अधिक नागरिक मागील २४ तासांपासून ताटकळत बसले आहेत. मनपाच्या या भोंगळ कारभारामुळे नागरिकांमध्ये प्रचंड चीड, संताप आणि आक्रोश पाहायला मिळत आहे. योग्य नियोजनच नव्हते तर नाला कशासाठी रुंद केला, असा संतप्त सवालही नागरिकांकडून करण्यात येत आहे. नागरिकांनी महापौरांसमोरच आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.जयभवानीनगरातील शंभू सहानी यांच्या घरात पॅरालिसिस झालेली व्यक्ती आहे. त्यांना उपचारासाठी घरातून बाहेर आणणे अवघड आहे. सुभाष टाळकर, रेवजीनाथ पवार, भगवान साळुंके यांच्या घरात ये-जा करण्यासाठी रस्ताच नाही. लता पवार या महिलेच्या घरातील धान्य पाण्यात भिजून मोठे नुकसान झाले. शारदा पातळक यांनी पंधरा दिवसांपासून पाण्याचे टँकर आले नसल्याचे नमूद केले.

टॅग्स :floodपूरAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका