शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

जयभवानीनगरात दीडशे घरांचा संपर्क तुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 01:09 IST

जयभवानीनगर येथील तब्बल १५० घरांचा शनिवारी रात्रीपासून संपर्क तुटला आहे. घरात असलेल्या व्यक्तींना बाहेर पडणे कठीण झाले, तर बाहेरील व्यक्ती घरात जाऊ शकत नाही, अशी भयानक अवस्था निर्माण झाली आहे. महापालिकेने खोदून ठेवलेल्या नाल्यांमुळे हा पेचप्रसंग निर्माण झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : जयभवानीनगर येथील तब्बल १५० घरांचा शनिवारी रात्रीपासून संपर्क तुटला आहे. घरात असलेल्या व्यक्तींना बाहेर पडणे कठीण झाले, तर बाहेरील व्यक्ती घरात जाऊ शकत नाही, अशी भयानक अवस्था निर्माण झाली आहे. महापालिकेने खोदून ठेवलेल्या नाल्यांमुळे हा पेचप्रसंग निर्माण झाला आहे. नागरिकांना अक्षरश: मरणयातना सहन कराव्या लागत आहेत. एवढे होऊनही शनिवारी फक्त सहा कर्मचारी नाल्यात काम करताना दिसून आले.११ एप्रिल २०१७ रोजी झालेल्या अतिवृष्टीनंतर जयभवानीनगर परिसर पाण्यात बुडाला होता. या घटनेनंतर वसाहतीमधील नाल्यात असलेले अतिक्रमण काढण्याचा निर्णय घेतला. महापालिकेने चिरीमिरी न देणाऱ्यांच्या इमारतींवर हतोडा चालविला. अतिक्रमणे पाडल्यानंतर काही महिने मलबा तसाच पडून होता. दीड महिन्यापूर्वी महापालिकेने नाला १५ फूट रुंद आणि आठ ते दहा फूट खोल केला. या नाल्यात भूमिगत गटार योजनेचे पाईप, मेनहोल तयार करण्यात आले आहेत.पहिलाच पाऊसशनिवारी सायंकाळी झालेला वादळी वारा आणि त्यानंतर झालेल्या मुसळधार पावसानंतर जयभवानीनगर पुन्हा एकदा मागील वर्षीप्रमाणेच जलमय झाला. अनेक नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरले. घरगुती सामानासह धान्यही खराब झाले. ठिकठिकाणी असलेले ड्रेनेजचे चेम्बर ओव्हरफ्लो होऊन वाहू लागले. प्रत्येक रस्त्यावर किमान गुडघ्यापर्यंत येईल एवढे पाणी साचले. महापालिकेने ज्या दीडशे घरांसमोर नाला रुंद आणि खोल करून ठेवला त्या नागरिकांचे सर्वात जास्त हाल सुरू झाले. त्यांना घरातून बाहेर येता येईना.त्रस्त नागरिकांचा जनआक्रोशजयभवानीनगर येथे नाल्याच्या दोन्ही बाजूला राहणा-या १५० पेक्षा अधिक घरांमधील एक हजारांपेक्षा अधिक नागरिक मागील २४ तासांपासून ताटकळत बसले आहेत. मनपाच्या या भोंगळ कारभारामुळे नागरिकांमध्ये प्रचंड चीड, संताप आणि आक्रोश पाहायला मिळत आहे. योग्य नियोजनच नव्हते तर नाला कशासाठी रुंद केला, असा संतप्त सवालही नागरिकांकडून करण्यात येत आहे. नागरिकांनी महापौरांसमोरच आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.जयभवानीनगरातील शंभू सहानी यांच्या घरात पॅरालिसिस झालेली व्यक्ती आहे. त्यांना उपचारासाठी घरातून बाहेर आणणे अवघड आहे. सुभाष टाळकर, रेवजीनाथ पवार, भगवान साळुंके यांच्या घरात ये-जा करण्यासाठी रस्ताच नाही. लता पवार या महिलेच्या घरातील धान्य पाण्यात भिजून मोठे नुकसान झाले. शारदा पातळक यांनी पंधरा दिवसांपासून पाण्याचे टँकर आले नसल्याचे नमूद केले.

टॅग्स :floodपूरAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका