शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

औरंगाबादेत घर खरेदीसाठी परजिल्ह्यातील ग्राहकही अग्रेसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:02 IST

विकासकामांना गती : पुणे, मुंबईऐवजी शहरात घर खरेदीकडे कल औरंगाबाद : नवीन जलवाहिनीद्वारे पूर्णक्षमतेने जायकवाडीचे पाणी शहरात येणार. मुंबई- ...

विकासकामांना गती : पुणे, मुंबईऐवजी शहरात घर खरेदीकडे कल

औरंगाबाद : नवीन जलवाहिनीद्वारे पूर्णक्षमतेने जायकवाडीचे पाणी शहरात येणार. मुंबई- इंडस्ट्रिअल कॉरिडॉर (डीएमआयसी)अंतर्गत असलेल्या ऑरिक सिटीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी कंपन्यांचे होत असलेले करार, समृद्धी महामार्ग, सोलापूर- धुळे राष्ट्रीय महामार्ग, देशातील विविध मोठ्या शहरात सुरू होत असलेली विमानसेवा, उच्चदर्जाच्या वैद्यकीय सेवा, शिक्षण यामुळे पर्यटनाच्या या राजधानीत स्वतःचे घर असावे, अशी परजिल्ह्यातील लोकांची मानसिकता तयार झाली आहे. याची प्रचिती मागील चार महिन्यांत दिसून आली.

जालना ते लातूरपर्यंतच्या शहरात हक्काचे घर ग्राहक खरेदी करीत आहेत. नामांकित बांधकाम व्यावसायिकानी सांगितले की, लॉकडाऊननंतर मराठवाड्यातील लोकांचा पुणे, मुंबई, नाशिककडे घर खरेदीचा ओढा कमी झाला आहे. मागील चार महिन्यांपासून औरंगाबादमध्ये स्वतःचे फ्लॅट, रोहाऊस, बंगला खरेदीसाठी परजिल्ह्यांतील लोक येत आहेत. यात जालना, बीड, परभणी, उस्मानाबाद, नांदेड, लातूर येथील ग्राहकांचा जास्त समावेश आहे. मराठवाड्याच्या राजधानीमध्ये घर खरेदीचा वाढता कल असण्याची कारणेही तशीच आहेत.

मूलभूत सोयीसुविधा हे यातील महत्त्वाचे कारण ठरत आहेत. औरंगाबादकरांनी १० वर्षांत पाणीटंचाईचा खूप त्रास सहन केला. कारण जायकवाडी ते औरंगाबाद जलवाहिनी जुनी झाली. यामुळे गळती वाढली. वस्ती वाढल्याने सहा दिवसांनी नळाला पाणी येते. पण, आता हा प्रश्न मार्गी लागला आहे. मागील महिन्यात मुख्यमंत्र्यांनी नवीन १६८० कोटी रुपयांच्या जलवाहिनी योजनेचे भूमिपूजन केले. किमान २० टक्के काम पूर्ण होईल. जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत मोठी जलवाहिनी टाकून शहरात मुबलक पाणी आणण्याचे काम सर्वप्रथम होणार आहे. या कामासाठी तीन वर्षांची कालमर्यादा ठरविण्यात आली आहे. यामुळे येत्या काळात शहरात पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा होणार आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत हे काम करण्यात येत असल्याने लोकांचा विश्वास वाढला आहे. सातारा- देवळाइलाही या योजनेचा फायदा होणार आहे.

खड्डेमुक्त रस्त्याकडे वाटचाल

आज शहरतील निम्मे रस्ते खड्डयात आहे, तर निम्मे रस्ते सिमेंट काँक्रीटचे व डांबरी करण्यात आले आहे.

यासाठी १५० कोटी रुपये प्राप्त झाले असून, या वर्षात २३ रस्ते पूर्ण केले जातील. यामुळे शहराची वाटचाल खड्डेमुक्त रस्त्याकडे सुरू आहे. विशेष म्हणजे शहराची भौगोलिक रचना अशी आहे की, २० ते ३० मिनिटांच्या आत आपण शहरातील कोणत्याही कोपऱ्यात पोहोचू शकतो. पुणे, मुंबई सारखी वाहतूक जामची येथे परिस्थिती नाही.

महामार्गाचे जाळे

नागपूर ते मुंबई हा समृद्धी महामार्ग औरंगाबादमधून जात आहे. या महामार्गाचे काम वेगाने होत आहे. येत्या काळात हा महामार्ग तयार होऊन जलदगतीने औरंगाबादकरांना मुंबई, नागपूरला जाता येईल. औरंगाबाद, वैजापूर टप्प्याची कामे ६० टक्के पूर्ण झाली आहे. हे काम डिसेंबर २०२१ पर्यंत पूर्ण करण्याची मुदत देण्यात आली आहे. तसेच सध्या पळशी व सावंगी येथे डोंगर पोखरून बोगदा तयार केला जात आहे. तसेच शहराच्या दक्षिण बाजूने सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गाचे कामही त्याच गतीने पुढे सुरू आहे. जळगाव सिमेंट काँक्रीट रस्त्याचे कामही सुरू आहे. या महामार्गाचा जसा नागरिकांना फायदा होईल, तसेच येथील व्यापार- उद्योगालाही मोठा फायदा होणार आहे. त्यांना मिळालेल्या ऑर्डर वेळेत पूर्ण करून जलदगतीने देशभरात पोहोचविता येणार आहे. तसेच चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळा येथून मुंबई, दिल्ली सह देशांतील मोठ्या महत्त्वाच्या शहरात जाण्यासाठी विमानसेवा सुरू होत आहे. यामुळे येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढणार आहे. औद्योगिक पर्यटनालाही मोठे प्रोत्साहन मिळणार आहे.

चौकट

डीएमआयसी विकासाचे नवपर्व

दिल्ली- मुंबई- इंडस्ट्रिअल कॉरिडॉर (डीएमआयसी)अंतर्गत असलेल्या ऑरिक सिटीमध्ये २०२१ या नवीन वर्षात मोठी गुंतवणूक होण्याची अपेक्षा आहे. मॅग्नेटिक महाराष्ट्राच्या निमित्ताने १२८ कंपन्यांनी सामंजस्य करार केला आहे. त्यांना वाळूज, पैठण एमआयडीसीत उद्योगांना जागा दिली आहे. ऑरिक सिटीतील ३० कंपन्या येण्याबाबत चर्चा झाली असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

शेंद्रा-डीएमआयसी आणि बिडकीन इंडस्ट्रिअल पार्कसाठी सुमारे दोन हजार कोटी रुपयांची शासकीय गुंतवणूक झालेली आहे.

फूडपार्कसाठी जागा देण्यात आली आहे. येत्या काळात येथेही कंपन्या गुंतवणूक करतील. यामुळे कृषी क्षेत्राला चालना मिळणार आहे. भविष्यात बहुराष्ट्रीय कंपन्या येथे येणार असल्याने रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होणार आहे. यामुळे शहरात घर खरेदीसाठी मराठवाड्यातील लोकांचा कल वाढत आहे. त्यादृष्टीने बांधकाम व्यावसायिक नवनवीन गृहप्रकल्पाची आखणी करीत आहेत.

--

चौकट -

शहरातील जमेच्या बाजू

१) मूलभूत सोईसुविधा उपलब्ध.

२) दळणवळणासाठी विविध पर्याय.

३) उच्च शिक्षणाची व्यवस्था.

४) अद्ययावत वैद्यकीय सुविधा.

५) शेद्रा-बिडकीन, वाळूज, चिकलठाणा, रेल्वेस्टेशन, औद्योगिक वसाहतीमुळे नोकरीच्या मोठ्या संधी.

६) अत्याधुनिक गृहप्रकल्पाची उभारणी.

७) शांत शहर असल्याने उद्योग- व्यवसाय वाढीला पोषक वातावरण.

८) पर्यटनाची राजधानी असल्याने पर्यटनसाठी पोषक वातावरण.

९) खवय्यांसाठी देश व विदेशांतील सर्व पदार्थांची खाद्यसंस्कृती.

१०) मनोरंजनासाठी सिनेमागृह, थिएटर व खरेदीसाठी विस्तारणीय बाजारपेठ व मॉलची उपलब्धता.