शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादेत घर खरेदीसाठी परजिल्ह्यातील ग्राहकही अग्रेसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:02 IST

विकासकामांना गती : पुणे, मुंबईऐवजी शहरात घर खरेदीकडे कल औरंगाबाद : नवीन जलवाहिनीद्वारे पूर्णक्षमतेने जायकवाडीचे पाणी शहरात येणार. मुंबई- ...

विकासकामांना गती : पुणे, मुंबईऐवजी शहरात घर खरेदीकडे कल

औरंगाबाद : नवीन जलवाहिनीद्वारे पूर्णक्षमतेने जायकवाडीचे पाणी शहरात येणार. मुंबई- इंडस्ट्रिअल कॉरिडॉर (डीएमआयसी)अंतर्गत असलेल्या ऑरिक सिटीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी कंपन्यांचे होत असलेले करार, समृद्धी महामार्ग, सोलापूर- धुळे राष्ट्रीय महामार्ग, देशातील विविध मोठ्या शहरात सुरू होत असलेली विमानसेवा, उच्चदर्जाच्या वैद्यकीय सेवा, शिक्षण यामुळे पर्यटनाच्या या राजधानीत स्वतःचे घर असावे, अशी परजिल्ह्यातील लोकांची मानसिकता तयार झाली आहे. याची प्रचिती मागील चार महिन्यांत दिसून आली.

जालना ते लातूरपर्यंतच्या शहरात हक्काचे घर ग्राहक खरेदी करीत आहेत. नामांकित बांधकाम व्यावसायिकानी सांगितले की, लॉकडाऊननंतर मराठवाड्यातील लोकांचा पुणे, मुंबई, नाशिककडे घर खरेदीचा ओढा कमी झाला आहे. मागील चार महिन्यांपासून औरंगाबादमध्ये स्वतःचे फ्लॅट, रोहाऊस, बंगला खरेदीसाठी परजिल्ह्यांतील लोक येत आहेत. यात जालना, बीड, परभणी, उस्मानाबाद, नांदेड, लातूर येथील ग्राहकांचा जास्त समावेश आहे. मराठवाड्याच्या राजधानीमध्ये घर खरेदीचा वाढता कल असण्याची कारणेही तशीच आहेत.

मूलभूत सोयीसुविधा हे यातील महत्त्वाचे कारण ठरत आहेत. औरंगाबादकरांनी १० वर्षांत पाणीटंचाईचा खूप त्रास सहन केला. कारण जायकवाडी ते औरंगाबाद जलवाहिनी जुनी झाली. यामुळे गळती वाढली. वस्ती वाढल्याने सहा दिवसांनी नळाला पाणी येते. पण, आता हा प्रश्न मार्गी लागला आहे. मागील महिन्यात मुख्यमंत्र्यांनी नवीन १६८० कोटी रुपयांच्या जलवाहिनी योजनेचे भूमिपूजन केले. किमान २० टक्के काम पूर्ण होईल. जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत मोठी जलवाहिनी टाकून शहरात मुबलक पाणी आणण्याचे काम सर्वप्रथम होणार आहे. या कामासाठी तीन वर्षांची कालमर्यादा ठरविण्यात आली आहे. यामुळे येत्या काळात शहरात पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा होणार आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत हे काम करण्यात येत असल्याने लोकांचा विश्वास वाढला आहे. सातारा- देवळाइलाही या योजनेचा फायदा होणार आहे.

खड्डेमुक्त रस्त्याकडे वाटचाल

आज शहरतील निम्मे रस्ते खड्डयात आहे, तर निम्मे रस्ते सिमेंट काँक्रीटचे व डांबरी करण्यात आले आहे.

यासाठी १५० कोटी रुपये प्राप्त झाले असून, या वर्षात २३ रस्ते पूर्ण केले जातील. यामुळे शहराची वाटचाल खड्डेमुक्त रस्त्याकडे सुरू आहे. विशेष म्हणजे शहराची भौगोलिक रचना अशी आहे की, २० ते ३० मिनिटांच्या आत आपण शहरातील कोणत्याही कोपऱ्यात पोहोचू शकतो. पुणे, मुंबई सारखी वाहतूक जामची येथे परिस्थिती नाही.

महामार्गाचे जाळे

नागपूर ते मुंबई हा समृद्धी महामार्ग औरंगाबादमधून जात आहे. या महामार्गाचे काम वेगाने होत आहे. येत्या काळात हा महामार्ग तयार होऊन जलदगतीने औरंगाबादकरांना मुंबई, नागपूरला जाता येईल. औरंगाबाद, वैजापूर टप्प्याची कामे ६० टक्के पूर्ण झाली आहे. हे काम डिसेंबर २०२१ पर्यंत पूर्ण करण्याची मुदत देण्यात आली आहे. तसेच सध्या पळशी व सावंगी येथे डोंगर पोखरून बोगदा तयार केला जात आहे. तसेच शहराच्या दक्षिण बाजूने सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गाचे कामही त्याच गतीने पुढे सुरू आहे. जळगाव सिमेंट काँक्रीट रस्त्याचे कामही सुरू आहे. या महामार्गाचा जसा नागरिकांना फायदा होईल, तसेच येथील व्यापार- उद्योगालाही मोठा फायदा होणार आहे. त्यांना मिळालेल्या ऑर्डर वेळेत पूर्ण करून जलदगतीने देशभरात पोहोचविता येणार आहे. तसेच चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळा येथून मुंबई, दिल्ली सह देशांतील मोठ्या महत्त्वाच्या शहरात जाण्यासाठी विमानसेवा सुरू होत आहे. यामुळे येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढणार आहे. औद्योगिक पर्यटनालाही मोठे प्रोत्साहन मिळणार आहे.

चौकट

डीएमआयसी विकासाचे नवपर्व

दिल्ली- मुंबई- इंडस्ट्रिअल कॉरिडॉर (डीएमआयसी)अंतर्गत असलेल्या ऑरिक सिटीमध्ये २०२१ या नवीन वर्षात मोठी गुंतवणूक होण्याची अपेक्षा आहे. मॅग्नेटिक महाराष्ट्राच्या निमित्ताने १२८ कंपन्यांनी सामंजस्य करार केला आहे. त्यांना वाळूज, पैठण एमआयडीसीत उद्योगांना जागा दिली आहे. ऑरिक सिटीतील ३० कंपन्या येण्याबाबत चर्चा झाली असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

शेंद्रा-डीएमआयसी आणि बिडकीन इंडस्ट्रिअल पार्कसाठी सुमारे दोन हजार कोटी रुपयांची शासकीय गुंतवणूक झालेली आहे.

फूडपार्कसाठी जागा देण्यात आली आहे. येत्या काळात येथेही कंपन्या गुंतवणूक करतील. यामुळे कृषी क्षेत्राला चालना मिळणार आहे. भविष्यात बहुराष्ट्रीय कंपन्या येथे येणार असल्याने रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होणार आहे. यामुळे शहरात घर खरेदीसाठी मराठवाड्यातील लोकांचा कल वाढत आहे. त्यादृष्टीने बांधकाम व्यावसायिक नवनवीन गृहप्रकल्पाची आखणी करीत आहेत.

--

चौकट -

शहरातील जमेच्या बाजू

१) मूलभूत सोईसुविधा उपलब्ध.

२) दळणवळणासाठी विविध पर्याय.

३) उच्च शिक्षणाची व्यवस्था.

४) अद्ययावत वैद्यकीय सुविधा.

५) शेद्रा-बिडकीन, वाळूज, चिकलठाणा, रेल्वेस्टेशन, औद्योगिक वसाहतीमुळे नोकरीच्या मोठ्या संधी.

६) अत्याधुनिक गृहप्रकल्पाची उभारणी.

७) शांत शहर असल्याने उद्योग- व्यवसाय वाढीला पोषक वातावरण.

८) पर्यटनाची राजधानी असल्याने पर्यटनसाठी पोषक वातावरण.

९) खवय्यांसाठी देश व विदेशांतील सर्व पदार्थांची खाद्यसंस्कृती.

१०) मनोरंजनासाठी सिनेमागृह, थिएटर व खरेदीसाठी विस्तारणीय बाजारपेठ व मॉलची उपलब्धता.