शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
4
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
5
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
6
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
7
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
8
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
9
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
10
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
11
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
12
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
13
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
14
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
15
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
16
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
17
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
18
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
19
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
20
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 

औरंगाबादेत घर खरेदीसाठी परजिल्ह्यातील ग्राहकही अग्रेसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:02 IST

विकासकामांना गती : पुणे, मुंबईऐवजी शहरात घर खरेदीकडे कल औरंगाबाद : नवीन जलवाहिनीद्वारे पूर्णक्षमतेने जायकवाडीचे पाणी शहरात येणार. मुंबई- ...

विकासकामांना गती : पुणे, मुंबईऐवजी शहरात घर खरेदीकडे कल

औरंगाबाद : नवीन जलवाहिनीद्वारे पूर्णक्षमतेने जायकवाडीचे पाणी शहरात येणार. मुंबई- इंडस्ट्रिअल कॉरिडॉर (डीएमआयसी)अंतर्गत असलेल्या ऑरिक सिटीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी कंपन्यांचे होत असलेले करार, समृद्धी महामार्ग, सोलापूर- धुळे राष्ट्रीय महामार्ग, देशातील विविध मोठ्या शहरात सुरू होत असलेली विमानसेवा, उच्चदर्जाच्या वैद्यकीय सेवा, शिक्षण यामुळे पर्यटनाच्या या राजधानीत स्वतःचे घर असावे, अशी परजिल्ह्यातील लोकांची मानसिकता तयार झाली आहे. याची प्रचिती मागील चार महिन्यांत दिसून आली.

जालना ते लातूरपर्यंतच्या शहरात हक्काचे घर ग्राहक खरेदी करीत आहेत. नामांकित बांधकाम व्यावसायिकानी सांगितले की, लॉकडाऊननंतर मराठवाड्यातील लोकांचा पुणे, मुंबई, नाशिककडे घर खरेदीचा ओढा कमी झाला आहे. मागील चार महिन्यांपासून औरंगाबादमध्ये स्वतःचे फ्लॅट, रोहाऊस, बंगला खरेदीसाठी परजिल्ह्यांतील लोक येत आहेत. यात जालना, बीड, परभणी, उस्मानाबाद, नांदेड, लातूर येथील ग्राहकांचा जास्त समावेश आहे. मराठवाड्याच्या राजधानीमध्ये घर खरेदीचा वाढता कल असण्याची कारणेही तशीच आहेत.

मूलभूत सोयीसुविधा हे यातील महत्त्वाचे कारण ठरत आहेत. औरंगाबादकरांनी १० वर्षांत पाणीटंचाईचा खूप त्रास सहन केला. कारण जायकवाडी ते औरंगाबाद जलवाहिनी जुनी झाली. यामुळे गळती वाढली. वस्ती वाढल्याने सहा दिवसांनी नळाला पाणी येते. पण, आता हा प्रश्न मार्गी लागला आहे. मागील महिन्यात मुख्यमंत्र्यांनी नवीन १६८० कोटी रुपयांच्या जलवाहिनी योजनेचे भूमिपूजन केले. किमान २० टक्के काम पूर्ण होईल. जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत मोठी जलवाहिनी टाकून शहरात मुबलक पाणी आणण्याचे काम सर्वप्रथम होणार आहे. या कामासाठी तीन वर्षांची कालमर्यादा ठरविण्यात आली आहे. यामुळे येत्या काळात शहरात पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा होणार आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत हे काम करण्यात येत असल्याने लोकांचा विश्वास वाढला आहे. सातारा- देवळाइलाही या योजनेचा फायदा होणार आहे.

खड्डेमुक्त रस्त्याकडे वाटचाल

आज शहरतील निम्मे रस्ते खड्डयात आहे, तर निम्मे रस्ते सिमेंट काँक्रीटचे व डांबरी करण्यात आले आहे.

यासाठी १५० कोटी रुपये प्राप्त झाले असून, या वर्षात २३ रस्ते पूर्ण केले जातील. यामुळे शहराची वाटचाल खड्डेमुक्त रस्त्याकडे सुरू आहे. विशेष म्हणजे शहराची भौगोलिक रचना अशी आहे की, २० ते ३० मिनिटांच्या आत आपण शहरातील कोणत्याही कोपऱ्यात पोहोचू शकतो. पुणे, मुंबई सारखी वाहतूक जामची येथे परिस्थिती नाही.

महामार्गाचे जाळे

नागपूर ते मुंबई हा समृद्धी महामार्ग औरंगाबादमधून जात आहे. या महामार्गाचे काम वेगाने होत आहे. येत्या काळात हा महामार्ग तयार होऊन जलदगतीने औरंगाबादकरांना मुंबई, नागपूरला जाता येईल. औरंगाबाद, वैजापूर टप्प्याची कामे ६० टक्के पूर्ण झाली आहे. हे काम डिसेंबर २०२१ पर्यंत पूर्ण करण्याची मुदत देण्यात आली आहे. तसेच सध्या पळशी व सावंगी येथे डोंगर पोखरून बोगदा तयार केला जात आहे. तसेच शहराच्या दक्षिण बाजूने सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गाचे कामही त्याच गतीने पुढे सुरू आहे. जळगाव सिमेंट काँक्रीट रस्त्याचे कामही सुरू आहे. या महामार्गाचा जसा नागरिकांना फायदा होईल, तसेच येथील व्यापार- उद्योगालाही मोठा फायदा होणार आहे. त्यांना मिळालेल्या ऑर्डर वेळेत पूर्ण करून जलदगतीने देशभरात पोहोचविता येणार आहे. तसेच चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळा येथून मुंबई, दिल्ली सह देशांतील मोठ्या महत्त्वाच्या शहरात जाण्यासाठी विमानसेवा सुरू होत आहे. यामुळे येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढणार आहे. औद्योगिक पर्यटनालाही मोठे प्रोत्साहन मिळणार आहे.

चौकट

डीएमआयसी विकासाचे नवपर्व

दिल्ली- मुंबई- इंडस्ट्रिअल कॉरिडॉर (डीएमआयसी)अंतर्गत असलेल्या ऑरिक सिटीमध्ये २०२१ या नवीन वर्षात मोठी गुंतवणूक होण्याची अपेक्षा आहे. मॅग्नेटिक महाराष्ट्राच्या निमित्ताने १२८ कंपन्यांनी सामंजस्य करार केला आहे. त्यांना वाळूज, पैठण एमआयडीसीत उद्योगांना जागा दिली आहे. ऑरिक सिटीतील ३० कंपन्या येण्याबाबत चर्चा झाली असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

शेंद्रा-डीएमआयसी आणि बिडकीन इंडस्ट्रिअल पार्कसाठी सुमारे दोन हजार कोटी रुपयांची शासकीय गुंतवणूक झालेली आहे.

फूडपार्कसाठी जागा देण्यात आली आहे. येत्या काळात येथेही कंपन्या गुंतवणूक करतील. यामुळे कृषी क्षेत्राला चालना मिळणार आहे. भविष्यात बहुराष्ट्रीय कंपन्या येथे येणार असल्याने रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होणार आहे. यामुळे शहरात घर खरेदीसाठी मराठवाड्यातील लोकांचा कल वाढत आहे. त्यादृष्टीने बांधकाम व्यावसायिक नवनवीन गृहप्रकल्पाची आखणी करीत आहेत.

--

चौकट -

शहरातील जमेच्या बाजू

१) मूलभूत सोईसुविधा उपलब्ध.

२) दळणवळणासाठी विविध पर्याय.

३) उच्च शिक्षणाची व्यवस्था.

४) अद्ययावत वैद्यकीय सुविधा.

५) शेद्रा-बिडकीन, वाळूज, चिकलठाणा, रेल्वेस्टेशन, औद्योगिक वसाहतीमुळे नोकरीच्या मोठ्या संधी.

६) अत्याधुनिक गृहप्रकल्पाची उभारणी.

७) शांत शहर असल्याने उद्योग- व्यवसाय वाढीला पोषक वातावरण.

८) पर्यटनाची राजधानी असल्याने पर्यटनसाठी पोषक वातावरण.

९) खवय्यांसाठी देश व विदेशांतील सर्व पदार्थांची खाद्यसंस्कृती.

१०) मनोरंजनासाठी सिनेमागृह, थिएटर व खरेदीसाठी विस्तारणीय बाजारपेठ व मॉलची उपलब्धता.