शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
2
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
3
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
4
एअर इंडिया विमान अपघात: प्रेमानंद महाराजांची मोठी शिकवण; तुम्हालाही ‘ती’ गोष्ट माहिती हवीच!
5
वर्ल्ड कप आधी स्मृती मानधनाची मुसंडी! ५ वर्षांनी पुन्हा झाली वनडेची 'क्वीन'
6
Sonam Raghuvanshi : "लग्नानंतर राजा त्याच्या मित्रांसह..."; सोनम रघुवंशीने रिसेप्शनला नवऱ्याला दिलेलं 'हे' वचन
7
स्वामी विवेकानंदांना महाकालीकडे मागायचे होते एक, पण मागितले भलतेच आणि ते मिळालेसुद्धा!
8
'आमच्या देशाकडे पाहिलं तरी डोळे काढून...’, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची इस्राइलला धमकी
9
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
10
मारुतीची पहिली e Vitara लाँच झाली! व्हेरिअंटनुसार ३५ लाख ते ४२ लाख किंमत, फिचर्स, रेंज आणि कोण घेणार पहा...
11
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्तानची लुडबुड; शाहबाज शरीफ यांना कशाची वाटतेय भीती?
12
विरार- अलिबाग कॉरिडोरच्या भूसंपादनाला मिळणार गती!
13
उलटेच झाले! सामुहिक बलात्काराची केस दाखल केली, तिलाच सात वर्षांची शिक्षा झाली
14
PF साठी एजंट्सची मदत घेताय? सावधान! EPFO ने दिली धोक्याची घंटा, पैसे आणि डेटा दोन्ही जाईल!
15
स्वामी विवेकानंदांनी सांगितलेली 'ही' तीन ध्येय साध्य केली तर आपला पराभव होऊच शकणार नाही!
16
'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे'चा सीक्वेल येणार? काजोल म्हणाली, "सिनेमाचा जो शेवट झाला..."
17
डोनाल्ड ट्रम्प यांनी आणला स्वत:च्याच ब्रँडचा स्मार्टफोन; अमेरिकेत भूकंप, कमी किंमतीत एवढे फिचर्स देणार की...
18
Crude Oil Reserves India : भारताला अंदमानात २ लाख कोटी लिटर कच्च्या तेलाचं भांडार मिळालं, GDP २० ट्रिलियन डॉलर्सवर जाणार?
19
इस्रायल-इराण यांचे एकमेकांवर बॉम्ब; सरकारी न्यूज चॅनेलच्या इमारतीवर हल्ले

आदेश डावलून बांधकाम !

By admin | Updated: April 1, 2016 01:05 IST

लातूर : भीषण पाणीटंचाईमुळे जिल्हाधिकाऱ्यांनी बांधकामे बंद ठेवण्याचे आदेश जिल्ह्यातील नागरिकांना दिले होते. तरीही शहरातील इतर बांधकामे बंद आहेत

लातूर : भीषण पाणीटंचाईमुळे जिल्हाधिकाऱ्यांनी बांधकामे बंद ठेवण्याचे आदेश जिल्ह्यातील नागरिकांना दिले होते. तरीही शहरातील इतर बांधकामे बंद आहेत. मात्र पाणीपुरवठ्याशी संबंधित असणाऱ्या जलसिंचन विभागाने मात्र ऐन टंचाईच्या परिस्थितीत वाहनतळाचे बांधकाम बिनबोभाट सुरू केले आहे. लातूर जिल्ह्यातील पाणीटंचाईचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. परिसरातील बहुतांश जलस्त्रोत कोरडेठाक पडले आहेत. परिणामी, डोंगरगाव, भंडारवाडी या प्रकल्पांतील पाणी टँकरने आणून तहान भागविण्याची वेळ लातूरकरांवर आली आहे. हे वास्तव असतानाही शहरातील राजीव गांधी चौक परिसरातील जलसिंचन विभागाला मात्र अजूनही टंचाईची झळ लागली नसल्याचे तेथील सुरू असलेल्या बांधकामावरूनदिसून येत आहे. जिल्ह्यात पाण्यासाठी नागरिकांची भटकंती सुरू आहे. काही नागरिक टँकरद्वारे पाणी विकत घेऊन पाण्याचा प्रश्न मार्गी लावत आहेत. तर पाण्यासाठी ३५-४० रुपये प्रमाणे जार विकत घ्यावा लागत आहे. अशी परिस्थिती असतानाही जलसंपदा विभागाने टंचाईच्या परिस्थितीत वाहनतळाचे काम सुरू करून टंचाईग्रस्त लातूरकरांची चेष्टा केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे टंचाई परिस्थितीत जलसंपदा विभागाच्या वाहनतळावर मात्र पाण्याचे फवारे सुरू असल्याने लातूर शहरातील नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, बांधकाम प्रकरणातील जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांवर टंचाईत बांधकाम सुरू केल्याच्या कारणावरून गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी छत्रपती मुस्लिम ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सज्जाद पठाण यांनी केली आहे. (प्रतिनिधी)