शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आदेश डावलून बांधकाम !

By admin | Updated: April 1, 2016 01:05 IST

लातूर : भीषण पाणीटंचाईमुळे जिल्हाधिकाऱ्यांनी बांधकामे बंद ठेवण्याचे आदेश जिल्ह्यातील नागरिकांना दिले होते. तरीही शहरातील इतर बांधकामे बंद आहेत

लातूर : भीषण पाणीटंचाईमुळे जिल्हाधिकाऱ्यांनी बांधकामे बंद ठेवण्याचे आदेश जिल्ह्यातील नागरिकांना दिले होते. तरीही शहरातील इतर बांधकामे बंद आहेत. मात्र पाणीपुरवठ्याशी संबंधित असणाऱ्या जलसिंचन विभागाने मात्र ऐन टंचाईच्या परिस्थितीत वाहनतळाचे बांधकाम बिनबोभाट सुरू केले आहे. लातूर जिल्ह्यातील पाणीटंचाईचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. परिसरातील बहुतांश जलस्त्रोत कोरडेठाक पडले आहेत. परिणामी, डोंगरगाव, भंडारवाडी या प्रकल्पांतील पाणी टँकरने आणून तहान भागविण्याची वेळ लातूरकरांवर आली आहे. हे वास्तव असतानाही शहरातील राजीव गांधी चौक परिसरातील जलसिंचन विभागाला मात्र अजूनही टंचाईची झळ लागली नसल्याचे तेथील सुरू असलेल्या बांधकामावरूनदिसून येत आहे. जिल्ह्यात पाण्यासाठी नागरिकांची भटकंती सुरू आहे. काही नागरिक टँकरद्वारे पाणी विकत घेऊन पाण्याचा प्रश्न मार्गी लावत आहेत. तर पाण्यासाठी ३५-४० रुपये प्रमाणे जार विकत घ्यावा लागत आहे. अशी परिस्थिती असतानाही जलसंपदा विभागाने टंचाईच्या परिस्थितीत वाहनतळाचे काम सुरू करून टंचाईग्रस्त लातूरकरांची चेष्टा केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे टंचाई परिस्थितीत जलसंपदा विभागाच्या वाहनतळावर मात्र पाण्याचे फवारे सुरू असल्याने लातूर शहरातील नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, बांधकाम प्रकरणातील जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांवर टंचाईत बांधकाम सुरू केल्याच्या कारणावरून गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी छत्रपती मुस्लिम ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सज्जाद पठाण यांनी केली आहे. (प्रतिनिधी)