शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

आदेश डावलून बांधकाम !

By admin | Updated: April 1, 2016 01:05 IST

लातूर : भीषण पाणीटंचाईमुळे जिल्हाधिकाऱ्यांनी बांधकामे बंद ठेवण्याचे आदेश जिल्ह्यातील नागरिकांना दिले होते. तरीही शहरातील इतर बांधकामे बंद आहेत

लातूर : भीषण पाणीटंचाईमुळे जिल्हाधिकाऱ्यांनी बांधकामे बंद ठेवण्याचे आदेश जिल्ह्यातील नागरिकांना दिले होते. तरीही शहरातील इतर बांधकामे बंद आहेत. मात्र पाणीपुरवठ्याशी संबंधित असणाऱ्या जलसिंचन विभागाने मात्र ऐन टंचाईच्या परिस्थितीत वाहनतळाचे बांधकाम बिनबोभाट सुरू केले आहे. लातूर जिल्ह्यातील पाणीटंचाईचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. परिसरातील बहुतांश जलस्त्रोत कोरडेठाक पडले आहेत. परिणामी, डोंगरगाव, भंडारवाडी या प्रकल्पांतील पाणी टँकरने आणून तहान भागविण्याची वेळ लातूरकरांवर आली आहे. हे वास्तव असतानाही शहरातील राजीव गांधी चौक परिसरातील जलसिंचन विभागाला मात्र अजूनही टंचाईची झळ लागली नसल्याचे तेथील सुरू असलेल्या बांधकामावरूनदिसून येत आहे. जिल्ह्यात पाण्यासाठी नागरिकांची भटकंती सुरू आहे. काही नागरिक टँकरद्वारे पाणी विकत घेऊन पाण्याचा प्रश्न मार्गी लावत आहेत. तर पाण्यासाठी ३५-४० रुपये प्रमाणे जार विकत घ्यावा लागत आहे. अशी परिस्थिती असतानाही जलसंपदा विभागाने टंचाईच्या परिस्थितीत वाहनतळाचे काम सुरू करून टंचाईग्रस्त लातूरकरांची चेष्टा केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे टंचाई परिस्थितीत जलसंपदा विभागाच्या वाहनतळावर मात्र पाण्याचे फवारे सुरू असल्याने लातूर शहरातील नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, बांधकाम प्रकरणातील जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांवर टंचाईत बांधकाम सुरू केल्याच्या कारणावरून गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी छत्रपती मुस्लिम ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सज्जाद पठाण यांनी केली आहे. (प्रतिनिधी)