शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
4
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
5
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
6
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
7
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
8
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
9
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
10
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
11
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
12
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
13
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
14
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
15
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
16
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
17
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
18
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
19
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
20
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं

जालन्यातील खुल्या जागांवर संरक्षक भिंती बांधणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 00:15 IST

नागरी भागात स्थानिक रहिवाशांकरिता सार्वजनिक, तसेच दैनंदिन उपयोगाकरिता मोकळ्या जागा आहेत. या जागांवरील अतिक्रमण टाळण्यासाठी संरक्षक भिंती बांधण्याच्या विषयाला नगरपालिकेच्या नियोजन व विकास समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.

ठळक मुद्देनगरपालिका : नियोजन व विकास समितीच्या बैठकीत मंजुरी; संभाव्य अतिक्रमण टाळण्यासाठी निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : नागरी भागात स्थानिक रहिवाशांकरिता सार्वजनिक, तसेच दैनंदिन उपयोगाकरिता मोकळ्या जागा आहेत. या जागांवरील अतिक्रमण टाळण्यासाठी संरक्षक भिंती बांधण्याच्या विषयाला नगरपालिकेच्या नियोजन व विकास समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.उपनगराध्यक्षा तथा नियोजन समितीचे पदसिद्ध सभापती राजेश राऊत यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन समितीची बैठक शुक्रवारी घेण्यात आली. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी केशव कानपुडे, समितीच्या सदस्य अजय भरतिया, आशा ठाकूर, विनोद रत्नपारखे, घनश्याम परदेशी, रेणुका निकम, सोनाली चौधरी, गणेश राऊत, रमेश गौरक्षक, नजीब लोहार यांची बैठकीस उपस्थिती होती.सार्वजनिक वापराच्या मोकळ्या जागांवर स्थानिक नागरिक घरगुती कार्यक्रम, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम घेत असतात. मात्र, अशा ठिकाणी अतिक्रमण होण्याचे प्रकार वाढत आहेत.हे टाळण्यासाठी उपाययोजना म्हणून भिंती बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. शहरातील रहदारीचा प्रश्न दिवसेंदिवस जटिल होत आहे. त्यामुळे मुख्य रस्त्यावर अनधिकृतपणे अवजड वाहने उभी करणाºयांवर पोलीस व प्रादेशिक परिवहन अधिकाºयांकडून कारवाई करणे, शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता, नागरिकांच्या सोयी-सुविधांसाठी प्रस्तावित आरक्षणे, खेळाची मैदाने, आरोग्य केंद्र, प्राथमिक शाळा, उद्यान, वाचनालये आदींचा विकास करण्यासाठी निधी मिळविण्याकरिता जिल्हा प्रशासनाला प्रस्ताव पाठविणे या विषयाला सभेत मंजुरी देण्यात आली. शहरातील खुल्या जागांवर शक्य तिथे नाना-नाणी पार्क विकसित करणे, लहान मुलांना सापांबाबत माहिती मिळावी, जनजागृती व्हावी, तसेच उद्यानात येणाºयांचे मनोरंजन या उद्देशाने छत्रपती संभाजीराजे उद्यानात सर्पोद्यान विकसित करणे आवश्यक वाटते का, याबाबत उद्यान विभागाने प्रस्ताव तयार करून जिल्हाधिकाºयांकडे पाठवणे या विषयांना नियोजन समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.स्मशानभूमी न.प.च्या नावे करण्याला मंजुरीशहरातील स्मशानभूमीच्या जागांची मालकी नगरपालिकेच्या नावावर नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या ठिकाणी विविध प्रकारची आवश्यक कामे करणे पालिकेला शक्य होत नाही. स्मशानभूमीच्या जागा नगरपालिकेच्या नावाने करून या ठिकाणी सुशोभीकरण करण्याच्या निर्णयाला नियोजन समितीने मंजुरी दिली.शहराच्या विकास आराखड्यात स्मशानभूमीकरिता आरक्षित जागेची मालकी शासकीय किंवा खाजगी नावे असल्याने या जागा संपादित करण्याकरिता जिल्हाधिकाºयांकडे प्रस्ताव पाठविण्याचा निर्णय घेण्याच्या विषयालाही समितीने मंजुरी दिली.