शहरं
Join us  
Trending Stories
1
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
2
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
3
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
4
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
5
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
6
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
7
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
8
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
9
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
10
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
11
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
12
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
13
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
14
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
15
टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार
16
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
17
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
18
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
19
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
20
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

महाविकास आघाडीचा काँग्रेस पाठिंबा काढणार; रामदास आठवलेंचे भाकीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 13:39 IST

Congress to withdraw support Mahavikas Aghadi यूपीआयच्या अध्यक्षपदावरून वाद उफाळेल

ठळक मुद्देदेवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार

औरंगाबाद : यूपीएचे अध्यक्षपद शरद पवार यांना द्यावे, अशी मागणी खा. संजय राऊत करीत आहेत. त्यांच्या या मागणीमुळे काँग्रेसमध्ये अस्वस्थता आहे. शरद पवार यांना यूपीएचे अध्यक्षपद द्यायला काँग्रेस तयार आहे, असे वाटत नाही. या मुद्यावर काँग्रेस महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या सरकारचा पाठिंबा काढून घेण्याची शक्यता असल्याचे मत रिपाइं (ए) चे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मंगळवारी पत्रपरिषदेत व्यक्त केले. हे सरकार कोसळल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील, असे भाकीत त्यांनी केले.मी पुन्हा येईन, असे फडणवीस कुणाच्या जोरावर म्हणतात तर अजित पवारांच्या जोरावर. ते दोघे एक दिवसासाठी एकत्रित आले होते. आता यूपीआयच्या अध्यक्षपदावरून वाद उफाळेल आणि हे दोघे एकत्रित येऊन पुन्हा सरकार स्थापन करू शकतात, असे आठवले म्हणाले.

गेल्या वर्षभरापासून शिवसेना एनडीएतून बाहेर पडलेली आहे. ती यूपीएमध्येपण नाही. तरी शिवसेनेचे संजय राऊत हे शरद पवार यांना यूपीएचे नेतृत्व दिले जावे, अशी मागणी करीत आहेत. शरद पवार यांच्याबद्दल आजही आमच्या मनात आदर आहे; पण इतिहास पाहिल्यास काँग्रेसने सतत अन्याय केला आहे. त्यांना कधी काँग्रेसचे अध्यक्ष होऊ दिले नाही. मनमोहनसिंग यांच्याऐवजी शरद पवार यांना पंतप्रधान करायला पाहिजे होते; पण तसे घडले नाही. आता काँग्रेस त्यांना यूपीएचे अध्यक्षपद देईल, असे वाटत नाही. या मुद्यावरून काँग्रेस सरकारचा पाठिंबा काढून घेण्याची शक्यता आठवले यांनी व्यक्त केली.

दिल्लीतील शेतकरी आंदोलनाबाबत बोलताना आठवले म्हणाले की, आजपर्यंत कायदेच रद्द करा असे कुणी सांगितले नाही. हे संविधान विरोधी होय. कायद्यात दुरुस्तीची मागणी होऊ शकते. शेतकऱ्यांच्या आंदोलनाबद्दल आम्हाला सहानुभूती आहे. आम्हीही नामांतरासारखा लढा लढलेलो आहोत; परंतु समन्वय साधून या प्रश्नावर तोडगा काढला. काही शेतकरी नेते आंदोलन भडकवीत आहेत. येत्या एक-दोन दिवसांत शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले.

रिपब्लिकन ऐक्याची शक्यता नाही, असे सांगत, गेल्या १९९८ पासून माझ्याशी प्रकाश आंबेडकर बोलत नाहीत, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. पत्रकार परिषदेला बाबूराव कदम, दौलत खरात, मिलिंद शेळके, कांतीकुमार जैन, पप्पू कागदे, किशोर थोरात, नागराज गायकवाड, अरविंद अवसरमोल, संजय ठोकळ, प्रशांत शेगावकर, संजय बनसोडे आदींची उपस्थिती होती.

आता नो कोरोनाचा नारा..कोरोना सुरू झाला तेव्हा मी ‘गो कोरोना...कोरोना गो’ असा नारा दिला होता. आता माझा नारा ‘नो कोरोना...कोरोना’ असा आहे, असे एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

 

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेcongressकाँग्रेसAurangabadऔरंगाबाद