शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

महाविकास आघाडीचा काँग्रेस पाठिंबा काढणार; रामदास आठवलेंचे भाकीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 13:39 IST

Congress to withdraw support Mahavikas Aghadi यूपीआयच्या अध्यक्षपदावरून वाद उफाळेल

ठळक मुद्देदेवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार

औरंगाबाद : यूपीएचे अध्यक्षपद शरद पवार यांना द्यावे, अशी मागणी खा. संजय राऊत करीत आहेत. त्यांच्या या मागणीमुळे काँग्रेसमध्ये अस्वस्थता आहे. शरद पवार यांना यूपीएचे अध्यक्षपद द्यायला काँग्रेस तयार आहे, असे वाटत नाही. या मुद्यावर काँग्रेस महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या सरकारचा पाठिंबा काढून घेण्याची शक्यता असल्याचे मत रिपाइं (ए) चे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मंगळवारी पत्रपरिषदेत व्यक्त केले. हे सरकार कोसळल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील, असे भाकीत त्यांनी केले.मी पुन्हा येईन, असे फडणवीस कुणाच्या जोरावर म्हणतात तर अजित पवारांच्या जोरावर. ते दोघे एक दिवसासाठी एकत्रित आले होते. आता यूपीआयच्या अध्यक्षपदावरून वाद उफाळेल आणि हे दोघे एकत्रित येऊन पुन्हा सरकार स्थापन करू शकतात, असे आठवले म्हणाले.

गेल्या वर्षभरापासून शिवसेना एनडीएतून बाहेर पडलेली आहे. ती यूपीएमध्येपण नाही. तरी शिवसेनेचे संजय राऊत हे शरद पवार यांना यूपीएचे नेतृत्व दिले जावे, अशी मागणी करीत आहेत. शरद पवार यांच्याबद्दल आजही आमच्या मनात आदर आहे; पण इतिहास पाहिल्यास काँग्रेसने सतत अन्याय केला आहे. त्यांना कधी काँग्रेसचे अध्यक्ष होऊ दिले नाही. मनमोहनसिंग यांच्याऐवजी शरद पवार यांना पंतप्रधान करायला पाहिजे होते; पण तसे घडले नाही. आता काँग्रेस त्यांना यूपीएचे अध्यक्षपद देईल, असे वाटत नाही. या मुद्यावरून काँग्रेस सरकारचा पाठिंबा काढून घेण्याची शक्यता आठवले यांनी व्यक्त केली.

दिल्लीतील शेतकरी आंदोलनाबाबत बोलताना आठवले म्हणाले की, आजपर्यंत कायदेच रद्द करा असे कुणी सांगितले नाही. हे संविधान विरोधी होय. कायद्यात दुरुस्तीची मागणी होऊ शकते. शेतकऱ्यांच्या आंदोलनाबद्दल आम्हाला सहानुभूती आहे. आम्हीही नामांतरासारखा लढा लढलेलो आहोत; परंतु समन्वय साधून या प्रश्नावर तोडगा काढला. काही शेतकरी नेते आंदोलन भडकवीत आहेत. येत्या एक-दोन दिवसांत शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले.

रिपब्लिकन ऐक्याची शक्यता नाही, असे सांगत, गेल्या १९९८ पासून माझ्याशी प्रकाश आंबेडकर बोलत नाहीत, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. पत्रकार परिषदेला बाबूराव कदम, दौलत खरात, मिलिंद शेळके, कांतीकुमार जैन, पप्पू कागदे, किशोर थोरात, नागराज गायकवाड, अरविंद अवसरमोल, संजय ठोकळ, प्रशांत शेगावकर, संजय बनसोडे आदींची उपस्थिती होती.

आता नो कोरोनाचा नारा..कोरोना सुरू झाला तेव्हा मी ‘गो कोरोना...कोरोना गो’ असा नारा दिला होता. आता माझा नारा ‘नो कोरोना...कोरोना’ असा आहे, असे एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

 

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेcongressकाँग्रेसAurangabadऔरंगाबाद