शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

महाविकास आघाडीचा काँग्रेस पाठिंबा काढणार; रामदास आठवलेंचे भाकीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 13:39 IST

Congress to withdraw support Mahavikas Aghadi यूपीआयच्या अध्यक्षपदावरून वाद उफाळेल

ठळक मुद्देदेवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार

औरंगाबाद : यूपीएचे अध्यक्षपद शरद पवार यांना द्यावे, अशी मागणी खा. संजय राऊत करीत आहेत. त्यांच्या या मागणीमुळे काँग्रेसमध्ये अस्वस्थता आहे. शरद पवार यांना यूपीएचे अध्यक्षपद द्यायला काँग्रेस तयार आहे, असे वाटत नाही. या मुद्यावर काँग्रेस महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या सरकारचा पाठिंबा काढून घेण्याची शक्यता असल्याचे मत रिपाइं (ए) चे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मंगळवारी पत्रपरिषदेत व्यक्त केले. हे सरकार कोसळल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील, असे भाकीत त्यांनी केले.मी पुन्हा येईन, असे फडणवीस कुणाच्या जोरावर म्हणतात तर अजित पवारांच्या जोरावर. ते दोघे एक दिवसासाठी एकत्रित आले होते. आता यूपीआयच्या अध्यक्षपदावरून वाद उफाळेल आणि हे दोघे एकत्रित येऊन पुन्हा सरकार स्थापन करू शकतात, असे आठवले म्हणाले.

गेल्या वर्षभरापासून शिवसेना एनडीएतून बाहेर पडलेली आहे. ती यूपीएमध्येपण नाही. तरी शिवसेनेचे संजय राऊत हे शरद पवार यांना यूपीएचे नेतृत्व दिले जावे, अशी मागणी करीत आहेत. शरद पवार यांच्याबद्दल आजही आमच्या मनात आदर आहे; पण इतिहास पाहिल्यास काँग्रेसने सतत अन्याय केला आहे. त्यांना कधी काँग्रेसचे अध्यक्ष होऊ दिले नाही. मनमोहनसिंग यांच्याऐवजी शरद पवार यांना पंतप्रधान करायला पाहिजे होते; पण तसे घडले नाही. आता काँग्रेस त्यांना यूपीएचे अध्यक्षपद देईल, असे वाटत नाही. या मुद्यावरून काँग्रेस सरकारचा पाठिंबा काढून घेण्याची शक्यता आठवले यांनी व्यक्त केली.

दिल्लीतील शेतकरी आंदोलनाबाबत बोलताना आठवले म्हणाले की, आजपर्यंत कायदेच रद्द करा असे कुणी सांगितले नाही. हे संविधान विरोधी होय. कायद्यात दुरुस्तीची मागणी होऊ शकते. शेतकऱ्यांच्या आंदोलनाबद्दल आम्हाला सहानुभूती आहे. आम्हीही नामांतरासारखा लढा लढलेलो आहोत; परंतु समन्वय साधून या प्रश्नावर तोडगा काढला. काही शेतकरी नेते आंदोलन भडकवीत आहेत. येत्या एक-दोन दिवसांत शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले.

रिपब्लिकन ऐक्याची शक्यता नाही, असे सांगत, गेल्या १९९८ पासून माझ्याशी प्रकाश आंबेडकर बोलत नाहीत, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. पत्रकार परिषदेला बाबूराव कदम, दौलत खरात, मिलिंद शेळके, कांतीकुमार जैन, पप्पू कागदे, किशोर थोरात, नागराज गायकवाड, अरविंद अवसरमोल, संजय ठोकळ, प्रशांत शेगावकर, संजय बनसोडे आदींची उपस्थिती होती.

आता नो कोरोनाचा नारा..कोरोना सुरू झाला तेव्हा मी ‘गो कोरोना...कोरोना गो’ असा नारा दिला होता. आता माझा नारा ‘नो कोरोना...कोरोना’ असा आहे, असे एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

 

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेcongressकाँग्रेसAurangabadऔरंगाबाद