शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs DC : दिल्लीच्या फलंदाजांनी नांगी टाकली; पण पावसाच्या बॅटिंगमुळे हैदराबाद फक्त बॉलिंग करून 'आउट'
2
"९० हजार सैनिकांचे पायजमे आजही तिथे टांगलेले आहेत’’, मुनीर आणि पाकिस्तानचं बलूच नेत्याकडून वस्रहरण   
3
IPL 2025 Playoffs Race : आता ४ जागेसाठी ७ दावेदार! कोणत्या संघासाठी कसे आहे प्लेऑफ्सचे समीकरण?
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
5
दोन्ही दिल्लीकर एकाच क्रीजमध्ये; रन आउटसाठी स्टँडमध्ये काव्या मारनची 'दातओठ खात' तळमळ (VIDEO)
6
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
7
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
8
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
9
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
10
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
11
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
12
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
13
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
14
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
15
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
16
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
17
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
18
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
19
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
20
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला

काँग्रेसमध्ये प्रती संघटना नकोत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2016 00:19 IST

औरंगाबाद : काँग्रेस पक्ष ही आपली आई आहे. आपण आपल्या आईवर जसे प्रेम करतो, तसेच प्रेम पक्षावरही केले पाहिजे.

औरंगाबाद : काँग्रेस पक्ष ही आपली आई आहे. आपण आपल्या आईवर जसे प्रेम करतो, तसेच प्रेम पक्षावरही केले पाहिजे. पक्षाच्या भूमिकेविरुद्ध जर कोणी संघटना स्थापन करीत असेल, तर ती राक्षसी प्रवृत्ती म्हणावी लागेल. अशा प्रवृत्तीवर कारवाई करण्यास मी मागे पुढे पाहणार नाही, असा इशारा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ. अब्दुल सत्तार यांनी दिला. अनुदानित वसतिगृह चालकांच्या प्रलंबित प्रश्नांवर आज शुक्रवारी सायंकाळी जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीराम महाजन यांच्या दालनात अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच समाजकल्याण अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या बैठकीस उपस्थित राहण्यासाठी आ. अब्दुल सत्तार जिल्हा परिषदेत आले होते. त्यावेळी पत्रकारांनी आ. सुभाष झांबड यांनी स्थापन केलेल्या जनविकास आंदोलन विकास समितीकडे आ. अब्दुल सत्तार यांचे लक्ष वेधले. तेव्हा ते म्हणाले की, मी दोन दिवस कोकण दौऱ्यावर होतो. त्यामुळे मला याची कल्पना नव्हती. इथे आल्यानंतर हा प्रकार समजला. काँग्रेस कार्यकर्त्यांना प्रती संघटना, समित्या काढता येणार नाहीत. कार्यकर्त्यांना पक्षाचेच काम करावे लागेल. पक्षनिष्ठा नसेल, तर त्या कार्यकर्त्यांना पक्षात राहण्याचा अधिकारच नाही. पक्षात राहून पक्षविरोधी कारवाया करणारांची गय केली जाणार नाही. यासंबंधीचा अहवाल आपण काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडे पाठविणार आहे. यासंदर्भात तेच कारवाई करतील. प्रदेशाध्यक्षांनी जर मला अधिकार दिले, तर मी पक्षातून काढून टाकण्यासही मागेपुढे बघणार नाही. पूर्वीचे सरकार एका आमदाराला रस्त्याच्या कामासाठी ७०० कोटी रुपयांचे अनुदान देत होते. मला या दोन वर्षांत अवघे सव्वादोन कोटी रुपयांचे अनुदान मिळाले आहे. यातून किती रस्ते दुरुस्त होतील. केंद्रातील तसेच राज्यातील सरकारने दिलेल्या आश्वासनांपैकी एकाची तरी पूर्तता केली आहे का. शेतकऱ्यांना हमीभाव मिळत नाही. मिरची उत्पादक शेतकऱ्यांनी तर तहसीलदारांकडे आत्महत्या करण्याची परवानगी मागितली आहे. शेतकऱ्यांना न्याय देणे, हे विरोधी पक्ष म्हणून आमचे कर्तव्य आहे. सरकारविरुद्ध सर्वत्र आक्रोश आहे. त्यामुळे आगामी जिल्हा परिषद निवडणुका आम्ही बहुमताने जिंकणार, असा दावाही आ. सत्तार यांनी केला. केवळ जनतेच्या समस्या सोडविण्यासाठीचयासंदर्भात आ. सुभाष झांबड यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता ते म्हणाले की, पक्षाचा आदेश असेल तर मी स्थापन केलेली समिती बंद करून टाकतो. मुळात या समितीपासून राजकीय फायदा व्हावा, हा आपला हेतू नव्हता. जनतेचे प्रश्न, समस्या सुटत नाहीत. ते सोडविण्यासाठी जनविकास आंदोलन समितीची आपण स्थापना केली होती. समिती स्थापन केली म्हणजे पक्षविरोधी कारवाई केली, असे कसे म्हणता येईल. तरी सुद्धा पक्षश्रेष्ठींचे आदेश असतील, तर ती समिती बंद करून टाकू. आ. अब्दुल सत्तार म्हणाले की, दहा दिवसांच्या आत विभागीय आयुक्त कार्यालयावर काँग्रेसच्या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. २५ हजार लोक या मोर्चात सहभागी होतील. त्यानंतर हिवाळी अधिवेशनावरही मोर्चा नेला जाईल. हा मोर्चा राजकारणाचा भाग नसेल. तो जनतेच्या समस्या व सरकारचा नाकर्तेपणा चव्हाट्यावर मांडण्यासाठी असणार आहे. शहर व ग्रामीण रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाली आहे. या व इतर मागण्यांसाठी हा मोर्चा असेल.