शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
6
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
7
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
8
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
9
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
10
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
11
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
12
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
13
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
14
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
15
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
16
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
17
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
18
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
19
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

विद्यार्थिनीसोबत ‘थर्टीफर्स्ट’ चा गोंधळ

By admin | Updated: January 2, 2015 00:48 IST

औरंगाबाद : प्राध्यापक व वसतिगृहात राहणाऱ्या एका संशोधक विद्यार्थिनीने ‘थर्टीफर्स्ट’ साजरा करण्याचा रचलेला बेत विद्यार्थी कल्याण विभागाच्या संचालकांनी काल रात्री उधळून लावला.

औरंगाबाद : प्राध्यापक व वसतिगृहात राहणाऱ्या एका संशोधक विद्यार्थिनीने ‘थर्टीफर्स्ट’ साजरा करण्याचा रचलेला बेत विद्यार्थी कल्याण विभागाच्या संचालकांनी काल रात्री उधळून लावला. वसतिगृहाबाहेर जाण्यासाठी रात्री साडेदहा- अकरा वाजेपर्यंत ‘त्या’ प्राध्यापक व विद्यार्थिनीने गोंधळ घातला. शेवटी हे प्रकरण पोलिसांत जाण्याची चिन्हे दिसताच प्राध्यापक महाशयाने तेथून काढता पाय घेतला.झाले असे की, विद्यापीठातील एका विभागात एक प्राध्यापक महाशय विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे महान कार्य करीत आहेत. एक विद्यार्थिनी त्या प्राध्यापकाकडे एम. फिल. करते. ती सध्या विद्यापीठ कॅम्पसमधील एका वसतिगृहात राहात आहे. मागील काही महिन्यांपासून या ‘गुरू- शिष्या’ने पुढचे पाऊल उचलले असल्याची खमंग चर्चा विभागातील संपूर्ण शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये आहे. काल रात्री वसतिगृहाबाहेर जाण्यासाठी सदरील विद्यार्थिनीने वॉर्डनकडे आग्रह धरला; पण विद्यापीठ नियमानुसार सायंकाळनंतर वसतिगृहाबाहेर जाण्यास विद्यार्थिनींना मुभा नाही. त्यामुळे वॉर्डन, सुरक्षा अधिकारी व सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्या विद्यार्थिनीला वसतिगृहाबाहेर सोडलेच नाही.शेवटी त्या विद्यार्थिनीने मोठमोठ्याने रडून गोंधळ घालण्यास सुरुवात केली. तेव्हा सुरक्षा अधिकाऱ्याने विद्यार्थी कल्याण संचालकांना बोलावून घेतले. रात्री १० वाजेच्या सुमारास विद्यार्थी कल्याण विभागाच्या संचालक वसतिगृहात पोहोचल्या व त्यांनी सर्व प्रकार समजून घेतला. तेव्हा त्या विद्यार्थिनीने सांगितले की, मला माझ्या ‘भावजी’कडे जायचे आहे. तिने आपल्या ‘भावजी’ला बोलावून घेतले. त्या व्यक्तीने मला या विद्यार्थिनीला घरी घेऊन जायचेच नाही, असे स्पष्ट करीत तो निघून गेला.यानंतर काही क्षणात ते प्राध्यापक महाशय तेथे अवतरले. ते म्हणाले की, मी हिला घेऊन जातो. त्यावर संचालकांनी प्रश्न केला की, तुमचा काय संबंध. तुम्ही एका विद्यार्थिनीला घरी घेऊन जायचे कसे म्हणता. त्यानंतर ते प्राध्यापक महाशय व संचालकांमध्ये बराच वेळ हुज्जत झाली. त्यानंतर संचालकांनी कुलगुरूंना रात्रीच मोबाईलवरून वसतिगृहात सुरू असलेला हा प्रकार सांगितला. तेव्हा कुलगुरूंनी त्या प्राध्यापकाविरुद्ध पोलिसात तक्रार देण्याचे आदेश दिले. कुलगुरूंच्या कानावर ही गोष्ट गेल्याचे समजताच ते महाशय तेथून निघून गेले. संचालकांनी प्राध्यापकाच्या वर्तनाविरुद्ध आज कुलगुरू डॉ. चोपडे यांच्या कार्यालयात तसेच विद्यापीठातील ‘विशाखा’ समितीकडे लेखी तक्रार दिली.