शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
2
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
3
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
4
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
5
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
6
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
7
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
8
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
9
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
10
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
11
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
12
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
13
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
14
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
15
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
16
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
17
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
18
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
19
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
20
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा

पालकांची संभ्रमावस्था

By admin | Updated: July 19, 2015 00:57 IST

संजय कुलकर्णी , जालना शासनाच्या निर्णयानुसार पहिली ते आठवीपर्यंतच्या प्रत्येक विद्यार्थ्याचा आधार क्रमांक लिंक करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे विविध शाळांकडून विद्यार्थ्यांना,

संजय कुलकर्णी , जालनाशासनाच्या निर्णयानुसार पहिली ते आठवीपर्यंतच्या प्रत्येक विद्यार्थ्याचा आधार क्रमांक लिंक करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे विविध शाळांकडून विद्यार्थ्यांना, पालकांना आधार कार्ड किंवा त्याची पावती आणून देण्याविषयी वारंवार सांगितले जात आहे. परंतु आधार कार्ड काढण्याच्या निश्चित ठिकाणांपासून बहुतांश पालक अनभिज्ञ असून प्रशासनानेही विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र शिबीर घेतलेले नाही किंवा त्यासाठीची व्यवस्था केली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आधार कार्डसंबंधी पालक संभ्रमात आहेत.विद्यार्थ्यांच्या आधारकार्डसंबंधी शासनाने सर्व शाळांना सक्तीच्या सुचना दिलेल्या आहेत. ठिकठिकाणी शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना व वेळप्रसंगी पालकांना शाळेत बोलावून विद्यार्थ्याचे आधारकार्ड किंवा पावती द्यावी, अशी सूचना केली जात आहे. परंतु आधारकार्ड कोठे काढायचे? याविषयीची निश्चित माहिती पालकांना मिळत नाही. त्यामुळे पालकांमध्ये याविषयीचा संभ्रम निर्माण झालेला आहे. काही विद्यार्थ्यांचे यापूर्वी आधारकार्डची नोंदणी केल्यानंतर त्यांना पोचपावती मिळाली नाही. या पोच पावतीच्या क्रमांकाशिवाय कोणत्याही नेट कॅफेवर संबंधित विद्यार्थ्याचे आधारकार्ड काढता येत नाही. शिवाय नवीन आधारकार्डही काढता येत नाही. दरम्यान, काही खाजगी कॅफेंवर आधारकार्डसाठी जादा रक्कम घेतली जात असल्याचेही पालकांमधून सांगण्यात आले.याबाबत पालक गोविंद इंगळे म्हणाले, विद्यार्थ्यांना आधार क्रमांक मिळवून देण्याची जबाबदारी शासनाने संबंधित शाळा, संस्थांवर निश्चित केलेली आहे. मात्र याबाबत शाळांकडून पालकांनाच बाहेरून कार्ड काढून आणा, अशी वारंवार सूचना केली जात आहे.४अंकुर बालक मंदिराच्या संचालिका अलका गव्हाणे म्हणाल्या, जिल्हा परिषद शिक्षण विभागाने ज्या विद्यार्थ्यांचे आधारकार्ड आहेत, त्यांची यादी करण्याचे सांगितले आहे. परंतु आधारकार्ड काढण्याची व्यवस्था करून दिलेली नाही. अनुदानित शाळांकडेच अधिक लक्ष दिले जाते, असा आरोप गव्हाणे यांनी केला.४सरस्वती भुवनचे मुख्याध्यापक रमेश वळसे म्हणाले, विद्यार्थ्यांचे आधारकार्ड काढण्याच्या सूचना शिक्षकांकडून पालकांना केल्या जातात. परंतु पालकांची अडचण लक्षात घेता, सर्व मुख्याध्यापकांनी काही दिवसांपूर्वीच शिक्षण विभागाकडे आधारकार्ड काढून देण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी केली होती. त्यानुसार लवकरच शाळानिहाय ही व्यवस्था होणार असल्याचे आम्हाला कळाले आहे.जिल्ह्यात पहिली ते आठवीच्या एकूण ३ लाख २६ हजार विद्यार्थ्यांपैकी ५० टक्के विद्यार्थ्यांचे आधारकार्ड काढलेले आहेत. उर्वरीत विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक लिंक करण्यासाठी विविध शाळांना अडचणी येत आहेत. त्यामुळे आधारकार्ड काढण्याची व्यवस्था व्हावी, अशी मागणी जिल्हा परिषद शिक्षण विभागाने जिल्हाधिकारी नायक यांच्याकडे केली होती. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी ११ यंत्र देण्यास संमती दर्शविली असून यामध्ये जालना शहरात व भोकरदन तालुक्यात प्रत्येकी दोन तसेच अन्य तालुक्यांमध्ये प्रत्येकी एका यंत्राचा समावेश राहणार आहे, अशी माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी गजानन सूसर यांनी दिली. ज्या पालकांना विद्यार्थ्यांच्या आधारकार्ड काढण्यासंबंधी काही शंका असल्यास त्यांनी संबंधित गटशिक्षणाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन शिक्षणाधिकारी सूसर यांनी केले आहे.शिक्षण विभागाने २०११ मध्ये राबविलेल्या विशेष पटपडताळणी मोहिमेअंतर्गत काही शाळांमध्ये विद्यार्थी संख्या बोगस आढळून आली होती. विद्यार्थी व पालक यांना आमिष दाखवून एका शाळेतील विद्यार्थी दुसऱ्या शाळेत पळविणे, एकाच मुलाचे नाव अनेक शाळांच्या पटावर असणे इत्यादी प्रकार आढळून आले होते. पटपडताळणीत आढळून आलेल्या अनियमिततेच्या अनुषंगाने संचमान्यतेमध्ये काही सुचना निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला आधार क्रमांक मिळवून देणे ही संबंधित शाळेची/संस्थेची जबाबदारी असेल, असे नमूद केलेले आहे.