शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

पालकांची संभ्रमावस्था

By admin | Updated: July 19, 2015 00:57 IST

संजय कुलकर्णी , जालना शासनाच्या निर्णयानुसार पहिली ते आठवीपर्यंतच्या प्रत्येक विद्यार्थ्याचा आधार क्रमांक लिंक करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे विविध शाळांकडून विद्यार्थ्यांना,

संजय कुलकर्णी , जालनाशासनाच्या निर्णयानुसार पहिली ते आठवीपर्यंतच्या प्रत्येक विद्यार्थ्याचा आधार क्रमांक लिंक करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे विविध शाळांकडून विद्यार्थ्यांना, पालकांना आधार कार्ड किंवा त्याची पावती आणून देण्याविषयी वारंवार सांगितले जात आहे. परंतु आधार कार्ड काढण्याच्या निश्चित ठिकाणांपासून बहुतांश पालक अनभिज्ञ असून प्रशासनानेही विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र शिबीर घेतलेले नाही किंवा त्यासाठीची व्यवस्था केली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आधार कार्डसंबंधी पालक संभ्रमात आहेत.विद्यार्थ्यांच्या आधारकार्डसंबंधी शासनाने सर्व शाळांना सक्तीच्या सुचना दिलेल्या आहेत. ठिकठिकाणी शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना व वेळप्रसंगी पालकांना शाळेत बोलावून विद्यार्थ्याचे आधारकार्ड किंवा पावती द्यावी, अशी सूचना केली जात आहे. परंतु आधारकार्ड कोठे काढायचे? याविषयीची निश्चित माहिती पालकांना मिळत नाही. त्यामुळे पालकांमध्ये याविषयीचा संभ्रम निर्माण झालेला आहे. काही विद्यार्थ्यांचे यापूर्वी आधारकार्डची नोंदणी केल्यानंतर त्यांना पोचपावती मिळाली नाही. या पोच पावतीच्या क्रमांकाशिवाय कोणत्याही नेट कॅफेवर संबंधित विद्यार्थ्याचे आधारकार्ड काढता येत नाही. शिवाय नवीन आधारकार्डही काढता येत नाही. दरम्यान, काही खाजगी कॅफेंवर आधारकार्डसाठी जादा रक्कम घेतली जात असल्याचेही पालकांमधून सांगण्यात आले.याबाबत पालक गोविंद इंगळे म्हणाले, विद्यार्थ्यांना आधार क्रमांक मिळवून देण्याची जबाबदारी शासनाने संबंधित शाळा, संस्थांवर निश्चित केलेली आहे. मात्र याबाबत शाळांकडून पालकांनाच बाहेरून कार्ड काढून आणा, अशी वारंवार सूचना केली जात आहे.४अंकुर बालक मंदिराच्या संचालिका अलका गव्हाणे म्हणाल्या, जिल्हा परिषद शिक्षण विभागाने ज्या विद्यार्थ्यांचे आधारकार्ड आहेत, त्यांची यादी करण्याचे सांगितले आहे. परंतु आधारकार्ड काढण्याची व्यवस्था करून दिलेली नाही. अनुदानित शाळांकडेच अधिक लक्ष दिले जाते, असा आरोप गव्हाणे यांनी केला.४सरस्वती भुवनचे मुख्याध्यापक रमेश वळसे म्हणाले, विद्यार्थ्यांचे आधारकार्ड काढण्याच्या सूचना शिक्षकांकडून पालकांना केल्या जातात. परंतु पालकांची अडचण लक्षात घेता, सर्व मुख्याध्यापकांनी काही दिवसांपूर्वीच शिक्षण विभागाकडे आधारकार्ड काढून देण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी केली होती. त्यानुसार लवकरच शाळानिहाय ही व्यवस्था होणार असल्याचे आम्हाला कळाले आहे.जिल्ह्यात पहिली ते आठवीच्या एकूण ३ लाख २६ हजार विद्यार्थ्यांपैकी ५० टक्के विद्यार्थ्यांचे आधारकार्ड काढलेले आहेत. उर्वरीत विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक लिंक करण्यासाठी विविध शाळांना अडचणी येत आहेत. त्यामुळे आधारकार्ड काढण्याची व्यवस्था व्हावी, अशी मागणी जिल्हा परिषद शिक्षण विभागाने जिल्हाधिकारी नायक यांच्याकडे केली होती. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी ११ यंत्र देण्यास संमती दर्शविली असून यामध्ये जालना शहरात व भोकरदन तालुक्यात प्रत्येकी दोन तसेच अन्य तालुक्यांमध्ये प्रत्येकी एका यंत्राचा समावेश राहणार आहे, अशी माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी गजानन सूसर यांनी दिली. ज्या पालकांना विद्यार्थ्यांच्या आधारकार्ड काढण्यासंबंधी काही शंका असल्यास त्यांनी संबंधित गटशिक्षणाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन शिक्षणाधिकारी सूसर यांनी केले आहे.शिक्षण विभागाने २०११ मध्ये राबविलेल्या विशेष पटपडताळणी मोहिमेअंतर्गत काही शाळांमध्ये विद्यार्थी संख्या बोगस आढळून आली होती. विद्यार्थी व पालक यांना आमिष दाखवून एका शाळेतील विद्यार्थी दुसऱ्या शाळेत पळविणे, एकाच मुलाचे नाव अनेक शाळांच्या पटावर असणे इत्यादी प्रकार आढळून आले होते. पटपडताळणीत आढळून आलेल्या अनियमिततेच्या अनुषंगाने संचमान्यतेमध्ये काही सुचना निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला आधार क्रमांक मिळवून देणे ही संबंधित शाळेची/संस्थेची जबाबदारी असेल, असे नमूद केलेले आहे.