शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
2
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
3
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव
4
ज्याला घुसखोर म्हणून महाराष्ट्रातून हाकललं, त्याला ममता सरकारने आणखी ४ जणांसह बांगलादेशमधून परत आणलं  
5
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
6
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
7
होम लोनचा EMI भरुन-भरुन थकलायत, ही पद्धत वापरुन पाहा; लवकर संपेल तुमचं कर्ज
8
KEM Hospital: ‘केईएममध्ये नव्हे; तर आवारात पाणी तुंबले’ रुग्णालय प्रशासनाची न्यायालयाला माहिती
9
"कमेंट्समध्ये ट्रोल करतात अन् पर्सनल मेसेजमध्ये लोक...", राजेश्वरी खरातने व्यक्त केला राग
10
विमान अपघातापासून बॉलिवूडच्या सुपरस्टारचा थोडक्यात वाचलेला जीव, काय घडलेलं?
11
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
12
वर्ल्ड कप आधी स्मृती मानधनाची मुसंडी! ५ वर्षांनी पुन्हा झाली वनडेची 'क्वीन'
13
एअर इंडिया विमान अपघात: प्रेमानंद महाराजांची मोठी शिकवण; तुम्हालाही ‘ती’ गोष्ट माहिती हवीच!
14
Sonam Raghuvanshi : "लग्नानंतर राजा त्याच्या मित्रांसह..."; सोनम रघुवंशीने रिसेप्शनला नवऱ्याला दिलेलं 'हे' वचन
15
स्वामी विवेकानंदांना महाकालीकडे मागायचे होते एक, पण मागितले भलतेच आणि ते मिळालेसुद्धा!
16
'आमच्या देशाकडे पाहिलं तरी डोळे काढून...’, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची इस्राइलला धमकी
17
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
18
मारुतीची पहिली e Vitara लाँच झाली! व्हेरिअंटनुसार ३५ लाख ते ४२ लाख किंमत, फिचर्स, रेंज आणि कोण घेणार पहा...
19
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्तानची लुडबुड; शाहबाज शरीफ यांना कशाची वाटतेय भीती?
20
विरार- अलिबाग कॉरिडोरच्या भूसंपादनाला मिळणार गती!

पालकांची संभ्रमावस्था

By admin | Updated: July 19, 2015 00:57 IST

संजय कुलकर्णी , जालना शासनाच्या निर्णयानुसार पहिली ते आठवीपर्यंतच्या प्रत्येक विद्यार्थ्याचा आधार क्रमांक लिंक करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे विविध शाळांकडून विद्यार्थ्यांना,

संजय कुलकर्णी , जालनाशासनाच्या निर्णयानुसार पहिली ते आठवीपर्यंतच्या प्रत्येक विद्यार्थ्याचा आधार क्रमांक लिंक करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे विविध शाळांकडून विद्यार्थ्यांना, पालकांना आधार कार्ड किंवा त्याची पावती आणून देण्याविषयी वारंवार सांगितले जात आहे. परंतु आधार कार्ड काढण्याच्या निश्चित ठिकाणांपासून बहुतांश पालक अनभिज्ञ असून प्रशासनानेही विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र शिबीर घेतलेले नाही किंवा त्यासाठीची व्यवस्था केली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आधार कार्डसंबंधी पालक संभ्रमात आहेत.विद्यार्थ्यांच्या आधारकार्डसंबंधी शासनाने सर्व शाळांना सक्तीच्या सुचना दिलेल्या आहेत. ठिकठिकाणी शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना व वेळप्रसंगी पालकांना शाळेत बोलावून विद्यार्थ्याचे आधारकार्ड किंवा पावती द्यावी, अशी सूचना केली जात आहे. परंतु आधारकार्ड कोठे काढायचे? याविषयीची निश्चित माहिती पालकांना मिळत नाही. त्यामुळे पालकांमध्ये याविषयीचा संभ्रम निर्माण झालेला आहे. काही विद्यार्थ्यांचे यापूर्वी आधारकार्डची नोंदणी केल्यानंतर त्यांना पोचपावती मिळाली नाही. या पोच पावतीच्या क्रमांकाशिवाय कोणत्याही नेट कॅफेवर संबंधित विद्यार्थ्याचे आधारकार्ड काढता येत नाही. शिवाय नवीन आधारकार्डही काढता येत नाही. दरम्यान, काही खाजगी कॅफेंवर आधारकार्डसाठी जादा रक्कम घेतली जात असल्याचेही पालकांमधून सांगण्यात आले.याबाबत पालक गोविंद इंगळे म्हणाले, विद्यार्थ्यांना आधार क्रमांक मिळवून देण्याची जबाबदारी शासनाने संबंधित शाळा, संस्थांवर निश्चित केलेली आहे. मात्र याबाबत शाळांकडून पालकांनाच बाहेरून कार्ड काढून आणा, अशी वारंवार सूचना केली जात आहे.४अंकुर बालक मंदिराच्या संचालिका अलका गव्हाणे म्हणाल्या, जिल्हा परिषद शिक्षण विभागाने ज्या विद्यार्थ्यांचे आधारकार्ड आहेत, त्यांची यादी करण्याचे सांगितले आहे. परंतु आधारकार्ड काढण्याची व्यवस्था करून दिलेली नाही. अनुदानित शाळांकडेच अधिक लक्ष दिले जाते, असा आरोप गव्हाणे यांनी केला.४सरस्वती भुवनचे मुख्याध्यापक रमेश वळसे म्हणाले, विद्यार्थ्यांचे आधारकार्ड काढण्याच्या सूचना शिक्षकांकडून पालकांना केल्या जातात. परंतु पालकांची अडचण लक्षात घेता, सर्व मुख्याध्यापकांनी काही दिवसांपूर्वीच शिक्षण विभागाकडे आधारकार्ड काढून देण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी केली होती. त्यानुसार लवकरच शाळानिहाय ही व्यवस्था होणार असल्याचे आम्हाला कळाले आहे.जिल्ह्यात पहिली ते आठवीच्या एकूण ३ लाख २६ हजार विद्यार्थ्यांपैकी ५० टक्के विद्यार्थ्यांचे आधारकार्ड काढलेले आहेत. उर्वरीत विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक लिंक करण्यासाठी विविध शाळांना अडचणी येत आहेत. त्यामुळे आधारकार्ड काढण्याची व्यवस्था व्हावी, अशी मागणी जिल्हा परिषद शिक्षण विभागाने जिल्हाधिकारी नायक यांच्याकडे केली होती. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी ११ यंत्र देण्यास संमती दर्शविली असून यामध्ये जालना शहरात व भोकरदन तालुक्यात प्रत्येकी दोन तसेच अन्य तालुक्यांमध्ये प्रत्येकी एका यंत्राचा समावेश राहणार आहे, अशी माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी गजानन सूसर यांनी दिली. ज्या पालकांना विद्यार्थ्यांच्या आधारकार्ड काढण्यासंबंधी काही शंका असल्यास त्यांनी संबंधित गटशिक्षणाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन शिक्षणाधिकारी सूसर यांनी केले आहे.शिक्षण विभागाने २०११ मध्ये राबविलेल्या विशेष पटपडताळणी मोहिमेअंतर्गत काही शाळांमध्ये विद्यार्थी संख्या बोगस आढळून आली होती. विद्यार्थी व पालक यांना आमिष दाखवून एका शाळेतील विद्यार्थी दुसऱ्या शाळेत पळविणे, एकाच मुलाचे नाव अनेक शाळांच्या पटावर असणे इत्यादी प्रकार आढळून आले होते. पटपडताळणीत आढळून आलेल्या अनियमिततेच्या अनुषंगाने संचमान्यतेमध्ये काही सुचना निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला आधार क्रमांक मिळवून देणे ही संबंधित शाळेची/संस्थेची जबाबदारी असेल, असे नमूद केलेले आहे.