शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

मुक्त विद्यापीठाचा गोंधळ; विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका गहाळ

By admin | Updated: November 17, 2016 00:57 IST

लातूर अर्धवट शिक्षण राहिलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिककडून अनेक अभ्यासक्रम सुरू करण्यात आले.

बाळासाहेब जाधव  लातूरअर्धवट शिक्षण राहिलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिककडून अनेक अभ्यासक्रम सुरू करण्यात आले. यामुळे लातूर जिल्ह्यासह राज्यभरातील लाखो विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात आले. परंतु, विद्यापीठ कर्मचाऱ्यांमधील समन्वयाअभावी अनेक विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकाच गहाळ झाल्याने अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जात आहे. ‘ज्ञानगंगा घरोघरी’ या उक्तीनुसार अर्धवट शिक्षण राहिलेल्या विद्यार्थ्यांना घरपोच पुस्तके पुरवून शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणण्याचा प्रयत्न यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाकडून गेल्या अनेक दिवसांपासून केला जात आहे. यामध्ये बी.ए., बी.कॉम., बी.एस्सी. एम.एस्सी., पत्रकारिता पदवी तसेच अनेक पदव्युत्तर अभ्यासक्रम लातूर शहरातील ६ केंद्रांवरून तसेच ग्रामीण भागातील केंद्रांवरून चालविले जातात. यामुळे अर्धवट शिक्षण झालेले व डी.एड्., बी.एड्.चे विद्यार्थी उर्वरित शिक्षणासाठी या मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून शिक्षण घेत आहेत. परंतु, यावर्षी मात्र विद्यापीठ, परीक्षा नियंत्रण विभाग व उत्तरपत्रिका तपासणीसाठी पाठविणारी खाजगी कंपनी यांच्यामध्ये समन्वय नसल्यामुळे लातूर जिल्ह्यातील १५ विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका गहाळ झाल्याचे उघड झाले आहे. यामध्ये शिवाजी महाविद्यालयातील केंद्रावर बी.ए. तृतीय वर्षाची परीक्षा दिलेल्या ज्ञानेश्वर साळुंके याने परीक्षा देऊनही त्याची विद्यापीठाने गैरहजेरी दाखविली. तर शाहू महाविद्यालयातील प्रशांत सोपानराव मोरतळे या विद्यार्थ्याने बी.लिब अभ्यासक्रमाअंतर्गत लायब्ररी कॅटलॉगिंग या विषयाची परीक्षा दिली. मात्र आॅनलाईन निकालामध्ये त्यालाही गैरहजर दाखविण्यात आले आहे. परीक्षा देऊनही उत्तरपत्रिका गहाळ झाल्याने या विद्यार्थ्यांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले. तसेच या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्षही वाया गेले आहे. याबाबत विद्यार्थ्यांनी कागदोपत्री पाठपुरावा करूनही विद्यापीठाकडून त्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याने लातूर जिल्ह्यातील १५ विद्यार्थी न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत.