शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

मुक्त विद्यापीठाचा गोंधळ; विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका गहाळ

By admin | Updated: November 17, 2016 00:57 IST

लातूर अर्धवट शिक्षण राहिलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिककडून अनेक अभ्यासक्रम सुरू करण्यात आले.

बाळासाहेब जाधव  लातूरअर्धवट शिक्षण राहिलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिककडून अनेक अभ्यासक्रम सुरू करण्यात आले. यामुळे लातूर जिल्ह्यासह राज्यभरातील लाखो विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात आले. परंतु, विद्यापीठ कर्मचाऱ्यांमधील समन्वयाअभावी अनेक विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकाच गहाळ झाल्याने अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जात आहे. ‘ज्ञानगंगा घरोघरी’ या उक्तीनुसार अर्धवट शिक्षण राहिलेल्या विद्यार्थ्यांना घरपोच पुस्तके पुरवून शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणण्याचा प्रयत्न यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाकडून गेल्या अनेक दिवसांपासून केला जात आहे. यामध्ये बी.ए., बी.कॉम., बी.एस्सी. एम.एस्सी., पत्रकारिता पदवी तसेच अनेक पदव्युत्तर अभ्यासक्रम लातूर शहरातील ६ केंद्रांवरून तसेच ग्रामीण भागातील केंद्रांवरून चालविले जातात. यामुळे अर्धवट शिक्षण झालेले व डी.एड्., बी.एड्.चे विद्यार्थी उर्वरित शिक्षणासाठी या मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून शिक्षण घेत आहेत. परंतु, यावर्षी मात्र विद्यापीठ, परीक्षा नियंत्रण विभाग व उत्तरपत्रिका तपासणीसाठी पाठविणारी खाजगी कंपनी यांच्यामध्ये समन्वय नसल्यामुळे लातूर जिल्ह्यातील १५ विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका गहाळ झाल्याचे उघड झाले आहे. यामध्ये शिवाजी महाविद्यालयातील केंद्रावर बी.ए. तृतीय वर्षाची परीक्षा दिलेल्या ज्ञानेश्वर साळुंके याने परीक्षा देऊनही त्याची विद्यापीठाने गैरहजेरी दाखविली. तर शाहू महाविद्यालयातील प्रशांत सोपानराव मोरतळे या विद्यार्थ्याने बी.लिब अभ्यासक्रमाअंतर्गत लायब्ररी कॅटलॉगिंग या विषयाची परीक्षा दिली. मात्र आॅनलाईन निकालामध्ये त्यालाही गैरहजर दाखविण्यात आले आहे. परीक्षा देऊनही उत्तरपत्रिका गहाळ झाल्याने या विद्यार्थ्यांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले. तसेच या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्षही वाया गेले आहे. याबाबत विद्यार्थ्यांनी कागदोपत्री पाठपुरावा करूनही विद्यापीठाकडून त्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याने लातूर जिल्ह्यातील १५ विद्यार्थी न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत.