शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

प्रभारींच्या मताधिकारावरून गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 01:02 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांसाठी जाहीर झालेल्या निवडणुकीत प्रभारी अधिकाऱ्यांना मतदानाचा अधिकार बहाल केला आहे. यावर उत्कर्ष पॅनलच्या अधिसभा सदस्यांनी आक्षेप घेऊन नांदेड, जळगाव येथील विद्यापीठात प्रभारींना मतदानाचा अधिकार दिलेला नाही. आपल्या विद्यापीठातही अधिसभेच्या निवडणुकीत प्रभारी प्राचार्यांना मतदानाचा अधिकार दिला नव्हता. यामुळे व्यवस्थापन परिषदेच्या निवडणुकीतच हा अधिकार का? असा सवाल सदस्यांनी प्रशासनाला केला.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांसाठी जाहीर झालेल्या निवडणुकीत प्रभारी अधिकाऱ्यांना मतदानाचा अधिकार बहाल केला आहे. यावर उत्कर्ष पॅनलच्या अधिसभा सदस्यांनी आक्षेप घेऊन नांदेड, जळगाव येथील विद्यापीठात प्रभारींना मतदानाचा अधिकार दिलेला नाही. आपल्या विद्यापीठातही अधिसभेच्या निवडणुकीत प्रभारी प्राचार्यांना मतदानाचा अधिकार दिला नव्हता. यामुळे व्यवस्थापन परिषदेच्या निवडणुकीतच हा अधिकार का? असा सवाल सदस्यांनी प्रशासनाला केला.विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवर अधिसभेतून निवडून देण्याच्या सदस्यांसाठी १५ जून रोजी मतदान ठेवण्यात आले आहे. या प्रक्रियेला २५ मेपासून सुरुवात झाली. निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. साधना पांडे यांनी स्वत:सह एकूण १२ प्रभारी अधिका-यांना मतदानाचा अधिकार बहाल केला आहे. नांदेड आणि जळगाव येथील विद्यापीठात विद्यापीठ कायद्यानुसारच प्रभारी अधिका-यांना मतदानाचा अधिकार देण्यात येणार नसल्याचे स्पष्ट करणारे परिपत्रक काढले आहे.याचा आधार घेऊन उत्कर्ष पॅनलचे अधिसभा सदस्य प्रा. सुनील मगरे, डॉ. राम चव्हाण, डॉ. राजेश करपे, डॉ. लक्ष्मीकांत शिंदे, डॉ. फुलचंद सलामपुरे आदींनी सोमवारी प्रकुलगुरू डॉ. अशोक तेजनकर आणि निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. साधना पांडे यांना घेराव घालून तात्काळ प्रभारी अधिका-यांची नावे वगळण्याची मागणी केली. विद्यापीठाने अधिसभेच्या निवडणुकीत प्रभारी प्राचार्यांना मतदानाचा अधिकार दिला नव्हता. सीएचबीच्या प्राध्यापकांनाही यातून वगळण्यात आले होते. तेव्हा प्रभारी असणाराना निवडणुकीत मताधिकार दिला नाही.मात्र याठिकाणी रात्री उशिरा अधिसूचना काढून प्रभारींना मतदानाचा अधिकार बहाल करण्यावर आक्षेप नोंदविला. या सदस्यांनी प्रकुलगुरूंच्या दालनातून बाहेर पडणार नसल्याचा पवित्रा घेतला. या सर्व आक्षेपांवर निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. पांडे यांना कोणतेही समाधानकारक उत्तर देता आले नाही.कुलगुरू आणि कुलसचिवांना अनागोंदी कारभार करण्यासाठी व्यवस्थापन परिषदेची निवडणूक होऊ द्यायची नाही. मागील वेळाही अनेक वादग्रस्त निर्णय घेतले. यामुळे न्यायालयात जावे लागले. त्याठिकाणी फटकार बसताच दुरुस्त करून सुधारित निर्णय घेतले. यावेळी प्रभारींना मताधिकार देत कोणीतरी न्यायालयात जावे, त्याठिकाणी वेळ लागेल. यातून निवडणूक होणार नाही. यासाठीच हा खेळ सुरू असल्याचा आरोपही उत्कर्षच्या सदस्यांनी केला.स्वाभिमानी मुप्टाचेही निवेदनविद्यापीठ कायद्यानुसार कुलगुरूंना विशेष अधिकार दिले आहेत. तांत्रिक अडचणींमुळे पदे भरण्यात आलेली नाहीत. अधिकारी प्रभारी असले तरी त्यांना दिलेले अधिकार पूर्ण आहेत. यामुळे प्रभारी अधिका-यांना मतदानाचा अधिकार देण्यात यावा, अशी मागणी स्वाभिमानी मुप्टा संघटनेतर्फे कुलगुरूंना निवेदनाद्वारे करण्यात आली.निवेदनावर डॉ. शंकर अंभोरे, डॉ. किशोर वाघ, प्रा. प्रशांत वनंजे, डॉ. बाळासाहेब लिहिणार, अनिल पांडे, डॉ. प्रकाश तुरुकमाने आदींच्या स्वाक्ष-या आहेत. याशिवाय विद्यापीठ विकास मंचतर्फे निवडून आलेले अधिसभा सदस्य डॉ. गोविंद काळे यांनीही प्रभारींना मतदानाचा अधिकार कायम ठेवण्याची मागणी करणारे निवेदन कुलसचिवांना दिले.

टॅग्स :universityविद्यापीठElectionनिवडणूक