शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादेत केंद्रीय वक्फ समितीसमोर गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 23:19 IST

औरंगाबाद : वक्फ बोर्डाच्या मालमत्तेचे भाडेकरार नियम २०१४ ची अंमलबजावणी करण्यासाठी न्यायमूर्ती जकी उल्लाह खान यांच्या नेतृत्वाखाली नियुक्त केलेल्या सहा सदस्यांच्या समितीने शनिवारी मौलाना आझाद संशोधन केंद्रात बैठकीला सुरुवात केली. बैठकीत एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी दुपारी १ वाजता धुडगूस घातला. समितीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून कार्यकर्त्यांनी सदस्यांच्या अंगावर खुर्च्या भिरकावल्या. घाबरलेल्या अवस्थेत समितीला पळ काढावा लागला.

ठळक मुद्दे एमआयएम : सदस्यांच्या अंगावर खुर्च्या भिरकावल्या

औरंगाबाद : वक्फ बोर्डाच्या मालमत्तेचे भाडेकरार नियम २०१४ ची अंमलबजावणी करण्यासाठी न्यायमूर्ती जकी उल्लाह खान यांच्या नेतृत्वाखाली नियुक्त केलेल्या सहा सदस्यांच्या समितीने शनिवारी मौलाना आझाद संशोधन केंद्रात बैठकीला सुरुवात केली. बैठकीत एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी दुपारी १ वाजता धुडगूस घातला. समितीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून कार्यकर्त्यांनी सदस्यांच्या अंगावर खुर्च्या भिरकावल्या. घाबरलेल्या अवस्थेत समितीला पळ काढावा लागला.केंद्र सरकारने वक्फ बोर्डाच्या मालमत्तांचे भाडेकरार नियम २०१४ तयार केला आहे. याची अंमलबजावणी व त्यामध्ये सुधारणा करण्यासाठी माजी न्यायमूर्ती जकी उल्लाह खान यांच्या अध्यक्षतेखाली आर. एस. सक्सेना, अ‍ॅड. सय्यद शाहीद हुसेन रझवी, अ‍ॅड. टी. ओ. नौशाद, डॉ. अनिलकुमार गुप्ता, सदस्य सचिव बी. एम. जमाल या सहा सदस्यांची समिती गठीत केली आहे. ही समिती प्रत्येक राज्यांत जाऊन मुतवली आणि वक्फ मालमत्ताधारक यांच्याशी चर्चा करून भाडेकरार नियमातील अडचणी व सुधारणा करण्यासाठी उपाययोजना याबद्दल मत विचारात घेत आहे. न्यायमूर्ती जकी उल्लाह खान यांच्या नेतृत्वाखाली ही समिती दोनदिवसीय दौऱ्यावर औरंगाबादेत आली आहे. मौलाना अबुल कलाम आझाद संशोधन केंद्रात समितीने शहरातील मुतवली व वक्फ बोर्डाच्या मालमत्ताधारकांना बोलावले होते. यासाठी ५० ते ६० मुतवलींसह मालमत्ताधारक उपस्थित होते.आमदार इम्तियाज जलील यांच्यासह कार्यकर्ते समितीला भेटण्यासाठी आले. आ. जलील यांनी राज्यातील वक्फ मालमत्तांची माहिती दिली. काही मालमत्तांची परस्पर विक्री करण्यात आली. काही मालमत्ता इतर समाजातील नागरिकांना देण्यात आल्यामुळे मुस्लिम समाजातील होतकरू तरुणांना उद्योग व व्यवसायासाठी जागा मिळत नाही. समितीतील एका सदस्याने भाडेकराराच्या मुद्द्यावर बोला, इतर मुद्यांवर बोलू नका, असे सांगताच कार्यकर्ते चिडले. कार्यकर्त्यांनी एकच गोंधळ सुरू केला. त्यांनी सदस्यांच्या दिशेने खुर्च्या भिरकावल्या. न्यायमूर्ती जकी उल्लाह खान यांच्यासह सदस्यांना आ.जलील यांनी हॉलमधील एका कोपºयात नेले. तेथून सदस्यांना वाहनातून पाठवून दिले.

टॅग्स :GovernmentसरकारPoliticsराजकारण