शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
3
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
4
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
5
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
6
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
7
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
8
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
9
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
10
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
11
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
12
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
13
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
14
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
15
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
16
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
17
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
18
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
19
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
20
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!

महागाईने मोडले सामान्यांचे कंबरडे

By admin | Updated: July 3, 2014 00:19 IST

उस्मानाबाद : एखादा मोठा पाऊस पडला की, दहा ते बारा दिवसातच बाजारपेठेतील पालेभाज्याची आवक वाढते. आवक वाढताच दर कमी होतात.

उस्मानाबाद : एखादा मोठा पाऊस पडला की, दहा ते बारा दिवसातच बाजारपेठेतील पालेभाज्याची आवक वाढते. आवक वाढताच दर कमी होतात. मात्र यंदा जून महिना सरला तरीही वरुणराजाची कृपादृष्टी झालेली नाही. त्यामुळे खरीप पेरणी धोक्यात आली आहे. तर दुसरीकडे पालेभाज्यांची आवक घटल्याने हे दरही गगनाला भिडले आहेत. त्यामुळे गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. गतवर्षीप्रमाणेच यंदाही पाऊस बऱ्यापैकी होईल, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती. मात्र याच्या उलट परिस्थिती निर्माण झाली आहे. रोहिणी आणि मृग ही दोन्ही नक्षत्रे कोरडी गेली. त्यामुळे शेतकऱ्यांना पालेभाज्याची लागवड करता आली नाही. याचाच परिणाम म्हणून बाजापेठेमध्ये पालेभाज्या दिसेनाशा झाल्या आहेत. तुरळक प्रमाणात भाज्या विक्रीसाठी येत असल्या तरी त्याचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. मागील दोन- अडीच महिन्यापूर्वी एक किलो वांग्यासाठी ३० ते ३५ रुपये मोजावे लागत होते. आज हा दर ४५ वर जाऊन ठेपला आहे. पातीचे कांदेही महागले आहेत. एका जुडीसाठी जवळपास १५ रुपये द्यावे लागत आहेत.हिरवी मिरचीही अधिक तिखट झाली आहे. पाव किलो मिरचीसाठी १२ ते १५ रुपये लागत आहेत. कांदाही सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणू लागला आहे. एक किलो कांद्यासाठी ४० रुपये मोजावे लागत आहेत. कोथिंबीर तर प्रचंड भाव खाऊन जात आहे. एका जुडीसाठी २० ते २५ रुपये सोडावे लागत आहेत. मेथी, पालक आणि चुका या पालेभाज्याही प्रचंड महागल्या आहेत. १५ रुपयाच्या खाली एकही भाजी मिळत नाही. त्यामुळे सर्वसामान्यांच्या आहारातून पालेभाज्या हद्दपार होण्याच्या मार्गावर आहेत. जे कुटुंब चार ते पाच पालेभाज्या खरेदी करत असत ते आज १ ते २ वर येऊन ठेपले आहे. याला पर्याय म्हणून सर्वसामान्य मंडळी आता विविध प्रकारच्या दाळींसोबतच मटकी, वाटाण्यांचा वापराकडे वळल्याचे काही भाजी विक्रेत्यांकडून सांगण्यात आले. (प्रतिनिधी)...तर दर आणखी कडाडणारहवामान खात्याकडून ५ जुलैपर्यंत पाऊस पडेल असा अंदाज वर्तविला जात आहे. असे असले तरी पाऊस लांबल्यानंतर पालेभाज्याच्या दरात वाढ होऊ शकते, असे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. कसे चालवायचे घर ?तीन महिन्यापूर्वी येथील आठवडी बाजारात गेल्यानंतर शंभर ते दीडशे रुपयामध्ये कुटुंबाला ८ दिवस पुरेल एवढा भाजीपाला येत असे. मात्र मागील दोन आठवड्यापासून तेवढ्याच भाजीपाल्यासाठी अडीचशे रुपयेही पुरत नाहीत. उत्पन्नात मात्र वाढ झालेली नाही. तर सर्वसामान्यांनी कुटुंब चालवायचे तरी कसे असा सवाल राम माळी या बाजारकरुंनी उपस्थित केला.